Tag Archives: congress

राज्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीसाठी प्रदेश काँग्रेसच्या विभागनिहाय समित्या काँग्रेसच्या समित्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून विभागीय आयुक्तांना निवदेन देणार

राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्यांची मोठी समस्या असून रोजगारही मिळत नाहीत. राज्यातील महाभ्रष्टयुती सरकारला दुष्काळाची चिंता नाही. जनता दुष्काळाने होरपळ असताना महायुती राजकीय साठमारीत व्यस्त आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागनिहाय दुष्काळ पाहणी समित्यांची स्थापन केली …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, पुणे अपघात प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करा गुन्हेगारांना वाचवण्याचा फडणविसांचा प्रयत्न

राज्यात सध्या दुष्काळाचा प्रश्न गंभीर आहे तर दुसरीकडे दारू आणि ड्रग्जचे सेवन करुन सर्वसामान्य लोकांना गाडीखाली चिरडण्याचे प्रकार वाढत आहेत. नागपूर, जळगाव व पुण्यात अशा घटना घडल्या पण अत्यंत संताप आणण्याचा प्रकार म्हणजे यातील गर्भश्रीमंत आरोपींना तातडीने जामीन कसा मिळेल यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून प्रयत्न झाले. पुण्याच्या प्रकरणात गर्भश्रीमंत व्यक्तींना …

Read More »

प्रचारासाठी गेलेल्या राहुल गांधी यांचा सभे दरम्यानच दोन वेळा स्टेज खचला बिहारच्या पाटलीपुत्र येथील घटना

लोकसभा निवडणूकीच्या ७ व्या अर्थात अखेरच्या टप्प्यातील प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे बिहार येथील प्रचार सभेसाठी गेले होते. मात्र स्टेज प्रचारासाठी उभारण्यात आलेला स्टेज दोन वेळा खचल्याची घटना घडली. या घटनेत कोणाला ईजा झाली नाही. मात्र प्रचारसभा तशीच पुढे सुरु ठेवण्यात आली आणि राहुल गांधी यांनी सभेत सभाही घेतली. …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका,… एनडीएच्या घटक पक्षात चलबिचल अजित पवारांनाही पराभवाची चाहूल, सहकारी सोबत राहतील का याची चिंता

भारतीय जनता पक्षाचे सरकार ४ जूनला पुन्हा सत्तेत येणार नाही हे स्पष्ट झालेले आहे. अब की बार ४०० पार, च्या कितीही गप्पा मारल्या तरी देशात तशी परिस्थिती नाही. लोकसभा निवडणुकीतील पराभव दिसत असल्याने भाजपाच्या सहकारी पक्षांमध्येही चलबचल वाढू लागली आहे. कारण ४ जूनला एनडीएचा पराभव होऊन इंडिया आघाडीचेच सरकार येणार …

Read More »

सुनिल तटकरे यांची घोषणा, …आता ‘एकच लक्ष विधानसभा क्षेत्र’ पंधरा -वीस दिवसाने फेरमतदानाची मागणी करणे हे हास्यास्पद

आम्ही राज्यात स्पष्टपणाचे धोरण घेऊन ‘एकच लक्ष, विधानसभा क्षेत्र’ हे सुत्र घेऊन काम करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे ४ जूनच्या निकालाची फारशी वाट न बघता राज्यभरात पुन्हा एकदा संघटना वाढीसाठी आणि संघटना अधिक गतीमान करण्यासाठी विधानसभा क्षेत्रानुसार जिल्हानिहाय आढावा घेऊन पावले उचलली जात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल …

Read More »

पंतप्रधान मोदीकडून विरोधकांसाठी अपशब्द “मुजरा”, तर विरोधकांचा पलटवार देशातील पंतप्रधान पदावरील व्यक्तीकडून अपशब्दाचा वापर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी इंडिया आघाडीवर मुस्लीम व्होटबँकेसाठी लांगुचालन करण्याच्या गोष्टीला मुघल काळात राजे किंवा उच्चभ्रू लोकांसाठी गणिकांद्वारे केलेल्या ‘मुजरा’शी तुलना केली. पंतप्रधान मोदींच्या या टिप्पणीवर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत याला “दुर्दैवी” आणि “पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा कमी करणारे” वक्तव्य केल्याचा टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. बिहारमधील …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, पुणे नंतर आता नागपूरात ड्रंक अँड ड्राईव्ह, कडक कारवाई करा आरोपीच्या गाडीत दारूच्या बाटल्या आणि अंमली पदार्थ

पुणे येथील कल्याणीनगर येथे दाऊ पिऊन पोर्शे कार सुसाट चालवित दोघांचा निष्पाप बळी घेतल्याचे प्रकरण अद्याप ताजे असताना आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरातच आणखी एक ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडल्याची माहिती उघडकीस आली आहे. या घटनेनंतर काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल,… गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे का नाही? देवेंद्र फडणविसांच्या सत्ताकाळात महाराष्ट्र, राज्यातील जनता व कायद्याचे रक्षकही असुरक्षित

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. २०१४ पासून गृहमंत्रालय सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याला लाभलेले सर्वात निष्क्रीय व बेजबाबदार गृहमंत्री आहेत. पुण्यात दोन तरुणांना कारखाली चिरडून मारले जाते, जळगावातही तसाच प्रकार घडतो आणि आता कायद्याचे रक्षक असलेले तहसिलदार यांच्यावर भरदिवसा हल्ला होतो, गृहविभाग काय करतो, …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा इशारा,… मनुस्मृतीचा भाग वगळा अन्यथा रस्त्यावर उतरू शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा प्रकार म्हणजे जुने बुरसटलेले विचार व वर्णभेदाचा पुरस्कार

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न म्हणजे जुने बुरसटलेले विचार व वर्ण भेदाला पुरस्कृत करण्याचा प्रकार आहे. भाजपाला देशाच्या भवितव्याची चिंता नसून मनुवादी विचारांच्या ऱ्हासाची चिंता आहे म्हणूनच शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचे घाटत आहे. राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा (SCERT) ने जाहीर केला आहे. यात मनुस्मृतीचा समावेश आहे. हा …

Read More »

नाना पटोले यांची टीका, …बहाणे करु नका डोंबिवलीच्या कारखान्यातील स्फोटाला महाभ्रष्टयुती सरकारच जबाबदार

राज्यात दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर आहे, काही गावांना महिना महिना पाणी मिळत नाही, जनावरांना चारा नाही, पिण्याचे पाणी नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळ आढावा बैठक घेतली पण या बैठकीला ५ पालकमंत्री गैरहजर होते यातूनच सरकार दुष्काळावर गंभीर नाही हे स्पष्ट दिसते. मुख्यमंत्र्यांनी जागेवरच आदेश द्यायला पाहिजे होते …

Read More »