Tag Archives: congress

जयराम रमेश यांचा हल्लाबोल, उत्तर प्रदेशातील डबल इंजिनचे सरकार इंधनाअभावी…

मागील काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात बेबनाव निर्माण होत असल्याच्या अनेक चर्चा सध्या राजकिय क्षेत्रात ऐकायला मिळत आहेत. यापार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तर प्रदेशातील सहारनपुर येथे जाहिर सभा होत आहे. त्यानिमित्ताने काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी उत्तर प्रदेशातील डबल इंजिनचे सरकार …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका, जाहिरनाम्यावर मुस्लीम लीग आणि डाव्यांचा…

काँग्रेसने लोकसभा निवडणूकीसाठी म्हणून न्याय पत्र नावाने पक्षाचा राष्ट्रीय जाहिरनामा नुकताच प्रसिध्द केला. यावेळी जाहिरनाम्यात पहिल्यांदाच ग्यान अर्थात गरिब, तरूण, बेरोजगार, मजूर आणि महिलांचा समावेश करत या पाच-सहा वर्गांसाठी ५ न्याय व २५ गॅरंटीच्या गोष्टी जाहिर केल्या. काँग्रेसच्या या जाहिरनाम्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरपूस टीका करत काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम …

Read More »

बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक

बंगळुरू येथील प्रसिध्द रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट केल्याप्रकऱणी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने भाजपाच्या कार्यकर्त्यास आज ताब्यात घेतले. एनआयएने काही दिवसांपूर्वीच रामेश्वरम कॅफेत बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी १० लाख रूपयांचे बक्षित जाहिर केले होते. यापार्श्वभूमीवर एनआयएने आज या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपाचा कार्यकर्ता साईप्रसाद …

Read More »

राहुल गांधी यांचे वक्तव्य, इंडिया आघाडी एक वैचारिक निवडणूका…

सध्याच्या विद्यमान निवडणूका या इंडिया आघाडी वैचारिकतेच्या आधारावर निवडणूका लढवित आहे. तसेच लोकसभा निवडणूक ही संविधान आणि लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्यांचे रक्षण करणाऱ्या अशा दोन शक्ती यांच्यात होत आहे अशी भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी मांडली. काँग्रेस पक्षाचा न्यायपत्र जाहिरनामा जाहिर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, नाना, मतं मिळविण्यासाठी गिधाडवृतीने…

अकोल्याचे खासदार संजय धोत्रे प्रकृतीच्या कारणास्तव व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे, घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नये आणि मते मिळविण्यासाठी गिधाडांच्या वृत्तीने वागू नका, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स समाज माध्यमावर नाना पटोले यांना …

Read More »

नाना पटोले म्हणाले, सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा संकल्प असलेले काँग्रेसचे ‘न्यायपत्र’

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याची मध्यवर्ती संकल्पना न्याय ही आहे. मागील १० वर्षांत प्रत्येक घटकाचा न्याय धोक्यात आला आहे, कमकुवत झाला आहे तर काही बाबतीत न्याय नाकारलाही आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाने पाच न्याय व २५ गॅरंटी देत देशातील सर्व समाज घटकांना न्याय …

Read More »

काँग्रेसचा न्यायपत्र जाहिरनामा जाहिर; ग्यान GYAN वर आधारीत

लोकसभा निवडणूक २०२४ च्या राजकिय लढाईचा ज्वर आता वाढायला लागला आहे. आतापर्यंत निवडणूकीसह रोजच्या रोज देशातील चर्चेचे मुद्दे आणि प्रचाराचे मुद्दे अग्रकमाबाबत भाजपा नेहमीच आघाडी घेतली आहे. त्यानंतर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी जाहिर करण्यापासून ते प्रचाराची दिशा ठरविण्याबाबत सध्यातरी भाजपाचा वरचष्मा दिसून येतो. परंतु यावेळी भाजपाच्या तोडीस तोड काँग्रेसने अनेक …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, वंचितने सातत्याने अपमान केला… देशाचे संविधान, लोकशाही महत्वाची

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सातत्याने आपल्या महापुरुषांचा अपमान केला, संवैधानिक पदावर बसून भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रिबाई फुले, ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचा अपमान केला. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी महापुरुषांचा अपमान केला. राज्यातील धर्मांध शक्तीने शाहु, फुले, आंबेडकरांचे विचार संपवण्याचे काम केले आहे. मतविभाजन …

Read More »

संध्या सव्वालाखे यांची टीका, महिला अत्याचाऱ्यांचे समर्थन करणाऱ्या भाजपाने…

भारतीय जनता पक्ष, तसेच त्यांचे सर्वोच्च नेते यांनी महिलांचा सातत्याने अपमान केला आहे. भाजपाच्या नेत्यांची महिलांबद्दल काय धारणा आहे ते जगाने पाहिले आहे. काँग्रेची विधवा, ५० करोड की गर्लफ्रेंड, दिदी ओ दिली, शर्पूणखा असा उल्लेख करुन महिलांचा अपमान करणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभते का? याचे उत्तर आधी भाजपाच्या महिला …

Read More »

डॉ भालचंद्र मुणगेकर यांचा आरोप, वंचित बहुजन आघाडीची भूमिका भाजपाला अनुकूल

लोकसभेची सध्याची निवडणूक देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत निर्णायक आहे. ती भारतीय जनता पक्ष विरुद्ध इंडिया आघाडी अशी नसून नव फॅसिस्ट शक्ती विरोधातील निवडणूक आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका हिटलरविरोधी आणि लोकशाहीच जनतेला खरा न्याय देऊ शकते अशी होती. या विचारांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका घेतली …

Read More »