भिवंडी (पूर्व) येथील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून येत्या पावसाळी अधिवेशनात पहलगाममधील भयानक दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारा आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी सशस्त्र दलांनी दिलेल्या जलद आणि निर्णायक प्रतिसादाबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा विशेष ठराव मांडण्याची मागणी केली …
Read More »सैन्यदलाच्या शौर्याला वंदन करण्यासाठी भाजपा महिला मोर्चा तर्फे राज्यभर ”सिंदूर यात्रा’’ भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ यांची माहिती
पहलगाम येथे २६ निरपधराध भारतीयांच्या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर द्वारे मोदी सरकारने चोख उत्तर दिले. पहलगाम हल्ल्यात ज्यांचे कुंकू पुसले गेले अशा आपल्या भगिनींच्या अश्रूचा भारतीय सैन्याने बदला घेतला. भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रदेश महिला मोर्चातर्फे राज्यभर सिंदूर यात्रांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती भाजपा …
Read More »औरंगजेब वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अबु आझमी यांना न्यायालयाचा दिलासा अबु आझमींना अटकेपासून दिले संरक्षण
मुघल बादशाह औरंगजेबबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे समाजवादी पक्षाचे नेते आणि मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबु आझमी यांना सत्र न्यायालयाने २० हजार रुपयांच्या बाँण्डवर अटकेपासून संरक्षण दिले. औरंगजेबबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकऱणी अबु आझमी यांच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. त्याप्रकऱणी अटकेपासून संरक्षण मिळावे, म्हणून अबु आझमी यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला …
Read More »शक्तीपीठ महामार्गः १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा एल्गार शक्तीपीठ महामार्गविरोधात बुधवारी विधानभवनावर धडक
शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही असा एल्गार पुकारत येत्या बुधवारी अधिवेशन काळात मुंबईतील विधानभवनावर १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समनव्यक गिरीश फोंडे यांनी रविवारी दिली. आझाद मैदानात सकाळी ९ वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. राज्यभरातून या मोर्चाला …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी रद्दचा आदेश कधी? राहुल गांधी आणि सुनिल केदार यांच्याबाबत २४ तासात आदेश
आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत न्यायालयाने आदेश दिल्यानंतर २४ तासाच्या आत खासदार की करण्यात आली. तर काँग्रेसचे राज्यातील आमदार सुनिल केदार यांची आमदारकी त्याच न्यायाने २४ तासात रद्द केली. मात्र आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार असा सवाल …
Read More »मतदार यादीत घोळ केल्याप्रकरणी गणेश नाईक यांच्या आमदाराकीला आव्हान उच्च न्यायालयाने गणेश नाईक यांना बजावली नोटीस; भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
ऐरोली विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्या आमदारकीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मतदार यादीत घोळ केल्याचा आणि निवडणूक प्रक्रियेचे योग्यरित्या पालन न केल्याचा आरोप याचिकेतून केला आहे. याचिकेची दखल घेऊन सोमवारी उच्च न्यायालयाने नाईक यांना नोटीस बजावली आणि भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. ऐरोली विधानसभा मतदारसंघात मोठ्या …
Read More »मंत्री म्हणाले होते, लव्ह जिहाद प्रकरणाची माहिती ऐकिव, पण सरकार आणतेय कायदा लव्ह जिहाद कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी समितीची स्थापना
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राज्यांप्रमाणे मुंबईसह राज्यात, भाजपाच्या दाव्यानुसार हिंदू-मुस्लिम धर्मियातील लव्ह बर्ड्संना अटकाव करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपा प्रणित महायुती सरकारही लव्ह जिहादचा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे राज्यात लव्ह जिहाद प्रकरणाची एक लाख तक्रारी असल्याची ऐकिव माहिती असल्याचा खुलासा तत्कालीन महिला व बालविकास मंत्र्यांनी अधिवेशन काळात विधानसभा सभागृहात केला …
Read More »ठाणे न्यायालयाचे आदेश, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा हेट स्पीच प्रकरणी वकील खुश खंडेलाल यांनी दाखल केली होती याचिका
ठाण्यातील एका न्यायालयाने ३ फेब्रुवारी रोजी पोलिसांना महाराष्ट्राचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याचे निर्देश दिले, ज्यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी विविध समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवण्याच्या उद्देशाने विधान केल्याचा आरोप आहे. न्यायिक प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, ठाणे, न्यायाधीश महिमा सैनी यांनी भाईंदर पोलिसांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट)/राष्ट्रवादी …
Read More »उत्तम जानकर यांचा खळबळजनक दावा, १५० मतदारसंघात ईव्हीएम गडबड, युगेंद्र पवारच विजयी महायुतीला फक्त १०७ जागेवरच विजय
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या मतदारसंघातील मारकडवाडी गावात त्यांच्यापेक्षा भाजपाच्या उमेदवाराला मतदान जास्त झाल्याच्या मुद्यावरून गावात मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या हालचाली सुरु केल्या. मात्र त्यास निवडणूक आयोगासह स्थानिक प्रशासनाने आक्षेप घेतला. त्यामुळे पुढील होणारा संभावित संघर्ष टळला. त्याचबरोबर निवडणूक आयोग जर मतपत्रिकेवर मतदान घेणार असेल तर आपण आमदारकी …
Read More »सुरेश धस यांचा सवाल, “आका” कडे एवढे पैसे कुठून आले? वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केली टीका
बीड जिल्ह्यातील आष्टीचे भाजपा आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने निशाणा साधला आहे. शुक्रवारी त्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले. यावेळी बोलताना सुरेश धस म्हणाले की, ‘आका’कडे १०० ते …
Read More »
Marathi e-Batmya