आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत न्यायालयाने आदेश दिल्यानंतर २४ तासाच्या आत खासदार की करण्यात आली. तर काँग्रेसचे राज्यातील आमदार सुनिल केदार यांची आमदारकी त्याच न्यायाने २४ तासात रद्द केली. मात्र आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार असा सवाल यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मानहानी प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची खासदारकी २४ तासांत रद्द करण्यात आली. सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी २४ तासांत आमदारकी रद्द केली. आता, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार आहे? असा सवालही यावेळी केला.
मानहानी प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची खासदारकी २४ तासांत रद्द करण्यात आली.
सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी २४ तासांत आमदारकी रद्द केली.
आता, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी…
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 21, 2025
विजय वडेट्टीवार म्हणाले की, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत म्हणून राजीनामा घेऊ शकत नाही, असे म्हणणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजूनही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा का घेतलेला नाही? त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले, न्यायालयाने शिक्षा सुनावली, तरी त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही असेही यावेळी सांगितले.
शेवटी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्ता आहे म्हणून ‘आम्ही करू तो न्याय आणि आम्ही देऊ तो दंड‘ ही सत्तेची मस्ती नाही तर आणखी काय ? असा खोचक टोलाही यावेळी लगावला.
आरोपीचे नाव : माणिकराव कोकाटे
पद: महायुती सरकारमध्ये कृषी मंत्री
झालेली शिक्षा: २ वर्ष कारावास, ५०,००० रुपयांचा दंड.
गुन्हा: कागदपत्रांची फेरफार करून आर्थिक फसवणूक .शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. आता तरी… pic.twitter.com/WzQfdY8KPG
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 20, 2025
Marathi e-Batmya