जवळपास २७ वर्षांपूर्वी घडलेल्या, पुण्यातील एकाच कुटुंबातील दोन मुलांसह चार जणांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केली. उच्च न्यायालयाने पुढे सांगितले की, फाशीची शिक्षा कायम ठेवण्यासारखे हे प्रकरण नाही. त्यामुळे आरोपी भागवत बाजीराव काळे हे फाशीच्या शिक्षेसाठी पात्र ठरत नसल्याचे निरीक्षण न्या. भारती …
Read More »उच्च न्यायालयाचे निरिक्षण, केवळ छळाचा आरोप ही क्रूरता नव्हे राज्य सरकारने केलेले अपील फेटाळून लावले
सासरच्यांविरोधात निव्वळ छळा किंवा पैशांची मागणी केल्याचा आरोप ही क्रूरता ठरत नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नुकतेच एका प्रकरणादरम्यान नोंदवले. याचिकाकर्ता महिलेने सासरच्या मंडळींनी क्रूरतेची वागणूक दिल्याचा आरोपाचे उत्तर अनुत्तरीत आहे. सासरच्या मंडळींविरोधात निव्वळ छळवणुकीचा किंवा पैशांच्या मागणी केल्याचा आरोप करणे ही क्रूरता मानता येणार नाही. किंबहुना, भादंवि कलम ४९८(अ) मधील …
Read More »उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, जिंकलेल्यांना त्यांच्या विजयावर विश्वास नाही… भाजपा आणि मनसेवर टीका
विधानसभा निवडणूकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने १०० हून अधिक ठिकाणी उमेदवार उभे केले. इतकेच नव्हे तर माहिममधून त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनाही पहिल्यांदाच उमेदवारी दिली. परंतु मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा एकही उमेदवार निवडूण आला नाही. त्यातच भाजपाने सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या तरी विजयाचा उत्सव साजरा केला जात …
Read More »१७३ आमदारांनी घेतली ५ भाषांमध्ये घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ ७ जणांनी घेतली संस्कृतमध्ये, दोघांनी हिंदीत घेतली शपथ
राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास आजपासून सुरु झाले. या अधिवेशनात पहिले दोन दिवस निवडूण आलेल्या सदस्यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज सत्ताधारी भाजपा आणि महायुतीतील असे मिळून १७३ आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी बहुतांश आमदारांनी मराठीत शपथ घेतली. तर काही जणांनी संस्कृत, उर्दू आणि हिंदी भाषेत …
Read More »मुंबईतल्या झोपडपट्टी पुर्नवसन प्रश्नी आता उच्च न्यायालयाचा पुढाकार उच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
मुंबईकरांना आणि मुंबईवर परिणाम करणाऱ्या मुख्य आणि ज्वलंत समस्यांवर प्रामुख्याने लक्ष देणे आवश्यक असून या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. मुंबईतील झोपडपट्टी क्षेत्र ओळखून घोषित करताना यातील गुंतागुंतीसह झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याच्या (झोपु) अंमलबजावणीवर परिणाम करणाऱ्या १०० हून अधिक समस्यांवर प्रकाश टाकणारा अहवाल गुरुवारी उच्च न्यायालयात …
Read More »मालवण शिवपुतळा प्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल, नौदल अधिकारी सहआरोपी का नाही? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
मालवण येथील दुर्घटनाग्रस्त शिवपुतळासाठी निविदा कोणी काढल्या?, तो पुतळा कसा उभारावा हे कोणी ठरवले? जर नौदलाने या पुतळ्यासाठी निविदा काढल्या तर जयदीप आपटे यांना कोट्यवधी रुपये देण्यापूर्वी पुतळ्याचे बांधकाम योग्य आहे की नाही याची पाहणी कोणत्या नौदल अधिकाऱ्याने केली?, ही पाहणी केल्याशिवाय पुतळ्याच्या बांधकामाचे पैसे दिले गेले का?, अशी प्रश्नांची …
Read More »उच्च न्यायालयाचे आदेश विक्रीकर अधिकाऱ्याची अटक बेकायदा सुनावणीवेळी दिले उच्च न्यायालयाने आदेश
ऑगस्ट २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत १६ अपात्र कंपन्यांना एकूण १७५ कोटी रुपयांचा फसवा कर परतावा दिल्याबद्दल अटक केलेल्या विक्रीकर अधिकारी अमित लालगे यांची अटक बेकायदेशीर आणि मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी असल्याचे स्पष्ट करून न्यायालयाने त्यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. कोणत्याही व्यक्तीला का अटक करण्यात आली आहे त्याची …
Read More »उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरांच्या आईचा शस्त्र परवानाप्रकरणी पोलिस आयुक्तांचा आदेश रद्द प्रकरण नव्याने ऐकण्याचे पुणे पोलीस आयुक्तांना उच्च न्यायालयाचे आदेश
भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) उमेदवारी रद्द केलेली प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा पुणे पोलीस आयुक्तांचा आदेश उच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला. तसेच, पोलीस आयुक्तांकडे हे प्रकरण नव्याने ऐकण्यासाठी वर्ग केले. शस्त्र परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यापूर्वी मनोरमा यांना कायद्याने बंधनकारक असलेली नोटीस बजावण्यात आल्याचा …
Read More »मुंबईतील ६५ किमीचे रेल्वे ट्रॅक बदलले १२६ किमीचे ट्रॅक बदलणार कल्याण ते लोणावळा आणि इगतपुरी पनवेल दरम्यानच्या ट्रॅकचा समावेश
मध्य रेल्वेने मुंबईत सुरू असलेल्या ट्रॅक बदलण्याच्या कामात उल्लेखनीय प्रगती साधली असून, या वर्षी एप्रिलपासून ६५ किमीचे नवीन ट्रॅक बसवले आहेत. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्याचे ट्रॅक त्यांच्या कार्यान्वित कालावधीच्या शेवटी पोहोचले असल्याने बदलणे आवश्यक आहे. एका वृत्तानुसार, एप्रिल २०२५ पर्यंत एकूण १२६ किमी ट्रॅक बदलण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट …
Read More »उच्च न्यायालयाचे आदेश, संपादित केलेल्या जमिनीची उर्वरित भरपाई मालकाला द्या मालमत्तेच्या मौल्यवान अधिकारापासून जमीन मालकाला वंचित ठेवता येत नाही
एखाद्या जमीन मालकाला मालमत्तेच्या मौल्यवान अधिकारापासून वंचित ठेऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. नवी मुंबईतील पनवेल तालुक्यातील अशोक आणि अतुल पुराणिक या दोन भावांच्या भूसंपादन कायद्यांतर्गत संपादित केलेल्या जमिनीची उर्वरित नुकसान भरपाईही सहा आठवड्यांत देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले. मालमत्तेचा अधिकार घटनात्मक अधिकार आहे. परंतु, एका कुटुंबातील मालमत्तेच्या …
Read More »
Marathi e-Batmya