Tag Archives: ncp

आता सर्वोच्च न्यायालयानेही दिली गुटखा व्यापाऱ्यांवर या कलमाखाली कारवाईला परवानगी गुटखाबंदी संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

मुंबई : प्रतिनिधी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी सोबत फक्त भारतीय दंड संहितेचे कलम १८८ लागू होते,असा निर्णय उच्च न्यायालय ,खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री  डॉ राजेंद्र शिंगणे यांनी स्वतः पुढाकार घेऊन व पाठपुरावा केला व  राज्य सरकारतर्फे अन्न सुरक्षा व मानदे …

Read More »

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला ही आंनददायी बाब - छगन भुजबळ

मुंबई : प्रतिनिधी ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक शहरात होणार असल्याची घोषणा आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली आहे. नाशिकला हा बहुमान मिळाल्याने आपल्यासाठी अतिशय आनंददायी बाब असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री …

Read More »

ना तुला ना मला घाल तिसऱ्याला असे होवू नये यासाठी चर्चा सुरुय तिघांचे सरकार चालवत असताना काही विषय कधीही निघू शकतात- अजित पवार

मुंबई: प्रतिनिधी हे तीन पक्षांचे सरकार आहे. किमान समान कार्यक्रम आम्ही तिघांनी ठरवला आहे. त्यामुळे तिघांचे सरकार चालवत असताना काही विषय कधीही निघू शकतात. याबाबत एकत्र बसून चर्चा करून योग्यपद्धतीने मार्ग काढू असे सांगतानाच यासंदर्भात आज आमची बैठक आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना दिली. …

Read More »

ही कसली शिवसेना, ही तर औरंगजेब सेना भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यात शिवसेनेची भूमिका अत्यंत दुटप्पी आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिली नसून ती आता औरंगजेबसेना झाली आहे अशी टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सत्तेत असूनही …

Read More »

पुण्यातील या पोलीस ठाण्यांच्या विभाजनाला मान्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी पुणे शहरात नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांसह वाढते शहरीकरण लक्षात घेऊन पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील पोलीस ठाण्यांच्या विभाजनाला मान्यता देण्यात आली. तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पुणे जिल्ह्यातील वाघोली, ऊरळीकांचन, बाणेर, काळेपडळ, खराडी, फुरसुंगी, म्हाळुंगे, रावेत आणि शिरगाव या नवीन पोलीस ठाण्यांना मंजूरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या …

Read More »

विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये स्थापन होणार ‘विद्यार्थिनी उद्योजकता क्लब’ कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून राज्यातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमध्ये स्वतंत्र ‘महिला उद्योजकता कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमधील ३० टक्के निधी महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी वापरणे, विद्यार्थीदशेतच महिलांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यासाठी …

Read More »

सीबीआय काही करू शकत नसल्याने ईडीचा वापर गृहमंत्री अनिल देशमुख यांची भाजपावर टीका

मुंबई: प्रतिनिधी भाजप नेत्यांच्या विरोधात किंवा धोरणाविरोधात बोलल्यावर लगेच ईडीची नोटीस पाठवण्यात येते. हेच काम सुरुवातीला सीबीआय करत होते. परंतु राज्यात चौकशी करायची असेल तर राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल असा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने  सीबीआयबाबत आता केंद्र काही करु शकत नसल्याची टीका राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केली. …

Read More »

पार्थ बाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून पार्थ नव्हे तर स्थानिक कार्यकर्त्याला संधी

मुंबई: प्रतिनिधी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. या मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे मत विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे …

Read More »

आठवलेंना त्यांच्याच कविता स्टाईलमधून गृहमंत्र्यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या वाढदिनाचे औचित्य

मुंबई : प्रतिनिधी आज नाताळचा दिवस असल्याने सर्वत्र उत्सवाचे वातावरण असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस आहे. या दिनाचे औचित्य साधत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून देशमुखांनी आपल्या खुमासदार शैलीतून कविता रंगवली आहे. वाचू या त्यांच्याच भाषेतील कविता. बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडीबाहेर फिरू …

Read More »

लोकसहभागासाठी मंत्री जयंत पाटलांचा आगळावेगळा इस्लामपूर पॅटर्न बुथ कमिट्यांच्या बैठकांसाठी घरोघरी पत्र पाठवून देतात आमंत्रण

सांगली : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात जयंत पाटील यांचा आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यपद्धतीसाठी नावलौकीक आहे. असाच एक नावलौकिक मिळवलेला त्यांचा आगळावेगळा ‘इस्लामपूर पॅटर्न’ आता नव्याने समोर आला आहे. लोकसहभागाचा दृष्टिकोन राखून इस्लामपूर मतदारसंघातील बुथ कमिट्यांच्या बैठकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या कार्यालयातून घरोघरी आमंत्रण पत्र पाठवले जात आहे. आपला …

Read More »