Tag Archives: ncp

कृषी विधेयक फायद्याचे असते तर शेतकरी रस्त्यावर उतरला नसता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपाला टोला

मुंबई : प्रतिनिधी शेतकर्‍यांच्या पोटाला चिमटा बसल्यावरच तो रागाने रस्त्यावर येतो व आंदोलनात सहभागी होतो. जर कृषी विधेयक शेतकर्‍यांच्या फायद्याचं आहे असं केंद्र सरकार बोलत असेल तर शेतकरी या विधेयकाच्या विरोधात रस्त्यावर उतरला नसता असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना लगावला. जनता दरबारासाठी उपमुख्यमंत्री …

Read More »

पीएम वायफाय म्हणजे एका विशिष्ट कंपनीच्या एकाधिकारशाहीसाठी केंद्राची पावले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी टेलिकॉम सेक्टरमध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांच्या सर्व्हिसेसमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. ही सगळी व्यवस्था देशात निर्माण होत चालली असून सर्व टेलिकॉम सेक्टरमध्ये एकाधिकारशाही निर्माण करण्याच्यादृष्टीने केंद्रसरकारची पावले पडत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. टेलिफोन बुथसारखी वायफाय सेंटर उघडण्याची …

Read More »

राज्य सरकारने दिली शरद पवारांना आगळीवेगळी वाढदिवासाची भेट या योजनेला दिले पवारांचे नाव

मुंबईः प्रतिनिधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. १२ डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस असून या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या नावे योजना सुरु करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. कामांतून सामूहिक आणि वैयक्तिक …

Read More »

राज्य मंत्रिमंडळात झाली या मुद्यावरून वादळी चर्चा राजकिय कुरघोडी करण्याच्या नादात मंत्र्यांमध्ये तू तू मै मै

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील जनतेच्या विकासाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी काल बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधीच्या वाटपावरून चांगलीच खडाजंगी झाली असून वित्त विभागाच्या धोरणामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये चांगलीच तू तू मै मै झाल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. काँग्रेसच्या मंत्र्यांकडून काही नव्या योजनांना मान्यता मिळविण्यासाठी मंत्रिमंडळाच्या …

Read More »

खबरदार! महिला व बालकांवर अत्याचार कराल तर थेट फाशीवर लटकाल अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी दिक्षा कायद्याच्या धर्तीवर शक्ती कायदा आगामी अधिवेशनात विधिमंडळात मांडण्यात येणार असून आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीला तात्काळ अटक करून १५ दिवसात तपास करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. …

Read More »

कापसाच्या खरेदी-विक्रीसाठी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ॲप नवीन ३० कापूस खरेदी केंद्र नियोजित- पणन मंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई : प्रतिनिधी सन २०२०-२१ मधील हमी दरावरील कापूस खरेदी-परतावा आणि कापूस लागवडीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील एका केंद्राची निवड करून ॲपद्वारे त्यांची इत्यंभुत माहिती अद्ययावत करावी. जेणेकरून शासनाकडे शेतकऱ्यांची अचूक माहिती संकलित होईल आणि कापूस परतावा योग्य वेळेत शेतकऱ्यांना मिळेल, अशी आशा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील …

Read More »

मुंबई समिश्र तर राज्यात भारत बंदला चांगला प्रतिसाद भाजपा वगळता सर्वपक्षियांचा सहभाग

मुंबईः प्रतिनिधी केंद्राच्या शेती कायद्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदला भाजपातेर सर्व पक्षियांनी संपूर्ण पाठिंबा देत मुंबईसह राज्यातील अनेक भागात आंदोलन करत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. या बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबईसह राज्यातील अनेक रिक्षा संघटनांनी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आपला व्यवसाय बंद ठेवून बंदमध्ये सहभागी होत शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दिला. विशेषतः …

Read More »

पवारांच्या पत्रावरून अल्पसंख्याक मंत्री मलिक यांचा फडणवीसांवर पलटवार पवारांनी बाजार समित्यांचे अधिकार केंद्राकडे हस्तांतरीत केले नाहीत

मुंबईः प्रतिनिधी शरद पवार (Sharad Pawar) यांनी खाजगी उद्योगांना(Privet Businessman)  शेती क्षेत्रात (Farming Sector) येण्यास कधीही प्रोत्साहन देत राज्यातील बाजार समित्यांचे (APMC) अधिकार केंद्राकडे हस्तांतरीत केले नाहीत. मात्र केंद्र सरकारने शेतीविषयक आणलेल्या तीन विधेयकांपैकी २ विधेयकात राज्यांना अधिकारच दिले नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक …

Read More »

केंद्राचा शेतकरी कायदा पहिल्यांदा महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने मंजूर केलेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी सध्या केंद्राने मंजूर केलेल्या शेतकरी कायद्याच्या (Farmers law) विरोधात आंदोलन सुरु आहे. मात्र हा कायदा सर्वात आधी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या (INCCongress-Ncp) आघाडी सरकारने मंजूर केला होता. तसेच केंद्रात कृषीमंत्री असताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत सर्व राज्य सरकारांना पत्र पाठविल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र …

Read More »

भारत बंद आंदोलनात हे ११ राजकिय पक्ष होणार सहभागी संयुक्त निवेदन जाहीर

मुंबई : प्रतिनिधी चर्चेविना केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विधेयकांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी ८ डिसेंबर २०२० रोजी भारत बंदची हाक दिली. त्या हाकेला प्रतिसाद देत देशभरातील ११ राजकिय पक्षांनी पाठिंबा देत त्यात सहभागी होणार असल्याचे संयुक्त पत्रकही काढण्यात आले. या भारत बंद आंदोलनात काँग्रेसने सक्रिय सहभाग घेणार असल्याचे …

Read More »