राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत असून, त्यानंतर १ जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांची आरटीओमधील अनेक महत्वाची कामेही रोखण्यात येणार आहेत. एचएसआरपी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन, ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ ५० लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प
‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रातील शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचे सर्वात मोठे यश आहे. आजचे १८ हजार शेतकरी गट पुढील काळात ५० लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वर्षा निवासस्थानी पानी फाऊंडेशनच्या सहकार्याने …
Read More »नरसापूर प्रकरणी भीमराव कांबळेस ५५ दिवसात न्यायालयाने दिली फाशीची शिक्षा सर्वात कमी कालावधीत न्यायालयाने दिला निकाल
काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील नसरापूर गावात ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पुण्यातील एका विशेष न्यायालयाने ६५ वर्षीय व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली. परिस्थितीजन्य पुरावे आणि सरकारी पक्षाचा ‘गुन्ह्याच्या वेळी आरोपी आणि पीडिता यांना शेवटचे एकत्र पाहिले गेले होते’ (last seen together) या सिद्धांताच्या आधारे आरोपीला दोषी ठरवून, गुन्हा …
Read More »सुजात आंबेडकर यांची मागणी, टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा राज्यातील परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह
देशभरात नीट NEET पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले असताना, आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीची घटना समोर आल्याने राज्यातील परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका करत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी जबाबदारी स्वीकारून …
Read More »केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या तयारीसाठी किसान सभेची बैठक राष्ट्रीय स्तरावर शेतकरी आंदोलनाच्या नियोजनासाठी मुंबईत बैठक
अखिल भारतीय किसान सभेच्या केंद्रीय किसान कमिटीची राष्ट्रीय बैठक मुंबई येथील वायएमसीए YMCA इंटरनॅशनल हाऊस, मुंबई येथे २८ व २९ जून २०२६ रोजी दोन दिवस संपन्न होत आहे. अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, सरचिटणीस विजू कृष्णन, उपाध्यक्ष खासदार आमरा राम, माजी खासदार हनन मोला, पी. कृष्णप्रसाद, …
Read More »एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा दोन्ही जिल्ह्यातील महिला, शेतकरी, बचत गट, स्वयंसहायत्ता गटांसाठी बँक काम करेल
ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने २१ पैकी १६ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवल्याबद्दल शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अभिनंदन केले. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची निवडणुकीत सरशी झाली. सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडून आलेले संचालक ठाणे आणि पालघर जिल्ह्यात …
Read More »टीईटी TET पेपरफुटी विरोधात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर युवक काँग्रेसचे आंदोलन मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी फडकावले ‘दादा भुसे राजीनामा द्या’ पोस्टर; ‘पेपरचोर गद्दीछोड’च्या घोषणांनी परिसर दणाणला
राज्यातील टीईची TET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेविरोधात आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयासमोर तसेच शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. नीट NEET नंतर आता टीईटी TET चा पेपर फुटला आहे. प्रत्येक परीक्षेचे पेपर फुटत आहेत. …
Read More »राम मंदिर दान चोरी प्रकरणी नवी माहिती बाहेर चोरी प्रकरणाची माहिती आधीच रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला होती
राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणात नवीन तपशील समोर आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला हे प्रकरण सार्वजनिक होण्याच्या काही दिवसांपूर्वीच संशयास्पद गैरव्यवहाराची माहिती मिळाली होती. सूत्रांनुसार, महासचिव चंपत राय यांच्या सूचनेनुसार, ट्रस्टच्या प्रतिनिधींनी ५ जून रोजी आरोपींपैकी एक असलेल्या अविनाश शुक्लाच्या निवासस्थानी पोलिसांसोबत भेट …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे वाहतूक व मालवाहतुक होणार वेगवान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्ग प्रकल्पाची पाहणी
भारत सरकार मार्फत सुमारे १ लाख कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारा सुमारे १,४०० किलोमीटर लांबीचा, ८ पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड द्रुतगती मार्ग हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या पाच राज्यांना जोडणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा प्रवास मोठ्या प्रमाणात वेगवान होणार असून देशातील प्रमुख औद्योगिक …
Read More »डॉ राजेश गवांदे यांचे मत, महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र बनविण्यासाठी शासन कटिबद्ध आंतरराष्ट्रीय डिजिटल दंतचिकित्सा काँग्रेस २०२६ अंतर्गत उद्योग गोलमेज परिषद
महाराष्ट्राला मौखिक आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य गुंतवणूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, परकीय थेट गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच देशांतर्गत उद्योगांच्या विकासालाही प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन राजशिष्टाचार, परकीय थेट गुंतवणूक, प्रवासी भारतीय व्यवहार व जनसंपर्क विभागाचे सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ.राजेश गवांदे यांनी केले. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, …
Read More »
Marathi e-Batmya