Editor

पालघर जिल्ह्याच्या विकासाला वेग- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतू प्रकल्पांची मुख्यमंत्री फडणवीसांनी केली पाहणी

राज्याच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासाला नवी गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा प्रत्यक्ष आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी वाढवण बंदर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, प्रस्तावित वाढवण आंतरराष्ट्रीय विमानतळ, नारिंगी खाडी पूल आणि उत्तन–विरार सागरी सेतू या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामांची पाहणी करून संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना …

Read More »

सत्यमेव जयते फार्मर कपचा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

पानी फाऊंडेशन मार्फत २०२२ पासून ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा’ महाराष्ट्रात ४६ तालुक्यात सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पानी फाऊंडेशन यांच्या प्रयत्नाना सुरूवातीपासूनच साथ लाभली आहे. विविध टप्प्यात शेतक-यांसाठी काम करत असलेल्या ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2026’ चा शुभारंभ सोमवार दिनांक २९ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबई …

Read More »

दत्तात्रय भरणे यांची माहिती, कृषी दिनानिमित्त १८९ पुरस्कारार्थ्यांचा होणार गौरव कृषी दिनानिमित्त राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा-२०२६

हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कृषी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दिनांक १ जुलै २०२६ रोजी डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी, मुंबई-१८ येथे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सन २०२३ व २०२४ …

Read More »

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची माहिती, टीईटी पेपर फुटी प्रकरणाची शासनाकडून गंभीर दखल दोषींवर कठोर कारवाई केली जाईल

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात आलेली ‘शिक्षण पात्रता परीक्षा’ (TET) २०२६ पेपरफुटीची घटना घडल्याने पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. …

Read More »

मुंबईतील मोहरमच्या मिरवणूकीत विषाने भरलेल्या कॅप्सुलच्या माध्यमातून, मोठा घातापाताचा कट उंदिर मारण्याच्या विषाने भरलेली १४ हजार ९०० कॅप्सूल केली जप्त

मुंबई पोलिसांनी एका संशयिताकडून विष भरलेल्या १४,९०० कॅप्सूल जप्त करून मोहरमच्या मिरवणुकीला लक्ष्य करण्याचा कथित कट उधळून लावल्याचा दावा केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान विष भरलेल्या कॅप्सूल वाटून मोठी दुर्घटना घडवण्याची योजना आखली होती. या कॅप्सूलचे वितरण होण्यापूर्वीच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून १४,९०० विषारी कॅप्सूल …

Read More »

एकनाथ शिंदे यांची ग्वाही, रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगड किल्यावर उत्साहात साजरा

रायगडावर पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गडावरील पाणीपुरवठा योजनेला नक्की मंजुरी देऊ अशी घोषणा उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, यासोबतच यंदा पावसाने काहीशी ओढ दिली असली तरीही अवघड परिस्थिती आल्यास महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकणकडा मित्र …

Read More »

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार सहकार विभागाची माहिती

महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि संस्कृती ही कृषी क्षेत्राभोवती फिरते. परंतु, गेल्या काही वर्षांत निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलले आहे. कधी अवेळी येणारा पाऊस, कधी तीव्र दुष्काळ, तर कधी गारपीट, अतिवृष्टी आणि महापूर… एकामागून एक येणाऱ्या या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील बळिराजा पुरता कोलमडून गेला आहे. कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकलेल्या या शेतकरी बांधवांला पुन्हा …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आदेश, टीईटी पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका लावावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार

टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि अत्यंत कठोर चौकशी …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, पक्ष फोडण्यासारखे पेपर फुटीचेही पेव फुटले, सरकार नावाची व्यवस्था आहे की नाही? टीईटी पेपर फुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कडक शिक्षा करा

रविवारी होणाऱ्या TET परीक्षेचा पेपर ठाण्यात लीक झाल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत असून भाजपा महायुती सरकारला एक परिक्षाही घेता येत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पेपर फुटीच्या घटनांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली आहे. या पेपरफुटीच्या रॅकेटच्या मुळापर्यंत जाऊन मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळा. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याऱ्यांना अशी …

Read More »

काँग्रेस पक्षाच्या ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीरः यादी पहा संघटन सृजन अभियानांतंर्गत स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा करून नियुक्त्या

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशभरात पक्ष संघटना बांधणीवर भर देत संघटन सृजन अभियान हाती घेतले असून या अभियातून जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याच अभियानाच्या धर्तीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात ब्लॉक अध्यक्ष नियुक्तीची प्रक्रिया राबिवली आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती करून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून …

Read More »