Editor

४४ हजार कोटींचे ‘अर्बन चॅलेंज फंड’ अभियान; मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशीच शासन निर्णय जारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशीच आज नगर विकास विभागाने  ‘अर्बन चॅलेंज फंड’ अभियानाची राज्यातील सर्व ४२३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढला आहे. राज्यात ४४ हजार ८०० कोटी रुपयांचे विकास प्रकल्प यातून आकाराला येणार असून यामुळे शहरांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास …

Read More »

परळीत नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयासाठी १३ हेक्टर शासकीय जमीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

बीड जिल्ह्यातील परळी येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय उभारण्यासाठी १३ हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. महसूल व वन विभागाने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. सर्व्हे क्रमांक ४७८ मधील १३ हेक्टर …

Read More »

विद्यार्थ्यांवरील अत्याचाराविरोधात ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हा: ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

मुंबई : विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार करण्यात आला याचा निषेध आहे आणि शासनाचा विरोध करण्याचं महाराष्ट्राने सुरुवात केलेली आहे. यापुढे विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला होऊ नये, छर्रे, गोळ्या, अश्रुधुर चालवू नये यासाठी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने या बंद मध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई …

Read More »

एकनाथ शिंदे यांची भावनिक प्रतिक्रिया, एका डोळ्यात आनंद, दुसऱ्या डोळ्यात अश्रू… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या आठवणींची हुरहूर; "दादांची स्वप्ने पूर्ण करणे हीच दादांना खरी आदरांजली" – एकनाथ शिंदे

Eknath-Shinde-Ajit-Pawar-Together

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत भावनिक शब्दांत त्यांना अभिवादन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आणि महायुतीचे शिल्पकार अजितदादा पवार यांच्या आठवणींचे दुःख, अशा संमिश्र भावनांनी आजचा दिवस भरून गेल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आजचा दिवस एका डोळ्यात आनंद …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’ला बळ पुणे जिल्ह्यातील मावळ व खेड परिसरात ‘शुभ आरंभ’ उपक्रमातून उल्लेखनीय परिवर्तन

राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रभावी साथ लाभत आहे. शासन आणि उद्योग क्षेत्राच्या भागीदारीतून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य होत आहे. अशा उपक्रमांमुळे ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या राज्याच्या ध्येयाला बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांना पूरक ठरणारे उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्वाचे …

Read More »

वर्षा गायकवाड : काँग्रेस कार्यालयावर भाजपाचा मोर्चा म्हणजे ‘चोर तो चोर वरून शिरजोर’ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर बोलण्याची भाजपाच्या टिनपाट अमित साटमची लायकी नाही – खा. वर्षा गायकवाड

वर्षा गायकवाड

लाखो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला त्याचे उत्तर द्या, स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांना साथ देणाऱ्या भाजपाने काँग्रेसला अक्कल शिकवू नये. विद्यार्थ्यांना अमानुष वागणूक देणाऱ्या व विद्यार्थी व विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणारे भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही राजकारभार करत आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करणाऱ्या भाजपाने काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढणे म्हणजे ‘चोर तो …

Read More »

विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीचार्ज आणि विरोधी पक्षनेत्याला दिलेल्या वर्तणुकीविरोधात काँग्रेस आक्रमक, भाजपा कार्यालयावर धडक.. हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, देशातील तमाम विद्यार्थ्यांचा अपमान, मोदी व शाह यांनी माफी मागावी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, परीक्षांतील अनियमिततेवर संसदेत चर्चा आणि विद्यार्थ्यांवरील FIR त्वरित मागे घ्या. लोकशाहीची हत्या करणाऱ्या भाजपा सरकारचा धिक्कार, मोदी हटाव देश बचाव..

congress-protest-Mumbai

नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण व परिक्षामधील अनियमितता या मोदी सरकारच्या भोंगळ कारभाराने देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय केले आहे. देशातील विद्यार्थी संतप्त झाल्यानेच ते रस्त्यावर उतरले असून त्यांच्यावर मोदी-शाह यांच्या पोलिसांनी केलेला अमानुष लाठीहल्ला व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी व काँग्रेस खासदार यांना दिलेली वागणूक या …

Read More »

आयपीएलची संस्थापक ललित मोदी १६ वर्षांनी भारतात परतणार फेमा प्रकरणी दिलासा मिळाल्यानंतर ललित मोदी यांचा निर्णय

Lalit Modi looks forward to India return

आयपीएलचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी २००९ च्या इंडियन प्रीमियर लीग दक्षिण आफ्रिका फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट (फेमा) प्रकरणात अपीलीय न्यायाधिकरणाकडून मोठा दिलासा मिळाल्यानंतर १६ वर्षांनी भारतात परतण्याची योजना असल्याचे म्हटले आहे. २०१० पासून भारताबाहेर राहत असलेल्या ललित मोदी यांनी सांगितले की, न्यायाधिकरणाच्या निकालाने १६ वर्षे चाललेल्या कायदेशीर लढाईचा …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, मला फरफटत ओढून नेताना पोलिस कुजबुजत होते, सरकारला हटवा शिक्षण व्यवस्थेत हेराफेरी

Rahul-Gandhi-Protest

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसच्या अचानक झालेल्या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांना पोलीस ओढत नेत असताना, विरोधी पक्षनेत्याने दावा केला की त्यांना पोलिसांकडून एक अनपेक्षित संदेश मिळाला. “इस सरकार को हटाईये (हे सरकार हटवा),” असा दावा राहुल यांनी केला की, त्यांना ताब्यात घेताना पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कानात कुजबुजले. शिक्षण व्यवस्थेत कथितपणे कशाप्रकारे “हेराफेरी” …

Read More »

मेदांता रूग्णालयातून सोनम वांगचुक यांचे पत्र कारवाई करणार नसल्याचे आश्वासन दिल्यास उपोषण स्थगित करण्यास तयार

सोनम वांगचुक

सोनम वांगचुक यांनी बुधवारी सांगितले की, नीट पेपरफुटी आणि परीक्षेसंबंधित मुद्द्यांवरून सोमवारी झालेल्या ‘चलो संसद‘ मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि आंदोलकांवर कोणतीही शिक्षात्मक किंवा प्रतिशोधात्मक कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन सरकारने दिल्यास ते २५ व्या दिवशी सुरू असलेले आपले उपोषण संपवण्यास तयार असल्याचे जाहिर केले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह …

Read More »