नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आतापर्यत प्रयत्न करण्यात येत होते. मात्र आता त्याचा वाढत्या प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देश बंद अर्थात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या कालावधीत कोणताही नागरीक घरातून बाहेर पडू शकणार नाही. तसेच हे कायदेशीर बंधन असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. या लॉकडाऊनमुळे …
Read More »नांदेडचे सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकले! सा. बां. मंत्री अशोक चव्हाण यांचे मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणुमुळे भारतात येणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाल्याने महाराष्ट्रातील नांदेडचे सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकून पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. नांदेड शहरातील रहिवासी असलेले संकेत पानपट्टे, ऋतुज माने, अनिरूद्ध कुलकर्णी, गौरव देशपांडे, अमरदीप जगताप आणि शंकर नादरे हे हॉटेल मॅनेजमेंटचे सहा …
Read More »राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १०७ मात्र १५ जण बरे होण्याच्या मार्गावर ‘मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार’ गुढीपाडव्यानिमित्त संकल्पाचे आरोग्यमंत्री टोपे यांचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. मात्र यापैकी १५ रूग्ण बरे होण्याच्या मार्गावर असून ही समाधानाची बाब असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देत या आजाराच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. राज्यातील सर्वधर्मगुरूंनी ‘आरोग्यदूत’ बनून जनजागृती करावी, असे आवाहन करत जनतेला गुढी पाडव्यानिमित्त नविन वर्षाच्या शुभेच्छा देताना ‘मी घरी थांबणार, कोरोनाला …
Read More »लॉकडाऊनमधील नागरीकांनो वाचा आणि अंमलबजावणी करा महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत बंदी आदेश, अधिसूचना जारी
मुंबई : प्रतिनिधी कोविड १९ (कोरोना विषाणू) प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना आज मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जारी केली. या अधिसूचनेनुसार- अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तू वगळता अन्य सर्व वस्तूंच्या दळणवळणासाठी राज्याच्या सर्व …
Read More »आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका… कृपया घरीच रहा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विंनती
मुंबई: प्रतिनिधी संचारबंदीसारखे निर्णय राज्य सरकारनं जनतेच्या हितासाठीच घेतले आहेत. यामध्ये कुणाचा वैयक्तिक स्वार्थ असण्याचं काही कारण नाही. आणखी कठोर पावलं उचलायला भाग पाडू नका… कृपया घरीच रहा… अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मास्क किंवा औषधांची अवैध साठेबाजी करणाऱ्या असामाजिक घटकांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट …
Read More »घरबसल्या आरोग्य तंदरूस्तीचे आयुर्वेदीक १३ कलमी उपाय आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. शेखर मगर यांच्या सूचना
१.अंघोळीला शक्यतो कोमट किंवा गरम पाणी वापरावे त्या पाण्यामध्ये कडुलिंबाचा पाला अथवा कडुलिंबाचा पाला न मिळाल्यास तुरटी टाकावी. २.दर तासाला तुरटीच्या पाण्याने हात धुवावेत. ३. सकाळी व संध्याकाळी ज्येष्ठमधाच्या काढ्याने गुळणा कराव्यात , ज्येष्ठमध उपलब्ध न झाल्यास गरम मिठाच्या पाण्याने गुळणा कराव्यात .म्हणजे घशातील टॉन्सिल्स मधील जंतु हे फुफ्फुसांमध्ये उतरणार …
Read More »कोरोना प्रभाव: रोजगारबाधीतांच्या मध्यान्ह भोजनासाठी देह व्यापारातील महिलांची मदत स्नेहालय - अनाम प्रेम परिवाराच्या पुढाकाराने १२३० कुटुंबियांना भोजन
अहमदनगर: प्रतिनिधी कोरोनामूळे अहमदनगर मधील झोपडपट्ट्यातील रोजगारबाधीत १२३० कुटुंबांना मध्यान्ह भोजन देण्यात स्नेहालय – अनाम प्रेम परिवाराने पुढाकार घेतला. यासाठी येथील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांनी मदतीचा हात देत ७ हजार रूपयांची मदत देत एक अनोखा आदर्श समाजापुढे निर्माण केला. नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कोरोना पासून बचाव करण्याबाबत सर्व काळजी घेण्याची …
Read More »सुशिक्षित पण अडाणी वागणाऱ्या नागरिकांसाठी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू लोकहितासाठी कठोर निर्णय घेत असल्याचे उध्दव ठाकरे यांची घोषणा
मुंबईःखास बातमीदार कोरोनाला रोखण्यासाठी वेळोवेळी नागरिकांना आवाहन करूनही सुशिक्षित असूनही अडाणी व्यक्तींसारख्या नागरीकांना ताळ्यावर आणण्यासाठी अखेर राज्य सरकारने संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. कोरोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे , मी सर्वाना काळजीपोटीच आपल्याला या सुचना देतो. आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर …
Read More »कोरोना इम्पॅक्टः ते आदेश ३१ मार्चपर्यंत नव्हे तर पुढेही राहणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
पुणेः विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने शाळांच्या परिक्षा, महाविद्यालय, वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परिक्षा आणि खाजगी आस्थापनाच्या संदर्भात काढलेले आदेश हे ३१ मार्च २०२० पर्यंतच लागू राहणार नाहीत, तर राज्य सरकारकडून पुढील आदेश निघेपर्यंत राज्याला लागू राहणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणे …
Read More »आरोग्य मंत्री म्हणाले, कोरोनाच्या ३ टप्प्यात जायचे नाही अन्यथा कठोर निर्णय राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ च्या घरात
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, नागरिकांनी गर्दी टाळावी. आत्ता कोरोना संसर्ग दुसऱ्या टप्प्यात आहे, तो तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये यासाठी उपाय योजना आखण्यात येत आहेत. मात्र नागरीकांनी गर्दी करणे टाळले नाही तर प्रसंगी कठोर निर्णय घेतले जातील असे सांगत रेल्वे, बससेवा बंद करण्याचे संकेत आरोग्यमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya