Editor

सेवा निवासस्थाने रिक्त करा अन्यथा फौजदारी कारवाई करू सेवानिवृत्त म्हाडा कर्मचारी-अधिकाऱ्यांना प्रशासनाची तंबी

मुंबईः प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील तमाम सर्वसामान्य नागरीकांसाठी माफक दरात घरे बांधून उपलब्ध करून देणाऱ्या म्हाडा कर्मचाऱ्यांवर बेघर करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे म्हाडा कायद्यातील तरतूदीनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना स्वस्त दरात घरे देण्याच्या निर्णयावर म्हाडा प्रशासनाकडून कोणताही निर्णय न देताच सेवानिवृत्त कर्मचारी-अधिकाऱ्यांना घरे रिक्त करण्याच्या नोटीसा बजाविण्यात येत असल्याची धक्कादायक बाब …

Read More »

वीरशैव व लिंगायत समाजाचा प्रस्ताव मागासवर्ग आयोगाकडे पाठवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी लिंगायत समाजातील हिंदू वीरशैव, हिंदू लिंगायत व रेड्डी या उपजातींना इतर मागासवर्गात समावेशासंदर्भातील प्रस्ताव राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. तसेच मंगळवेढा येथील जगद्‌ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाचा आराखडा लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री …

Read More »

कॉ.पानसरे तपासप्रकरणात मुख्यमंत्र्यांवर ताशेरे नाहीत मुख्यमंत्री फडणवीस यांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी दाभोळकर-पानसरे यांच्या हत्येची चौकशी सीबीआय आणि सीआयडीकडून सुरु असून याप्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. कॉ.पानसरे यांच्या हत्ये प्रकरणी न्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोणतेही भाष्य केले नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. कॉ.पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील तपासप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले होते. त्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत …

Read More »

सर्व बोर्डांच्या शाळेत मराठी शिकविणे बंधनकारक कायद्यात बदल करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घोषणा

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विविध बोर्डाच्या अर्थात एसएससी, आयसीएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं सक्तीचं असून तशी कायद्यात योग्य तो बदल करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. २४ जून रोजी राज्यातील प्रमुख साहित्यिक मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करावी यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. …

Read More »

बेकायदा गँस वितरणप्रकरणी ९ एजन्सींच्या विरोधात गुन्हे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी घरगुती गँस पुरवठा करणाऱ्या नळपाईप लाईनमधून अनधिकृतरित्या सिलेंडरमध्ये भरून त्याची विक्री केल्याप्रकरणी शहरातील ९ गँस एजन्सींच्या विरोधात जीवनाश्वक वस्तू अधिनियम १९५५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी विधानसभेत दिली. मुंबई शहर व उपनगरात घरगुती गँस सिलेंडरच्या अवैध विक्री करणाऱ्या गँस …

Read More »

एमएमआरडीएच्या हद्दीत आता पालघर ते रायगड पर्यंत वाढ अधिसूचनेच्या ठरावास विधानसभेची मान्यता

मुंबईः प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशाला लागून असलेल्या पालघर, रायगड, वसई, पेण, खालपूर, अलिबागच्या उर्वरीत भागाचा सुनियोजित विकास करण्यासाठी या सर्व भागांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याविषयीचा अधिसूचना प्रस्तावाचा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला असता त्यास भाजप सदस्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सुधारणा सुचवित …

Read More »

पुलवामा, बालाकोट हल्ल्यातील शहीदांना आदरांजली पण त्यांचे प्रश्न तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी जनता व्यक्ती म्हणून कुणाच्या हाती सरकार दिले पाहिजे याचा विचार करते. राज्यपालांच्या अभिभाषणात त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीदांना मानवंदना वाहिली. मात्र महाराष्ट्रातील शहीदांचे त्यांच्या कुटुबीयांचे प्रश्न तसेच आहेत. राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली मात्र आज काही लोक नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करत आहे. हे आपल्या देशाला …

Read More »

अर्थसंकल्प फुटीची सर्वकष व सायबर क्राईमच्या माध्यमातून चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात मांडण्याऐवजी तो बाहेर अगोदरच फुटलेला होता त्यामुळे या प्रकरणाची सर्वकष व सायबर क्राईमच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प विधानसभेत मांडला परंतु त्याची माहिती अगोदरच बाहेर पडली. ही बाब आम्ही निदर्शनास आणून दिल्यावर …

Read More »

अखेर नाणार प्रकल्प रायगड जिल्ह्यात ४० गावांच्या ग्रामस्थांची पसंती

मुंबईः प्रतिनिधी बहुचर्चित नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रायगड जिल्ह्यात होणार असल्याचे निश्चित झाले आहे. याबाबत अलिबाग, मुरूड, रोहा, श्रीवर्धन येथील ४० गावातील जमिन अधिग्रहण करण्यासाठी या गावांच्या ग्रामस्थांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात होणारा हा प्रकल्प रायगड जिल्ह्यात होणार आहे. याबाबत विधानसभेत लेखी प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

आदीवासी आश्रमशाळेतील शिक्षकांना ७ वा वेतन १० दिवसात लागू करणार आदीवासी मंत्री अशोक उईके यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील आदीवासी विभागाच्या अखत्यारीत असलेल्या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना अद्याप ७ वा वेतन लागू करण्यात आलेला नव्हता. यासंदर्भातील प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी आदीवासी मंत्री अशोक उईके यांनी १० दिवसात ७ वा वेतन लागू करण्याची घोषणा विधानसभेत केली. बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात शिवसेनेचे आमदार योगेश घोलप यांनी प्रश्न विचारला …

Read More »