Breaking News

उमेश पाटील यांचा खुलासा, अजित पवार यांना घशाचे इन्फेक्शन

महाराष्ट्रातील शेवटच्या अर्थात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया २० मे रोजी पार पडणार आहे. मात्र महायुतीतील अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीच्या प्रचारात दिसेनासे झाले. या पार्श्वभूमीवर गेले कुठे अजित पवार असा सवाल राजकिय वर्तुळात उपस्थित करण्यात येऊ …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, बेकायदेशीर अटक रिमांडचे आदेश वैध…

काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने सरकारच्या विरोधात लिखाण करणाऱ्या आणि बोलणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात खोट्या गुन्हे दाखल करत तुरुंगात डांबले. न्युजक्लिकचे प्रमुख प्रबीर पूरकायस्थ यांच्याही विरोधात मनी लॉड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करत ईडीकडून अटक करण्यात आली. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात याचिकेवरी सुणावनी दरम्यान, असे मत व्यक्त केले की, केवळ आरोपपत्र दाखल …

Read More »

शरद पवार यांची खोचक टीका, …नरेंद्र मोदी यांचे स्टेटमेंट मूर्खपणाचे

नरेंद्र मोदी यांच्याकडे दुसरं सांगण्यासारखं काही नाही. त्यामुळे ते लक्ष विचलित करण्याचे काम करत आहेत. ते सध्या जे बोलत आहेत, त्यातील १ टक्का सुद्धा काही खरं नाही. ज्यावेळी देश चालवायचा असेल, त्यावेळी जाती-धर्माचा विचार करून देश चालवता येईल का? नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास ढळलेला आहे असा उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णयः… ईडीला अटकेचे अधिकार नाहीत

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (१६ मे) महत्त्वपूर्ण निकाल देताना, विशेष न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि त्यांचे अधिकारी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम १९ अंतर्गत मनी लाँड्रिंगच्या तक्रारीची दखल अधिकाराचा वापर करणाऱ्या ईडीला आरोपीस अटक करू शकत नाही असे स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या अटकेच्या अधिकारासंदर्भात दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी …

Read More »

३१ मे ला मान्सूनचे भारतात आगमन भारतीय हवामान खात्याचा माहिती

भारतीय हवामान विभाग (IMD) ने बुधवारी सांगितले की मान्सून ३१ मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर पोहोचेल, जो मुख्य भूभागातील १ जूनच्या त्याच्या सामान्य वेळापत्रकाच्या दिवसापेक्षा एक दिवस आधी आहे. आयएमडीने असेही म्हटले आहे की नैऋत्य मान्सून १९ मे च्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेटांवर …

Read More »

SME IPO बाबत कठोर निर्णय आणण्याचा विचार किमंतीमध्ये फेरफार करण्याचे धोके

SME बाजारावरील वाढत्या वादविवादांमध्ये, स्टॉक एक्स्चेंज कठोर नियमांवर विचार करत आहेत, असे काही मीडिया रिपोर्ट्स सुचवतात. नियमांमध्ये SME IPO साठी किमान थ्रेशोल्डचा समावेश असू शकतो, अशा प्रकारे, केवळ मोठ्या गंभीर खेळाडूंनीच भांडवली बाजाराचा मार्ग वापरला असल्याचे दिसून येत आहे. सध्या, SME समस्यांसाठी किमान इश्यू आकार नाही. परंतु एक्सचेंजचे स्वतःचे धोरण …

Read More »

परदेशात भारतीय मसाले नाकारण्याचे प्रमाण कमी वाणिज्य मंत्रालयाची माहिती

भारतीय मसाल्यांच्या निर्यातीला जागतिक स्तरावर छाननीचा सामना करावा लागत असल्याने, वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले की या वस्तूंना नाकारण्याचे दर कमी आहेत. त्यात असेही म्हटले आहे की भारताच्या निर्यातीसाठी निर्यात नमुने अयशस्वी होणे लक्षणीयरीत्या कमी आहे आणि अधोरेखित केले आहे की अशा घटना एकप्रकारे आहेत. वाणिज्य मंत्रालयाच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले …

Read More »

अमेरिकेने चिनी आयात मालावरील शुल्कात केली वाढ चीनी मालावर अघोषित बंदी?

अनेक चिनी वस्तूंवर शुल्क वाढवण्याचा निर्णय अमेरिकेच्या जो बिडेन सरकारने घेतला आहे. “कोविड-19 साथीच्या आजारानंतर कोणताही देश त्यांची सर्व अंडी एका टोपलीत ठेवण्यास तयार नाही,” असे भारतीय सरकारी सूत्रांनी सांगितले. भारताची इलेक्ट्रिक वाहने (EVs) निर्मितीसाठी देशांतर्गत क्षमता आहे याची खात्री करण्यासाठी देखील धोरण अवलंबत असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून भारताचे …

Read More »

गजबजलेल्या मुंबईत पंतप्रधान मोदी यांचा महायुतीच्या उमेदवारांसाठी रोड शो

नुकतेच मुंबईतील घाटकोपर येथील ईस्टर्न फ्रि वे मार्गावरील एक अवास्तव होर्डींग कोसळून झालेल्या अपघातात १४ निष्पापांचा प्राण गेला. तसेच अनेक वाहनांचे नुकसान आणि वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जाण्याची पाळी तीन दिवसांपासून या भागात आहे. मात्र आज संध्याकाळच्या पीक आव्हरला मुंबईकरांसाठी महत्वाची असलेल्या मेट्रोला बंद ठेवत आणि महामार्गावरील वाहतूक तिसरीकडे वळवित …

Read More »

दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य वाहन व्यवस्था

मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय मोफत प्रवासासाठी समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी या सेवेचा लाभ घेवून …

Read More »