Breaking News

देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाबरी पाडताना तुम्ही कोठे होतात? बाबरीवरून फडणवीसांचा शिवसेनेला टोला

मी त्याला मशिद मानत नाही, तो परकीय आक्रमकांनी उभा केलेला पारतंत्र्याचा ढाचा होता. तो ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता तेथे हजर नव्हता असा दावा भाजपा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत आम्ही अभिमानाने सांगतो की तो ढाचा पाडण्याचं काम आम्ही केले. पण तुम्ही कोठे होतात असा खोचक सवाल करत …

Read More »

गॅसच्या किंमतीत पुन्हा १०० रूपयाहून अधिक वाढ, बाहेरचे खाणं महागणार हॉटेल, रेस्टॉरंटमधील खाण्याचे पदार्थ महागण्याची शक्यता

दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बिगर भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केले नसल्याचा मुद्दा उपस्थित करत पहिल्यांदाच राज्यां विरूध्द थेट विरोधाची भूमिका घेतली. मात्र त्याचाच विसर कदाचित केंद्र सरकारला पडला असण्याची शक्यता असून व्यासायिक गॅसच्या किंमतीत तब्बल १०२.५० पैशाची वाढ करण्याचा निर्णय गॅस …

Read More »

संजय राऊतांचा इशारा, दोन घाव बसले की पाणी मागणार नाही… मनसे भाजपाला दिला इशारा

आतापर्यंत आम्ही आमच्याकडे सत्ता असल्यानं आणि आमचं सरकार असल्यानं संयम बाळगला, पण पाणी डोक्यावरून जात आहे. त्या पाण्यामध्ये आम्हाला इतरांना बुडवावे लागेल, मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील. आम्हाला लढण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज नाही. आम्हाला लढण्यासाठी भाडोत्री लोक देखील लागत नाही. आम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन लढत नाही. आमची हत्यारे आमचीच …

Read More »

महाराष्ट्र दिनी राज्यपाल म्हणाले, राज्याने प्रगती आणि विकास यात कुठेही खंड पडू दिला नाही ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मांडली राज्याची रूपरेषा

बंधू आणि भगिनींनो, १. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण विश्वातील मराठी जनतेला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. २. आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील आहे. कामगारांच्या आणि श्रमिकांच्या घामातून हा महाराष्ट्र घडला आहे, त्यांचे स्मरण ठेवणे हे आपले …

Read More »

मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजपाची ‘बुस्टर सभा’ पुरोगामी महाराष्ट्रातील जात्यांध्य व धार्मिक विचार थांबवा !: नाना पटोले

महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे. हा पुरोगामी विचारच राज्याला प्रगतीपथावर घेऊन गेला व तोच विचार राज्याच्या हिताचा आहे परंतु मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात जात्यांध्य व धार्मिक विचाराला पुढे करून राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम केले जात आहे, हा जात्यांध विचार थांबवण्याची गरज …

Read More »

माझे (स्व.बाळासाहेब) वडील भोळे होते, पण त्यांचे खपवून घेणार नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा भाजपाला इशारा

आता सगळ्या गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे उद्योग आणि गुंतवणूक मोठ्या पुन्हा येण्यास सुरुवात झाली आहे. त्याचे दृष्यपरिणामही दिसायला लागतील. महाविकास आघाडीची सारी सुत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हातात असल्याबाबत आरोप करण्यात येत आहेत. कोणी काहीही आरोप करो. पण आमच्या सरकारचे उत्तम चालले आहे. शरद पवार हे वडीलधाऱ्यांप्रमाणे …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, ईडी फिडी लावण्यापेक्षा एकदा चीनला धमकावून दाखवा मनसे प्रमुख राज ठाकरेंची काळजी असल्याची अप्रत्यक्ष सांगितले

महाराष्ट्राला आणि पश्चिम बंगालबद्दल मुद्दाम टीपण्णी करण्यात आली. त्यामुळे आम्हाला जी खरी माहिती जाहीर करणे भाग पडले. ते साऱ्या देशाचे पंतप्रधान आहेत एका पक्षाचे नाहीत. त्यांच्याकडून देशाच्या शस्त्रुशी लढण्याची अपेक्षा असताना ते त्यांच्या पक्षांच्या शस्त्रुंबरोबर लढण्याचे काम ते करत आहेत. पक्षाच्या विरोधकांच्या मागे ईडी, फिडी लावण्यापेक्षा हिंमत असेल तर चीनला …

Read More »

देशात तापमानाचा पारा ५० अंशावर जाण्याची शक्यता आयएमडीचे महासंचालक डॉ. एम महापात्रा

मागील काही दिवसांपासून उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असताना उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असल्याचा इशारा काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने दिल्यानंतर आज पुन्हा आगामी मे महिन्यात सुर्य आग ओकणार असल्याचा इशारा देत येत्या काही दिवसात देशात तापमानाचा पारा ५० अंशावर जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मे महिना हा वर्षातील …

Read More »

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनो अडचणी आहेत का? मग ही बातमी वाचाच अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर संवाद दिनाचे आयोजन

मान्यताप्राप्त शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर ‘संवाद दिन’ आयोजित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या माध्यमातून त्यांच्या अडचणी स्थानिक पातळीवर आणि तातडीने सोडविणे शक्य होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. शालेय शिक्षण विभागाअंतर्गत मान्यताप्राप्त खासगी अनुदानित/ विनाअनुदानित/ अंशत: अनुदानित शाळेतील …

Read More »

संजय राऊत म्हणाले, कुणी कितीही शाली पांघरा, हिंदू हृदयसम्राट एकच शालीवरून मनसेप्रमुख राज ठाकरेंवर टीकास्त्र

महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादेत आयोजित सभेसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे हे पोहोचले असताना. त्यांच्या पुणे ते औरंगबाद प्रवासा दरम्यान ठिकठिकाणी राज ठाकरे यांना भगवी शाल पांघरत कार्यकर्त्यांनी सन्मानित केले. त्यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधत म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट एकच आहेत. देशात स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर हिंदूहृदयसम्राट …

Read More »