मुंबई

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार ‘दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई’ हे आमचे लक्ष्य

मुंबई शहरातील दरडप्रवण क्षेत्रात सेफ्टी नेट बसवून ही क्षेत्रे अधिक संरक्षित करणे आणि तेथील नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे हे आमचे प्राधान्य असून दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे. याचबरोबर म्हाडा, महानगरपालिका, एमआयडीसी यासह इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाने हिजाब प्रकरणी याचिका फेटाळून लावली ९ विद्यार्थ्यींनी दाखल केलेली याचिका फेटाळली

मुंबई उच्च न्यायालयाने २६ जून रोजी शहरातील एका महाविद्यालयातील नऊ महिला विद्यार्थिनींनी हिजाब, बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्यासाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायमूर्ती ए.एस. चांदूरकर आणि राजेश पाटील यांच्या खंडपीठाने महाविद्यालयाने घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले आणि विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षात …

Read More »

बेस्टच्या दर भाडेवाढीला शिवसेना उबाठा गटाचा विरोध आदित्य ठाकरे यांचे मुंबई पालिका आयुक्तांना पत्र

मुंबईतील मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या बेस्ट बसकडून दर भाडेवाढीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. या अनुषंगाने बेस्टच्या दर भाडेवाढीला शिवसेना उबाठा गटाने विरोध केला असून मुंबईतील बस सेवा पुन्हा एकदा कोलमडून पडण्याच्या स्थिती असल्याचे सांगत मुंबईकरांना त्रास होऊ नये आणि बेस्टला आर्थिक निधी द्यावा यासाठी शिवेसना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, जामीन मिळाला असला तरीही दोषीवर कारवाईच पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील मृत मुलांच्या पालकांना १० लाखांची मदत सुपूर्द

पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण आणि तरुणीच्या पालकांना विशेष बाब म्हणून देण्यात आलेल्या १० लाखांचा धनादेश त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरीही या प्रकरणातील दोषींवर कारवाई करणारच असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी या मुलांच्या …

Read More »

राज ठाकरे यांचे आवाहन, जातीपतीचे विष कालवणाऱ्यांना दूर करा मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले आवाहन

विधानसभा निवडणूका जाहिर होण्यास अद्याप तीन-चार महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र लोकसभआ निवडणूकीत लागलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि सत्ताधारी पक्षासोबत असलेल्या समविचारी पक्षाकडूनही आता विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. यापार्श्वभूमीवर आज मनसेच्या पादधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत, समाजामध्ये जातीपातीचे विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रातून दूर करावे, कारण यातून …

Read More »

अनिल परब यांची मागणी, नवीन इमारतीत ५० टक्के घरे मराठी लोकांसाठी आरक्षित ठेवा विधानभवन सचिवालायाकडे अशासकिय विधेयक सादर

घरे नाकारल्यामुळे मराठी लोकांचे मुंबईतून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड अनिल परब यांनी अशासकीय विधेयक विधानमंडळ सचिवालयाकडे सादर केल्याची माहिती एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. तसेच अनिल परब पुढे बोलताना म्हणाले की, मुंबईत बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना ५० टक्के …

Read More »

शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत कपिल पाटील यांची घणाघाती टीका

शिक्षण सेवक आणि कंत्राटीपद्धत आणून शिक्षकांचे नुकसान करणारे आणि आदर्श सोसायटीत कारगिल शहीदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत, अशी घणाघाती टीका मावळते शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. कपिल पाटील यांनी मुंबई शिक्षक मतदार संघातून सलग तीन टर्म (१८ वर्षे) पूर्ण केल्यानंतर स्वेच्छा निवृत्ती घेऊन आपले तरुण …

Read More »

मुंबईतील ऐतिहासिक बंदरे व गोदी च्या इतिहासावरील पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन वसई, वर्सोवा, माहिती बंदराची सविस्तर माहिती

मुंबई परिसरातील सोपारा, वसई, वर्सोवा, माहीम, अलिबाग, चौल यांसह विविध बंदरांच्या तसेच गोदींच्या इतिहासाचे संकलन असलेल्या ‘गेटवेज टू द सी – हिस्टोरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथे संपन्न झाले. मुंबईचा सागरी वारसा सांगणाऱ्या संग्रहालयाच्या निर्मितीसाठी स्थापन करण्यात …

Read More »

एमएमआरडीएचा खुलासा, अटल सेतुच्या मुख्य भागावर कोणतेही तडे नाहीत मुख्य पुलाचा भाग असलेल्या रस्त्यावर नाही

अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू पुलाच्या मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसून अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोच मार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत. हा पोहाच मार्ग मुख्य पुलाचा भाग नसून तो पुलाला जोडणारा सेवा रस्ता आहे. तसेच उत्पन्न झालेल्या भेगा या प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे नाहीत. त्यामुळे पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नसल्याचे …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, अटल सेतुचे काम निकृष्ट दर्जाचे, रस्ता एक फुट खचला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अटल सेतू रस्त्याला भेगा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या अटल सेतुचे उद्घाटन करण्यात आले त्या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच भेगा पडल्या आहेत. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता एक फुट खाली खचला आहे. महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. कर्नाटकातील आधीचे भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले होते, पण महायुती सरकार तर १०० …

Read More »