मुंबई: प्रतिनिधी
देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांनी पहिल्या सिव्हील सर्व्हीस प्रशासनाची बाहेर पडलेल्या बॅचला मार्गदर्शन केले. तो दिवस म्हणजे २१ एप्रिल हा दिवस. त्यांनी प्रशासकिय यंत्रणेला दिशा दाखविली, आत्मविश्वास व्यक्त केला. तो दिवस आजही पाळला जात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले.
देशातील एक सिव्हिल सर्व्हिस प्रशासकांची पहिली बॅच बाहेर पडल्यावर मार्गदर्शन केले होते तो हा दिवस. सरदार वल्लभाई पटेल यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिशा दाखवली. त्यांच्याबद्दलचा आत्मविश्वास व्यक्त केला. तो दिवस साजरा करण्याचा प्रघात आजही पाळला जात आहे. सरदार पटेलांचा विचार, संदेश प्रशासकीय यंत्रणेने तेव्हापासून दिलाय तो विचार आजही पहायला मिळतो आहे. आजच्या पिढीच्या मनात आहे त्याबद्दल अभिनंदन करतानाच ते कष्ट घेत आहेत त्याबद्दल शरद पवारांनी कृतज्ञता व्यक्त केली.
Marathi e-Batmya