राजकारण

नाना पटोले यांचा सवाल, मराठवाड्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री कुठे आहेत ? मराठवाड्यातील पूरस्थितीची गांभिर्याने दखल घेऊन तातडीने मदत पाठवा

मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते व पुल वाहून गेल्याने मराठवाड्यातील अनेक गावांचा इतर भागाशी संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्याने शेतातील उभे पिक वाहून गेल्याने खरीप हंगामही वाया गेला. शेकडो जनावरे वाहून गेली आहेत. नद्या, नाल्यांना पूर आला आहे. सरकारने इव्हेंटबाजी व जाहिरातबाजी बाजूला ठेवून …

Read More »

महाविकास आघाडीच्या विरोधात महायुती लागली कामाला नेत्यांना टार्गेट करून वातावरण बदलण्याचा प्रयत्न

बदलापूर येथील दोन चिमुरडींवरील अत्याचाराचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपा-शिवसेना शिंदे गटाकडून करण्याचे प्रकरण ताजे असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून पडण्याची घडली. या दोन्ही घटनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हे योग्यरितीने हाताळू शकले नाहीत. त्यामुळे विरोधकांच्या …

Read More »

माफीवरून शरद पवार यांची टीका, विषय काय, हे काय बोलत आहेत सावरकरवरून विरोधकांवर केलेल्या टीकेचा घेतला समाचार

मालवण येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला पुतळा कोसळला. त्यावरून राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यातच शिंदे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी वाईटातून चांगले घडत असे वक्तव्य केल्यानंतर तर या राजकिय घमासानीत आणखी भरच पडली. हे काय कमी होते म्हणून की काय मुख्यमंत्री …

Read More »

रामदास आठवले यांची स्पष्टोक्ती, शिवाजी महाराजांचा पुतळा… निर्णय चुकीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मालवण मधील राजकोट किल्ल्याला भेट

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना अत्यंत दुःखद मनाला चटका लावणारी आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम नवोदित शिल्पकारास देण्याचा निर्णय चुकीचा होता. राज्यात राम सुतार आणि सारंग सारखे ज्येष्ठ अनुभवी शिल्पकार असताना नवोदितांना ही मोठी जबाबदारी …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या, पिढी उलटून गेल्यावर न्यायालयीन निकाल येतात बलात्काराच्या प्रकरणात जलद न्यायालय आवश्यक

सर्वोच्च न्यायालयाला झालेल्या ७५ वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमाला आज देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी उपस्थिती लावली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी बलात्कार विषयीच्या याचिकांवरील लागणाऱ्या निकालाच्या कालावधीवरून चिंता व्यक्त केली. यावेळी बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले की, महिलांवरील याचिका …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा,… पंडित नेहरूंच्या नावाने फेक नेरेटिव्ह पसरवू नका पवन खेरा यांची टीका, जे काम मुघल करु शकले नाहीत ते भाजपाच्या बेईमान लोकांनी केले

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करुन भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली आहे. महाराज आपले दैवत आहेत, भाजपाने त्यांचा धडधडीत अपमान केला आहे, या अपमानाविरोधात जोडे मारो आंदोलन आयोजित केले असताना शिवद्रोही व्यवस्थेने विरोध केला, परवानगी नाकारली. आता काँग्रेसनेच महाराजांचा अवमान केल्याचा फेक नेरेटिव्ह देवेंद्र फडणवीस व भाजपा पसरवत आहे, फेक …

Read More »

जोडे मारो आंदोलनावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय माझी लाडकी बहिण योजनेमुळे मिळालेल्या घाबरलेत

मालवण येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळून पडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने राज्यातील महायुतीच्या विरोधात जोडे मारो आंदोलन आज करण्यात आले. या आंदोलनात राज्य सरकारच्या विरोधात शिवद्रोही, खोके सरकार, गद्दारांचे सरकार अशा घोषणा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. महाविकास आघाडीने केलेल्या आंदोलनासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, त्या कृत्यांबद्दल काँग्रेस माफी मागणार का? शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही

मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून पडल्याच्या निषेधार्थ विरोधक महाविकास आघाडीच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन पुकारत भलामोठा मोर्चा काढला. या मोर्चात शिवद्रोही सरकार म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून चुकीला माफी …

Read More »

जोडे मारो आंदोलनः शरद पवार यांचा आरोप, मालवणमध्ये उभारलेला पुतळा भ्रष्टाचाराचा… शिवप्रेमी जनतेचा अपमान केला

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात आज जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्यानिमित्ताने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चाचा समारोप गेट वे येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद …

Read More »

जोडे मारो आंदोलनः नाना पटोले यांची टीका, ही भाजपाची पेशवाई वृत्ती…चुकीला माफी नाही राजकोटच्या किल्यावरील महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना हा भ्रष्टाचाराचा नमुना

भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, खोके सरकारने आमच्या दैवतांचा अपमान केला. विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली …

Read More »