उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी २.३२७ एकरचा भूखंड मंजूर केला आहे. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातील अतिथी, भाविक व पर्यंटकांच्या सोयी सुविधांसाठी उभारण्यात येणारे हे महाराष्ट्र सदन येत्या २ वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. उत्तर प्रदेश सरकारच्या नियोजन …
Read More »छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती, …महायुतीला ठेच लागली फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेतील सर्व घटकांना आगामी निवडणुकीत संधी द्यावी
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ठेच लागली आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. यापुढील काळात आपल्या रस्त्यातील दगड धोंडे बाजूला सारून पुन्हा ठेच लागणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीत जो समाज आपल्यापासून दुरावला गेला आहे त्याच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी फुले, शाहू आंबेडकरांचे विचार आपल्याला कृतीतून दाखवावे …
Read More »अजित पवार यांच्यांकडून पहिल्यांदाच शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञपणा व्यक्त काँग्रेसमध्ये त्रास होवू लागल्याने राष्ट्रवादीची स्थापना
साधारणतः ११ महिन्यापूर्वी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत पक्षाच्या उभ्या यंत्रणेवरच अजित पवार यांनी दावा केला. सध्या तरी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवार यांच्याकडे आहे. लोकसभा निवडणूकीत अजित पवार यांच्या पक्षाला मिळालेले यश आणि केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित …
Read More »मनोज जरांगे पाटील यांचा आरोप, काँग्रेसने मराठा समाजाचा विश्वासघात केला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेवरून केला आरोप
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आक्रमक असलेल्या मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत भाजपा आणि राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या सरकारवर सातत्याने टीका करत होते. मात्र आता काँग्रेस पक्षाने मराठा समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप करत आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी काँग्रेसला दिला. मनोज …
Read More »नाना पटोले यांची मागणी, NEET परिक्षेतील घोटाळ्याची चौकशी करा निकालाचे फेरमुल्यांकन करण्याची काँग्रेसची मागणी
डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या विद्यार्थ्यांना NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्याचा मोठा फकटा बसला असून त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. या परिक्षेत गैरप्रकार झाल्याने लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरही अन्याय झाला असून सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. नीट परिक्षेतील घोटाळा पाहता या प्रकरणाची …
Read More »शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीची प्रस्तावित कामे तातडीने करा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आदेश
शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीची प्रस्तावित कामे तातडीने करण्याचे आदेश राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. मुंबईत शासकीय निवासस्थानी या वसाहतीच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी शिर्डीतील औद्योगिक वसाहतीच्या कामाचा विविध विभागाकडून सखोल आढावा घेतला. शेती महामंडळाच्या वतीने ५०० एकर जमीन औद्योगिक महामंडळाला …
Read More »अजित पवार यांचे आवाहन, शेतकऱ्यांनो वापसा आल्यानंतरच पेरणी करा पीक कर्ज मिळण्याबाब निर्देश
राज्यात पुणे विभागासह कोकण प्रदेशात चांगला पाऊस झाला आहे, तर अन्य भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे. पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे खते-बियाण्यांच्या अभावी कुठेही पेरण्यांना विलंब होता कामा नये. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात जून्यासह या नव्या मंत्रांचा समावेश काही जणांना कॅबिनेट तर काही जणांना राज्यमंत्री पदाची जबाबदारी
लोकसभेत एनडीए आघाडीला बहुमत मिळाले. त्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात जून्या मंत्रिमंडळातील काही वादग्रस्त मंत्र्यांच्या समावेशासह काही नव्या वादग्रस्त ठरलेल्या मंत्र्याचा समावेशही यावेळी करण्यात आला. त्यामध्ये हरियाणाचे माजी मुख्यमंत्री तथा शेतकरी आंदोलनाच्या विरोधात …
Read More »शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांची राज्यमंत्री पदावर बोळवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा कमी दर्जाचे मंत्रीपद
लोकसभा निवडणूकीनंतर भाजपाने एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळी भूमिका घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाही भाजपाच्या मदतीने हिसकावून घेतली. या निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने ७ खासदार निवडूण आणले. तसेच शिंदे गटाने केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्री पदेही मागितली होती. मात्र भाजपाने एकनाथ शिंदे …
Read More »जीतनराम मांझी एकमेव खासदार तरी केंद्रीय मंत्रिमंडळात, अजित पवार? भाजपाकडून अजित पवार यांच्यासोबत दुजाभाव
बिहारचे माजी मुख्यमंत्री तथा हिंदूस्थान अवामी मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी यांच्या पक्षाकडून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाकडे दोन जागा जागा मागितल्या होत्या. मात्र त्यांच्या पक्षाच्या दोन जागांपैकी एका जागेवर स्वतः जीतनराम मांझी हे स्वतः निवडूण आले. मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला …
Read More »
Marathi e-Batmya