नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके आणि भाजपाचे उमेदवार डॉ सुजय विखे-पाटील यांच्यात लढत झाली. या मतदारसंघातील निवडणूकीच्या दरम्यान निलेश लंके यांच्या शैक्षणिक गुणवतेवरून आणि इंग्रजी भाषा येत नसल्याचा मुद्दा प्रचारात उपस्थित झाला होता. तसेच या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र …
Read More »शरद पवार यांचे निवडणूक आयोगाला पत्र, पिपाणी चिन्ह यादीतून वगळा लोकसभा निवडणूकीत पक्षाला झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर लिहिले पत्र
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या चिन्हाला साधर्म्य असलेल्या चिन्हाचे वाटप निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांना केल्याने मोठ्या प्रमाणावर मतांचे नुकसान सोसावे लागले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांचे मताधिक्क कमी झाले. सातारा, बारामतीसह अन्य काही मतदारसंघात अशा पध्दतीने मतांची विभागणी झाल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख …
Read More »भंडारा जिल्ह्यातील ५४७ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन जल पर्यटनच्या वाढीव विकास आराखड्यास मंजुरी देणार
राज्य शासन सर्व सामान्यांचे व शेतकऱ्यांचे सरकार असून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंर्तगत केंद्र सरकारकडून सहा हजार व राज्य सरकारकडून सहा असे बारा हजार रुपये, सानुग्रह अनुदान व धानाला सातशे रुपये बोनस देणारे हे पहिले सरकार आहे. आता ५४७ कोटी रुपये खर्च करून भंडारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. …
Read More »राहुल गांधी यांचा पलटवार , मोदी-शाह यांचा राज्यघटनेवर हल्ला आणीबाणीच्या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यावर पलटवार
१८ व्या लोकसभेचे पहिले पावसाळी अधिवेशनास आज सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांचे नाव न घेता आणीबाणीचा उल्लेख करत काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर पलटवार केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर निर्णय घेण्यास नकार उच्च न्यायालयाचा आदेश येईपर्यंत थांबा
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (२४ जून) तोंडी टिप्पणी केली की अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाच्या स्थगिती अर्जावर आदेश राखून ठेवण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा दृष्टिकोन “थोडासा असामान्य” आहे. सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली की, नेहमीच्या मार्गात, सुनावणीनंतर लगेचच स्थगिती आदेश “जागीच” दिले जातात आणि ते राखून ठेवले जात नाहीत. न्यायमूर्ती मनोज मिश्रा …
Read More »जयंत पाटील यांची टीका, ‘विद्येचे माहेरघर’ ची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ बनतेय सरकारचा नाकर्तेपणा याला जबाबदार
येणाऱ्या प्रत्येक दिवशी पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच एका हॉटेल आणि मॉलमध्ये तरूण-तरूणी ड्रग्ज घेतानाचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची ओळख आज ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ झाली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, दूध उत्पादकांना दर वाढवून द्या अन्यथा… तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातील शेकऱ्यांचेही सरसकट कर्ज माफ करा
महाराष्ट्रातील भाजपा प्रणित सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. विविध राज्यात शेतकऱ्याच्या दुधाला ४५ रुपया पर्यंत भाव मिळत आहे परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुधाला फक्त २७ रुपये भाव मिळतो आणि हेच दूध अमूल व इतर दूध कंपन्यांकडून ग्राहकाला ५५ ते ६० रुपये प्रति लिटर विकले जात आहे. …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, जनादेशाचा पंतप्रधान मोदींवर कोणताही परिणाम नाही… इंडिया आघाडीने संसदेच्या प्रवेशद्वारापासून काढला राज्यघटना वाचवा मोर्चा
केंद्रात एनडीएचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर बहुमत सिध्द करण्यासाठी आणि केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आयोजित पहिल्याच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. सत्ताधारी एनडीएच्या खासदारांना प्रोटेम अध्यक्ष भर्तहरी महताब यांनी खासदारकीची शपथ दिली. लोकसभेचे कामकाज सुरु होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांना संबोधित केले आणि सांगितले की, जनतेने …
Read More »संसद अधिवेशनाला सुरुवात, खासदारांचा शपथविधी, इंडिया आघाडीचा विरोध इंडिया आघाडीकडून संसदेच्या प्रांगणात राज्यघटनेची प्रत घेऊन निदर्शने
केंद्रातील एनडीए सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर पहिल्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. आज सकाळी अधिवेशाला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या बाहेर औपचारिक मनोगत व्यक्त केले. त्यानंतर संसदेच्या कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या खासदारांचा पहिल्यांदा शपथविधी पार पडला. मात्र केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना खाजदारकीची शपथ …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, … मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न माणगाव येथे राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक उभारणार
स्वराज्याबरोबर सुराज्य निर्माण करणे तसेच रयतेचे राज्य आणण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे काम पुढे अविरत सुरू ठेवलं. राज्य शासन हाच विचार पुढे घेऊन जात असून समता, बंधुता, न्याय या तत्वाद्वारे मागासवर्गीय घटकांना विकासाच्या मुख्य …
Read More »
Marathi e-Batmya