बदलापूर मधील अत्यंत लहानग्या मुलींवरील अत्याचाराची घटना महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी आहे.मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ उत्स्फूर्त आंदोलन करणाऱ्या बदलापूरवासियांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करावेत. बदलापूर मधील त्या आंदोलकांना अटक करू नये अशी आपली मागणी असून त्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत अशी माहिती …
Read More »उद्धव ठाकरे यांची घोषणा, मी स्वतः तोंडाला काळी फित लावू बसणार जी तत्परता दाखविली, तशी न्याय देण्यातही दाखवा
बदलापुर अत्याचार प्रकरण दडपण्याचा प्रकाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद ची हाक दिली. परंतु राज्यातील महायुती सरकारला धडकी भरताच सरकार पुरस्कृत लोकांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने कोणत्याही राजकिय पक्षाला बंद करण्याचा अधिकार नाही असा निकाल दिला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत …
Read More »मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी राज्यात दोन लाखांपेक्षा जास्त अर्ज पात्र सामाजिक न्याय विभागाची माहिती
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एकवेळ एकरकमी रुपये ३ हजार त्यांच्या खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्यात २ लाख १४ हजार ९७८ अर्ज पात्र झाले आहेत. राज्यात मुंबई विभागात २९ हजार ९९, …
Read More »रमेश चेन्नीथला यांचा आरोप, भाजपाला ४०० जागांचे बहुमत मिळाल्या… महायुती सरकारला बदलापूर घटनेचे गांभिर्य नाही- नाना पटोले
भारतीय जनता पक्ष व आरएसएस देशाला तोडू पहात आहेत पण राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा व भारत जोडो न्याय यात्रा काढून देशाला जोडण्याचे काम केले आहे. भाजपा आजही धर्म व जातीच्या आधारावर देश तोडण्याचे काम करत आहे. लोकसभा निवडणुकीत देशाच्या जनतेने लोकशाही व राज्यघटना वाचवली. ४०० जागांचे बहुमत मिळाले …
Read More »उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मविआचे बंद ऐवजी काळ्या फिती आंदोलन शरद पवार, नाना पटोले आणि शिवसेना उबाठा कडून भूमिका जाहिर
बदलापूर मधील चिमूरडींवरील झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर उसळलेल्या जनप्रक्षोभाला राजकिय हेतूनं प्रेरित झालेले आंदोलन म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केल्यानंतर हे आंदोलना राजकिय हेतूने प्रेरित होते हे दाखविण्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून सातत्याने वक्तव्ये करण्यात येत आहेत. विरोधक महाविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंदचे आंदोलन हाणून पाडण्याचे प्रयत्नही सत्ताधारी भाजपा, शिवसेना आणि अजित …
Read More »चित्रा वाघ यांचा आरोप, बदलापूर घटनेवरून राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचे विरोधकांचे प्रयत्न
बदलापूरमध्ये राज्यासाठी लज्जास्पद घटना घडल्यानंतर महायुती सरकारने तात्काळ पावले उचलली. मात्र महाविकास आघाडीचे नेते या दुर्दैवी घटनेचे राजकारण करून राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप, भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत चित्रा वाघ बोलत होत्या. यावेळी भाजपा प्रदेश महिला मोर्चा प्रदेश …
Read More »अजित पवार, पार्थ पवार विधानसभा निवडणूकीचे स्टार प्रचारक राष्ट्रवादीकडून २५ स्टार प्रचारकांची घोषणा-प्रभारी सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची माहिती
केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केलेले विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहिर केली असून जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने २५ स्टार प्रचारकांची घोषणा आज केली. या स्टार प्रचारकांची यादीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याबरोबरच त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचेही नाव स्टार प्रचारक म्हणून जाहिर केले. या दोघांसह पक्षाच्या २५ नेत्यांची …
Read More »अजित पवार यांच्या हस्ते, महा – राष्ट्रवादी व्हॉटसअप हेल्पलाईन’ उपक्रमाचे उद्घाटन भ्रष्टाचाराबाबतही तक्रारी करता येणार
राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्यामध्ये विशेषतः महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘महा – राष्ट्रवादी व्हॉटसअप हेल्पलाईन’ हा नवीन उपक्रम तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांपर्यंत जलदगतीने पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे हा उपक्रम राज्यातील महिलांसाठी जीवनदायी ठरणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय …
Read More »बदलापूर प्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करा वंचित बहुजन आघाडीची मागणी
बदलापूर प्रकरणात राज्य सरकारने केलेली अॅड उज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली. संबंधित शाळेचे संचालक मंडळ भारतीय जनता पक्षाशी व आरएसएसशी संबंधित आहे. त्यामुळेच हे प्रकरण हाताळताना राजकीय हस्तक्षेप होऊ शकेल अशी रास्त भिती लोकांना वाटत आहे. भाजपाचे लोकसभेचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम …
Read More »नाना पटोले यांची टीका, …दिल्ली व गुजरात लॉबीसमोर झुकलेले भाजपा सरकार MPSC मधील अधिकारी मग्रुर, कृषी संवर्गाच्या २५८ जागांचे नोटीफेकशन काढा, विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ का यावी?
महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. कर्नाटकतील भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले होते, महायुती सरकार तर त्यापुढे गेले आहे, भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रमच या सरकारने रचले आहेत. महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्ज लादून महागाई वाढवली आहे, महाराष्ट्र हे सर्वात महागडे राज्य अशी ओळख निर्माण झाली आहे. महायुती सरकार गुजरातधार्जिणे असून गुजरातमधून मोठ्या प्रमाणात …
Read More »
Marathi e-Batmya