सध्या देशाची वाटचाल हुकुमशाही कडे चालू आहे. ही हुकूमशाही आपली लोकशाही उद्धवस्त करेल, त्याला उत्तर द्यावं लागेल. ही निवडणूक लोकशाही टिकवण्याकरिता महत्त्वाची आहे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिला. महाविकास आघाडीकडून जालना लोकसभेसाठी डॉ. कल्याण काळे आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे यांना …
Read More »नरेंद्र मोदी यांचे भाकित, ४ जूनला एकमेकांच्या झिंज्या उपटतील, कपडे फाडतील…
गरीबीची कुचेष्टा आणि गरीबांची फसवणूक करणाऱ्या काँग्रेसने जनतेच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही. त्यांच्या इंडी आघाडीतील पक्षांचा परस्परांवर विश्वास नाही, त्यामुळे आता जनतेनेही काँग्रेस व इंडी आघाडीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत विरोधकांवर घणाघाती हल्ले करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी महायुतीच्या महाविजय संकल्प सभांतून मराठवाडा ढवळून काढला. जनतेने मला …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, … नरेंद्र मोदींना चीन घरात घुसल्याचे कसे दिसत नाही?
मोदी सरकार घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक करते असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परभणीच्या प्रचार सभेत सांगितले. पण नरेंद्र मोदी चीनला घाबरतात म्हणूनच चीनने भारताच्या सीमेत घुसखोरी करुन जमीन बळकावली, आपले २० सैनिक मारले तरीही नरेंद्र मोदींना आजपर्यंत ते कसे दिसले नाही, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र …
Read More »लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात ५४ टक्के मतदान
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सरासरी ५४.८५ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे – संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रामटेक ५२.३८ टक्के नागपूर ४७.९१ …
Read More »छगन भुजबळ यांची घोषणा, नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढणार नाही
नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी न लढण्याचा निर्णय घेतला असून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होऊन महायुतीची ताकद अधिक वाढवणार असल्याची घोषणा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली. आज मुंबई येथील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. …
Read More »आदित्य ठाकरे यांचा इशारा, महाराष्ट्र स्वाभिमानी ! तो तुम्ही विकत घेऊ शकत नाही
शिर्डीतील शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहिर सभेला आज शिवसेना नेते आमदार आमदार आदित्य ठाकरे यांच्या आज सभा झाली. यासभेला ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार शंकरराव गडाख, सुनील शिंदे, लहू कानडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष संदीप वरपे उपस्थित होते. या भव्य प्रचार सभेनंतर अहमदनगर जिल्ह्यातील …
Read More »नाना पटोले यांचा विश्वास, मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही संपणार; पराभव अटळ
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा मोठा सहभाग पहायला मिळला. तरुण, शेतकरी, महिला व कामगार मोठ्या संख्येने मतदान करताना दिसले. मोदी सरकारने १० वर्ष आपल्याला फसवेले ही भावना या वर्गात असून मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही या निवडणुकीत संपवण्याचा निर्धार जनतेने …
Read More »प्रविण दरेकर यांचा पलटवार, शरद पवारांचे ते मूर्तीबाबतचे विधान ढोंगीपणाचे
अयोध्येतील राम मंदीरावरून आधीच राजकिय आणि सामाजिकस्तरावर विविध मते मतांतरे आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अयोध्येतील रामाच्या मुर्तीसोबत सीतेची मुर्ती का नाही असा सवाल उपस्थित करत सबंध महिलांच्या मनात कुतूहुल निर्माण झाल्याचे मत पुणे जिल्यातील एका प्रचारसभेत बोलताना व्यक्त केले. यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर …
Read More »लोकसभा निवडणूकः पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात दुपारपर्यंत १९ टक्के मतदान
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वा.पासून सूरु झाले. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सकाळी १२.०० वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :- रामटेक १६.१४ टक्के नागपूर १७.५३ टक्के भंडारा- गोंदिया १९.७२ टक्के गडचिरोली- …
Read More »पहिल्या टप्प्यातील निवडणूक मतदानाला सुरुवात, मणिपूरात हिंसाचार, तर बंगालमध्ये
२०२४ लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी १७ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ मतदारसंघांमध्ये १९ एप्रिल रोजी मतदान सुरू झाले. निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या प्रमुख चेहऱ्यांमध्ये नितीन गडकरी, किरेन रिजिजू, सर्बनदा सोनोवाल, जितेंद्र सिंग आणि भूपेंद्र यादव या आठ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेसचे गौरव गोगोई, द्रमुकच्या कनिमोझी आणि तामिळनाडू भाजपाचे …
Read More »
Marathi e-Batmya