पंतप्रधान मोदी यांची सवाल, राहुल गांधी यांनी अंबानी, अदानीवरील टीका अचानक का थांबवली?

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यापासून काँग्रेस पक्षाने अंबानी आणि अदानी यांच्यावरील कडवट टीका थांबवल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला. राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी भारतीय जनता पक्षाविरुद्ध भाजपा गेल्या पाच वर्षांत खोटे आख्यान पसरवणाऱ्या ‘पाच उद्योगपतींची’ नावे सांगून न थांबता फक्त भाषणबाजी केली अशी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

पंतप्रधानांच्या टीकेला उत्तर देताना, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खुर्ची तीन टप्प्यांतील मतदानानंतर “डळमळीत” झाली आहे, कारण त्यांनी स्वतःच्या “मित्रांवर” हल्ले करण्यास सुरुवात केली आहे आणि हा “खरा ट्रेंड” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून दिसून येत असल्याचे ठामपणे सांगितले.

काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या “वर्णद्वेषी टिपण्णी” नंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशातील लोक त्वचेच्या रंगाच्या आधारावर अपमान सहन करणार नाहीत. यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जाब विचारला.

“त्यांनी अचानक या मोठ्या उद्योगपतींवर टीका करणे का थांबवले? आरोप करणे भाषणातून अचानक थांबवण्यामागे काय घडले? हे काळ्या पैशाच्या व्यवहारामुळे आहे की काँग्रेस पक्षाला निधी देण्यासाठी गुप्त डील? झाल्याचा सवालही पंतप्रधान मोदींनी विचारत या संदर्भात काँग्रेस नेत्यांनी देशातील जनतेला स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे, अशी मागणीही यावेळी केली.

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या आरोपाचा पुनरुच्चार करताना पुन्हा म्हणाले की, तेलंगणातील सध्याच्या कारभारात प्रमुख व्यक्ती दिल्लीतील त्यांच्या बॉसकडे कार्यवाही पाठवण्यासाठी “RR” कर लावत आहेत. कोणाचेही नाव न घेता ते म्हणाले, “एक आरआर लुटून दिल्लीत दुसऱ्या आरला देत आहे. RR कलेक्शनने प्रसिद्ध “RRR” चित्रपटाच्या ₹१००० कोटींच्या कलेक्शनला ओलांडले आहे. आरआर तेलंगणाचा काही क्षणातच नाश करेल, असा आरोपही यावेळी केला. तो म्हणाला.

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस आणि बीआरएस हे दोन्ही भ्रष्टाचार सिंडिकेटचे भागीदार आहेत आणि भ्रष्टाचार आणि कौटुंबिक राजवट ही त्यांची समान वैशिष्ट्ये आहेत, “राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तेलंगणाला कुटुंब शासित पक्षांपासून मुक्त करणे अत्यावश्यक आहे, अशी भूमिकाही यावेळी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हणाले की, काँग्रेस पक्ष तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अवलंब करत असल्याचा आरोप करत इंडिया ब्लॉक आघाडीच्या एका महत्त्वाच्या नेत्याने सांगितले की निवडून आल्यास ते मुस्लिमांना पूर्ण आरक्षण देतील.

नरेंद्र मोदी म्हणाले की, डॉ. बी.आर. आंबेडकर हे धर्माधारित आरक्षणाच्या विरोधात होते आणि काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण हिसकावून त्यांच्या व्होटबँकसाठी आरक्षण देण्यासाठी झुकले आहेत. अयोध्येतील राममंदिराला कुलूप लावण्याचा काँग्रेस पक्ष कट रचत असल्याचा आरोप करत मोदींनी राम मंदिराच्या रक्षणासाठी भाजपा आणि एनडीए आघाडीला मोठा जनादेश देण्याचे आवाहन केले.

काँग्रेस आणि बीआरएस त्यांच्या तुष्टीकरणाचे राजकारण करत हैदराबादमध्ये एआयएमआयएम उमेदवाराचा विजय सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला.

About Editor

Check Also

एमपीएससी अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा माजी मंत्री आ. विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग

एमपीएससी MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, संशयास्पद मूल्यमापन, निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात एमपीएससी MPSC अध्यक्ष व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *