९ हजार शाळांमध्ये ३ लाख विद्यार्थ्यांनी लावली उपस्थिती राज्यातील १ लाख ८६ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी १६४३ कोरोना पॉझिटीव्ह

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर कोरोनाची बाधा विद्यार्थ्यांना होवू नये या उद्देशाने या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार राज्यातील १ लाख ८६ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १६४३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
राज्यात ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग असलेल्या २५ हजार ८६६ शाळा असून या शाळांमध्ये ५९ लाख २७ हजार ४५६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर २ लाख ७५ हजार ४७० शिक्षक कार्यरत आहेत. ९६ हजार ६६६ शिक्षकेतर कर्मचारी काम करत आहेत. राज्यातील एकूण २५ हजार ८६६ शाळांपैकी ९ हजार १२७ शाळा सुरु झालेल्या आहेत. तर शाळांमध्ये २ लाख ९९ हजार १९३ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावल्याचेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती, आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाचे नियोजन

यंदाची आषाढी वारी वारकऱ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने प्रथमच अत्यावश्यक रुग्णांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *