Tag Archives: varsha gaikwad

वर्षा गायकवाड यांची मागणी, महापौर व पालिका आयुक्तांवरच ३०२ चा गुन्हा नोंदवा मुंबईकरांना चौकश्या आणि आश्वासन नको, सुरक्षित मुंबई हवी, जबाबदारी निश्चित करून कारवाई करा

मुंबईत मागील दोन दिवस पडलेल्या पावसाने भाजपा सरकार, बीएमसी प्रशासन व महापौरांनी नालेसफाईचे केलेले दावे फोल आहेत, हेच दाखवून दिले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनही मुंबईकरांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. पावसात मुंबईत होणारा प्रत्येक मृत्यू हा अपघात नाही तर ती व्यवस्थेने केलेली हत्या आहे. पहिल्या पावसात झाड कोसळून …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, पक्ष फोडण्यासारखे पेपर फुटीचेही पेव फुटले, सरकार नावाची व्यवस्था आहे की नाही? टीईटी पेपर फुटी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कडक शिक्षा करा

रविवारी होणाऱ्या TET परीक्षेचा पेपर ठाण्यात लीक झाल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत असून भाजपा महायुती सरकारला एक परिक्षाही घेता येत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पेपर फुटीच्या घटनांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली आहे. या पेपरफुटीच्या रॅकेटच्या मुळापर्यंत जाऊन मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळा. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याऱ्यांना अशी …

Read More »

खासदार वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे लेखी हमीची मागणी धारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी

धारावीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सध्या सुरू असून, धारावी पुनर्विकास प्रकल्प हा केवळ इमारती उभारण्यापुरता मर्यादित नसून धारावीतील नागरिकांच्या सर्वांगीण सामाजिक, आर्थिक विकासाशी निगडित आहे. त्यामुळे धारावीतील रहिवासी, त्यांचे रोजगार, उद्योगधंदे आणि स्थानिक सामाजिक व्यवस्था (इकोसिस्टम) यांना या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी ठेवणे अत्यावश्यक आहे. या सर्व  मुद्द्यांचा विचार करून एक विशेष बैठक आयोजित करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस …

Read More »

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम राबविताना पक्षपातीपणा केला जात असल्याचे दिसून आले आहे. एसआयआर (SIR) मोहिम राबविताना काही बाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्रात पुढील तीन-चार वर्षात कोणत्याच निवडणुका नाहीत, त्यामुळे मुंबईत एसआयआर (SIR) मोहिम राबविताना घाईघाईत न करता त्यासाठी वेळ द्यावा …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र- महायुती सरकारचा निर्णय म्हणजे ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ सत्तेतील भावांकडून लाडक्या बहिणींचा विश्वासघात, मते घेताना निकष आठवले नाहीत का?

भारतीय जनता पक्ष महायुतीने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजनेतून महिना १५०० रुपये देऊन विधानसभा निवडणुकीत महिलांची मते घेतली. आता सत्तेत आल्यानंतर या सरकारला निकष, अटी, शर्थी दिसू लागल्या आहेत. सरकारने निकष लागू करत ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्याचा क्रूर निर्णय घेतला आहे. मते हवी होती त्यावेळी कोणतेही निकष न पाहता योजना जाहीर …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, एसआयआर (SIR) प्रक्रियेतून एकाही मुंबईकराचे नाव वगळले जाणार नाही याची खबरदारी घ्या जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा

लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा केवळ घटनात्मक अधिकार नाही, तर भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. परंतु भाजपा सरकार निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्येही घोटाळा करत आहे. विविध राज्यात राबवण्यात आलेल्या एसआयआर प्रक्रियेतून मोठ्या संख्येने मतदार वगळण्यात आलेले आहेत. अशी परिस्थिती मुंबईकरांवर ओढवू नये, यासाठी एसआयआर प्रक्रियेवर बारीक नजर ठेवावी व एकाही मुंबईकराचे नाव …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, पेट्रोल-डिझेलची दरवाढ अन्यायकारक, दरवाढ तात्काळ मागे घ्या पेट्रोल डिझेल टंचाईची झळ मुंबईतही पोहचली, खोटी व दिशाभूल करणारी विधाने करण्यापेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंधन पुरवठ्यावर लक्ष द्यावे

महागाईने जनता त्रस्त असताना पेट्रोल डिझेलची दरवाढ ही सर्वसामान्य जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटण्याचा प्रकार आहे. मागील ११ दिवसात पेट्रोल डिझेलचे दर प्रति लिटर ८ रुपयांनी वाढले आहेत. ही इंधन दरवाढ सर्वसामान्यांचा खिसा रिकामा करणारी असून  केंद्रातील भाजपा सरकारने ही अन्यायकारक दरवाढ तात्काळ मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मुंबई …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मंत्र्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास लाज वाटते का ? नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्र्यांनी आधी काटकसर करावी व मग दुस-यांना उपदेश द्यावे. परदेश प्रवास टाळा म्हणणारेच परदेश दौऱ्यावर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल, डीजल वापर कमी करणे तसेच मेट्रो सारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले असले तरी त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री व मंत्री त्याकडे कानाडोळा करत आहेत. मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या अर्धी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे पण मुंबई सारख्या शहरात मेट्रो, बेस्ट, लोकल रेल्वे सेवा आहे तर इतर …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा टोला, त्याग व काटकसर मोदींनीव स्वतःपासून करावी पंतप्रधानांच्या सल्ल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्र्यांनीही गाड्यांचा ताफा सोडून मेट्रो, बेस्ट व लालपरीने प्रवास करावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखेर देश संकटात आहे हे कबुल करून स्वतःचे अपयश मान्य केले आहे. १२ वर्षांपासून नरेंद्र मोदींनी देशाला वेठीस धरले आहे. निवडणुका, प्रचार व द्वेष पसरण्यापलिकडे भाजपा व मोदी सरकारने काहीही केलेले नाही. अमेरिका-इराण युद्धाचा फटका देशाला बसणार हे माहित असतानाही मोदी सरकारने कोणतेही नियोजन केले नाही, त्याचा मोठा फटका …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, कायदा सुव्यवस्थेप्रश्नी राज्यपालांनी लक्ष घालावे; ‘शक्ती’ कायदा लागू करा मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांची राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे पत्र पाठवून मागणी

राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. गुन्हेगारांना भिती बसली पाहिजे अशी शिक्षा झाली पाहिजे. नसरापूरच्या घटनेनंतर आतातरी राज्य सरकारने गंभीर होऊन महिला सुरक्षेवर काम करावे, यासाठी राज्यपाल यांनी जातीने लक्ष घालावे व ‘शक्ती’ कायदा लवकरात लवकर राज्यात लागू करावा यासाठी …

Read More »