Tag Archives: eknath shinde

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मेट्रो मार्गांच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये सुरक्षित, जलद सार्वजनिक वाहतुकीस मोठी चालना २०३० पर्यंत ३०० किमीहून अधिक नवीन मार्ग सुरू करण्याचे नियोजन

राज्यातील मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असून मुंबई, पुणे, नागपूर तसेच मुंबई महानगर प्रदेश एमएमआरडीए च्या शहरी भागांमध्ये सुरक्षित, आधुनिक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यास मोठी चालना मिळणार असून भविष्यातील नागरी विकासाला गती मिळणार आहे. या दृष्टीने सदर प्रकल्प काम सुरू झाल्यापासून तीन वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जावे असे निर्देश …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे आठ निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली मंत्रिमंडळाची बैठक

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेस आणखी तीन वर्षाची मुदतवाढ, मुंबईतील शासकीय कार्यालयांसाठी बेस्टची संयुक्त वीज बिलिंग प्रणाली,  राज्य माहिती आयोगात तीन अतिरिक्त आयुक्त, सिल्लोड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासह सरकारी वकील कार्यालय, चांदवड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, किनवट येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत सर्वांना विश्वासात घेणार लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी व्यापक जनजागृती करणार

ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा लाखो ठाणेकरांच्या हितासाठीच हाती घेण्यात आला असून, त्याबद्दल असलेले सर्व गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच या प्रकल्पाबाबत असलेले आक्षेप जाणून घेऊन ते तातडीने दूर करण्यासाठी जागोजागी चर्चासत्रे आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी शिंदे यांनी या प्रकल्पाची अंमलबजावणी …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची स्पष्टोक्ती, अजित डोवाल यांचे राष्ट्रसेवेतील योगदान प्रेरणादायी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देत राष्ट्रवाद, शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक जागृतीचा भक्कम पाया रचला. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा त्यांचा विचार आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत असून विकसित आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक ठरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक वंचितांच्या संघर्षाचे प्रेरणास्थान चिराग नगर येथे भव्य स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहे. चिरागनगर या त्यांच्या कर्मभूमीत उभारण्यात येणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि  स्मारक हे केवळ एक वास्तू नसून वंचित, कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचे, स्वाभिमानाचे; तसेच सामाजिक परिवर्तनाचे जिवंत …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मंत्रिमंडळाची बैठक

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना १२ महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार, एनडीपीएस खालील प्रकरणासाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन, कुर्डूवाडी येथे दिवाणी न्यायालयास मान्यता, कर्जत येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयास मान्यता, अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेडसह यवतमाळला अनन्य विशेष न्यायालये, गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतुकीवर अधिक कठोर …

Read More »

ठाणेकरांच्या स्वप्नपूर्तीकडे एकनाथ शिंदेंचे आणखी एक मोठे पाऊल २०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी कामामुळे दीड वर्षात तीन हात नाका वाहतूक कोंडीमुक्त होणार

ठाणे शहराच्या विकासात आणखी एक ऐतिहासिक पर्व सुरू झाले असून, आशिया खंडातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि वाहतूक कोंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तीन हात नाका चौकाच्या कायमस्वरूपी विकासासाठी उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. ठाणेकरांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देणारा हा …

Read More »

४४ हजार कोटींचे ‘अर्बन चॅलेंज फंड’ अभियान; मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशीच शासन निर्णय जारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशीच आज नगर विकास विभागाने  ‘अर्बन चॅलेंज फंड’ अभियानाची राज्यातील सर्व ४२३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढला आहे. राज्यात ४४ हजार ८०० कोटी रुपयांचे विकास प्रकल्प यातून आकाराला येणार असून यामुळे शहरांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास …

Read More »

एकनाथ शिंदे यांची भावनिक प्रतिक्रिया, एका डोळ्यात आनंद, दुसऱ्या डोळ्यात अश्रू… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या आठवणींची हुरहूर; "दादांची स्वप्ने पूर्ण करणे हीच दादांना खरी आदरांजली" – एकनाथ शिंदे

Eknath-Shinde-Ajit-Pawar-Together

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत भावनिक शब्दांत त्यांना अभिवादन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आणि महायुतीचे शिल्पकार अजितदादा पवार यांच्या आठवणींचे दुःख, अशा संमिश्र भावनांनी आजचा दिवस भरून गेल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आजचा दिवस एका डोळ्यात आनंद …

Read More »

राज्यातील १७७ आकांक्षित तालुक्यांमध्ये एक वर्षाकरिता आकांक्षित तालुका कार्यक्रम राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यातील १७७ आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सन २०२६-२७ साठी आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. नीति आयोगाने देशातील दुर्लक्षित व मागासलेल्या ११२ जिल्ह्यांमध्ये आकांक्षित जिल्हा कार्यक्रम व ५०० अल्प विकसित तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्यामध्ये राज्यातील …

Read More »