एनईपी अर्थात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या माध्यमातून हिंदी भाषा लागू करण्याचा घाट केंद्रातील भाजपाकडून घातला जात असल्याच्या मुद्यावरून तामीळनाडू सरकारने केंद्राच्या भूमिकेच्या विरोधात धोरण स्विकारले आहे. त्यातच केंद्र सरकारनेही तामीळनाडूला पंतप्रधान श्री शाळा योजनेंतर्गत देण्यात येणारा निधी अडवला आहे. त्यास प्रत्युत्तर म्हणून तामीळनाडूने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने तयार …
Read More »गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशानंतरही मणिपूरमध्ये बंद कायम मुक्त हालचालीच्याबाबत अंमलबजावणी नाहीच
गुरुवारी संध्याकाळी कुकी झो कौन्सिलने मणिपूरच्या कुकी-झो भागातील ८ मार्चपासून सुरू असलेला बंद उठवण्याची घोषणा केली असली तरी, केंद्र ज्या राज्यात “मुक्त हालचाली” शोधत आहे त्या नेत्यांचा विरोध कायम आहे. ते म्हणतात की राजकीय तोडगा काढल्याशिवाय ते “शांतता बळजबरी” आणि “शांतता बिघडवणे” शक्य नाही. यासंदर्भात एका वृत्तसंस्थेशी बोलताना कुकी-झो च्या …
Read More »तुषार गांधी यांचा इशारा, देशद्रोह्यांना उघडं पाडण्याचा निर्धार कायम, आरएसएस म्हणजे विष केरळमधील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर टीका
मागील काही काळात संपूर्ण देशभरातच धार्मिक तणाव वाढीस लागला आहे. त्यातच यातील अनेक प्रकरणांच्या मुळांची सत्ताधारी पक्ष आणि त्या पक्षाची मातृसंस्थाच जबाबदार असल्याचे पाह्यला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांचे नातू ततुथा गांधीवादी विचारांचे तुषार गांधी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवर संघाच्या निषेधाला न घाबरता टी करताना म्हणाले की, देशद्रोह्यांना उघडं …
Read More »त्या वक्तव्याने संशयाच्या भोवऱ्यातील जयंत पाटील यांची स्पष्टोक्ती, आता मला बाहेर… शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे लाखो चाहते आहेत
मागील काही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सततच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा झडत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी रात्री उशीराने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटल्याचे वृत्त पुढे आली. तसेच त्यांच्या संस्थेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या नव्या कॉलेजच्या उद्घाटनाला भाजपाचे नेते नितीन गडकरी हे …
Read More »रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी रोहिणी खडसेंचा संताप, नेमका आका कोण? छेडछाडीच्या घटनेस १० दिवस झाले तरी तीन आरोपी अद्यापही फरारच
केंद्रीय राज्यमंत्री तथा एकनाथ खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी स्वतः पोलिस स्टेशनला जात पोलिसांत जाऊन तक्रार नोंदविली. मात्र त्यानंतर थोडी हालचाल होत एकाला अटक करण्यात आले. मात्र अद्यापही तीन आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांच्या …
Read More »बुरा ना मानो….म्हणत चित्रातला वाघ मांजरीनीपेक्षा भित्रा, सुषमा अंधारे यांची टीका शिंदे गटातील फुटीर नेत्यांवर टीका करत भाजपा नेत्यांवरही साधला निशाणा
आज होळीनंतरचा धुळवडीचा सण या सणाच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांनीही या धुळवडीचा आनंद कुटुंबिय, कार्यकर्त्यांसह साजरा करण्यास सुरुवात केली. तर काही नेत्यांनी प्रतिस्पर्धी नेत्यांवर किंवा पक्षावर राजकिय टीके-आरोपांची राड टाकत राजकीय धुळवड साजरी केली. यात शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी भाजपा, शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांवर राडीचे शाब्दीक फटकारे ओढत …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, युवा शेतकरी कैलास नागरेची आत्महत्या हा भाजपा सरकारने घेतलेला बळी नागरे यांना आत्महत्या करायला भाग पाडणा-या प्रशासकीय अधिका-यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा
राज्यातील भाजपा महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनता व शेतकरी, कष्टकरी यांचे नसून ते फक्त मूठभर उद्योगपती व कंत्राटदारांचे आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला वीज, पाणी नाही म्हणून शेतकरी त्रस्त आहे पण कुंभकर्णी झोपेतील सरकारला ते दिसत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळचा तरुण शेतकरी कैलास नागरेनी केलेली आत्महत्या ही भाजपा सरकारच्या …
Read More »वर्षा गायकवाड यांची टीका, ८० कोटी लोकांना मोफत धान्य, भाजपा सरकारने कोणाचा विकास केला? मागील ११ वर्षात देशात गरिब व श्रीमंत दरी वाढली; भाजपा सरकारचा विकास फक्त मुठभर श्रीमंतांसाठी
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून देशात ८० कोटी तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ७६.३२% आणि शहरी भागात ४५.३४% लोकसंख्या लाभार्थी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गरिब लोक आहेत तर मग ११ वर्षात कोणाचा विकास झाला? असा प्रश्न उपस्थित करत भाजपा सरकारच्या काळात फक्त मुठभर लोकांचा विकास झाला असून बहुसंख्य जनता ही गरिबीचे जीवन जगत आहे, विकासाच्या फक्त …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप,…महाराष्ट्राचा तालीबान करण्याचा भाजपाचा डाव धार्मिक विष कालवणाऱ्या नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का?, नसेल तर तात्काळ हकालपट्टी करा
महाराष्ट्राला महान साधू संत व महापुरुषांचा जाज्वल्य इतिहास आहे. पण एका विशिष्ट विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवून, इतिहासाचे विद्रूपीकरण करून वातावरण दुषीत करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव घेऊन महाराष्ट्राच्या सामाजिक …
Read More »अजित पवार यांची घोषणा,.. तरच गृहनिर्माण सोसायटीच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुदुकान सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक विधानसभेत केली घोषणा
राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक राहील. सोसायटीच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’शिवाय राज्यात नवीन बियर शॉपी किंवा दारु दुकान सुरु करता येणार नाही, अशी रोखठोक आणि स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केली. अजित पवार …
Read More »
Marathi e-Batmya