निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींच्या विरोधातील तक्रारीबद्दल नड्डा यांना नोटीस

केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांना नोटीस बजावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या तक्रारींवर पक्षाचे उत्तर मागितले आहे. ईसीआयने भाजपला २९ एप्रिलपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.

अशीच नोटीस काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भाजपाने राहुल गांधींविरोधात केलेल्या तक्रारींवरून बजावली होती. निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रांमध्ये नरेंद्र मोदी, राहुल गांधी किंवा मल्लिकार्जून खर्गे यांचे थेट नाव नव्हते, परंतु त्यांना मिळालेली निवेदने संबंधित पत्रांशी जोडलेली होती आणि त्यात तिन्ही नेत्यांवरील आरोपांचा तपशील होता.

केंद्रीय निवडणूक आयोग ECI ने लोकप्रतिनिधी कायद्याचे कलम ७७ लागू केले आहे आणि स्टार प्रचारकांवरील वक्तव्याची जबाबदारीही पक्षाध्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे स्टार प्रचारांवर नियमाचे उल्लंघनप्रकरणी पहिली पायरी म्हणून पक्षाध्यक्षांना जबाबदार धरले आहे.

“स्टार प्रचारकांनी नेहमी संपूर्ण भारतीय दृष्टीकोन ठेवावा आणि निवडणूकीच्या प्रचारात योग्य पध्दतीचे योगदान देणे अपेक्षित आहे, जे कधीकधी स्थानिक पातळीवर राजकिय पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना आणि राजकिय वातावरणात आक्रमकता जोष निर्माण करण्यासाठी विकृत शब्दांचा किंवा कृत्याचा आधार घेतला जातो. अशा प्रकारे, स्थानिक पातळीवर जोषाची परिस्थितीच्या नावाखाली परिस्थितीला वेगळेच वळण लागून मोहिमेची तीव्रता विस्कळीत होते किंवा अनवधानाने अशा सीमा ओलांडते तेव्हा सुधारात्मक कृती किंवा एक प्रकारचा उपचारात्मक स्पर्श प्रदान करणे ही स्टार प्रचारकांकडून अपेक्षा आहे,” असे मत वरिष्ठ प्रधान सचिव नरेंद्र एन. बुटोलिया यांनी जे पी नड्डा यांना पत्रात लिहिले.

“त्यामुळे स्टार प्रचारकांनी “राजकीय पक्षांच्या कार्यक्रमाचा प्रचार” करण्यासाठी या विशेषाधिकाराचा उपयोग करणे अपेक्षित आहे आणि म्हणूनच, प्रचाराच्या ठिकाणी त्यांच्या भाषणांना अनुपालनाच्या उच्च दर्जांत्मक उंबरठ्यावर न्याय देणे आवश्यक आहे,” असेही ते म्हणाले.

ईसीआयने २३ एप्रिल रोजी सांगितले की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील एका सभेत केलेल्या भाषणाच्या विरोधात केलेल्या तक्रारीची तपासणी करेल जिथे त्यांनी म्हटले होते की केंद्रात सत्तेवर निवडून आल्यास विरोधी काँग्रेस मुस्लिमांमध्ये सोने लोकांच्या मालमत्ता, जमिन मालमत्तांचे वाटप करेल.

दुसरीकडे, भाजपाने निवडणूक आयोगाला लिहिले होते की, राहुल गांधी यांनी तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे भाषणादरम्यान मोदींवर अत्यंत वाईट आणि अत्यंत वाईट आरोप केले. खर्गे यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींशी भेदभाव केल्यामुळे त्यांना राम मंदिर अभिषेक सोहळ्याला आमंत्रित करण्यात आले नाही असा दावा करून आदर्श संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोपही केला..

About Editor

Check Also

औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीप्रकरणी आरोपांवर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा खुलासा एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी वैयक्तिक आरोप झाल्यानंतर खुलासा केला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून माझ्याविरोधात वैयक्तिक आरोप करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *