मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश

राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसापरतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.मुळे झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुख्यमंत्री शिदे म्हणाले की, राज्यातील विविध भागांमध्ये अमरावती, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मराठवाडा आदी विविध भागातील विविध जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये मागील काही दिवसात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी शेतपिकांचे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी शेतात काढून ठेवलेल्या विविध प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काढलेली पिके भिजली आहेत. विशेषतः भात, सोयाबीन, तूर, कपाशी, ऊस आदी विविध प्रकारच्या पिकांसह फळबागांचेही नुकसान झाले आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.
तसेच पंचनामे आणि नुकसान भरपाईसाठी नुकसानग्रस्त गावांमध्ये त्वरित यंत्रणा कार्यरत करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, असे निर्देशही यावेळी दिले.

शेवटी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जिल्हास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तालुकास्तरीय यंत्रणा, इतर सर्व संबंधित विभाग यांनी यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही यावेळी केल्या.

About Editor

Check Also

भाजपाच्या नाकावर टिच्चून राहुल गांधींचा पुण्यात मुलींशी संवाद; ’छात्रों की गुंज’चा आवाज महाराष्ट्रभर.. महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता 'मनुस्मृती'तून आली, आज आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध: राहुल गांधी.

राहुल गांधी यांचा छात्रों की गुंज हा देशातील चौथा कार्यक्रम पुणे येथे हजारो मुलींच्या साक्षीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *