महाराष्ट्रात मराठी भाषा शाळेत शिकवावी, दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात हा कायदा करावा लागतो, ही वेळ का आली, ही विचार करण्याची गोष्ट असल्याचा सवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत मराठी भाषेत बोला, असे म्हटले की आमच्यावर टीका होते, मी टीकेला घाबरत नाही. टीका करणाऱ्यांची किंमत मला माहितीय मला त्याची काळजी नाही. पण जेव्हा आम्ही …
Read More »मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोमणा, “रुसवे, फुगवे, कटुता निर्माणासाठी काहीजणांच्या मनाच्या गुढ्या” जीएसटी भवन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री ठाकरेंची विरोधकांवर टोलेबाजी
एक वातावरण तयार केले जातय, की सरकारमध्ये कुठेतरी रुसवे, फुगवे सुरू आहेत. तसेच हे रूसवे, फुगवे आणि कटुता निर्माण व्हावी अशा काहीजण मनाच्या गुढ्या उभारत आहेत असा खोचक टोमणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधकांना लगावत पुढे म्हणाले की, मात्र तसं काही नाही. आपण हे सरकार जे स्थापन केले, त्याचं नावच …
Read More »सतिश उकेंच्या आडून मला व काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र सतीश उकेंमुळे भाजपाचे काही नेते कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने ईडीमार्फत कारवाई
नागपूरचे वकील सतिश उके यांना ईडीने अटक केल्यानंतर नाना पटोले यांच्या वकीलाला अटक असा अपप्रचार केला जात आहे. राज्यात काँग्रेस पक्षाला समर्थन वाढत असल्याने जाणीवपूर्वक माझी व काँग्रेस पक्षाची बदनामी केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले …
Read More »महाविकास आघाडीतील नाट्यावरून चंद्रकांत पाटील म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांना आधीच सांगितले मातोश्रीवरही कॅमेरे लागतील
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री पदावरून सुरु झालेल्या शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस नाट्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे कमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आहेत. राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पे रोलवर काम करत असल्याची टीका …
Read More »गृहमंत्र्यांच्या कामकाजशैलीवरून आक्रमक झालेल्या संजय राऊतांचे रात्री घुमजाव दिलीप वळसे-पाटलांची भेट आणि संजय राऊतांची माघार
नागपूरचे अॅड सतीश उके यांना ईडीने अटक केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीकेचा भडीमार केला. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी थेट गृहमंत्री पद सांभाळणारे दिलीप वळसे-पाटील यांच्यावर निशाणा साधला. मात्र दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची दोन वेळा भेट घेतल्यानंतर मात्र संजय राऊत यांची भूमिका म्यान झाल्याचे दिसून आले. …
Read More »गृहमंत्री पदावरून दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, हे सारे मुख्यमंत्र्यांनाच… मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर वळसे-पाटील यांची प्रतिक्रिया
अॅड. सतीश उके यांच्यावर केंद्रीय यंत्रणांनी केलेल्या कारवाईवरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी गृह मंत्र्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीला रवाना झाले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर याबाबतची माहिती तुम्हीच त्यांना विचारा असे सांगत याप्रश्नी अधिक बोलण्याचे …
Read More »मेट्रो उद्घाटनाला फडणवीसांना निमंत्रण नाही, मात्र भाजपाच्या “त्या” खासदाराला विशेष आमंत्रित एमएमआरडीच्या निमंत्रण पत्रिकेत फडणवीसांचा उल्लेखही नाही
भाजपा आणि महाविकास आघाडी विशेषतः शिवसेनेशी सुरु असलेली राजकिय लढाई फारच हमरी-तुमरीवर आल्याचे दिसत आहे. मुंबईतल्या दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन गुढी पाढव्याच्या दिवशी होत असताना मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या उद्घाटनाचे निमंत्रण नसल्याची माहिती उघडकीस आली असून त्यांच्याऐवजी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना निमंत्रित करण्यात आल्याचे …
Read More »मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदाच्या आदला बदलीच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत खळबळ भाजपा नेते सुधीर मुनगंटावीर यांच्या वक्तव्यानंतर राजकिय टीका-टीपण्णीला वेग
राज्यातील महाविकास आघाडीतील ऐक्यतेवरून प्रत्येक वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सातत्याने ग्वाही देण्यात येते. मात्र राज्यात मुख्यमंत्री, गृहमंत्री पदांची आदलाबदल करण्याबाबत शिवसेनेतील काही नेत्यांकडून मागणी करण्यात येत असल्याचे वक्तव्य भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांपासून ते …
Read More »सहकारी संस्थांच्या सभासदांना दिलासाः १९६० कायद्यातील “ती” तरतूद रद्द महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये सुधारणा अक्रियाशील सदस्याची तरतुद रद्द
राज्यातील अंदाजीत दोन लाख सहकारी संस्थांशी जवळ जवळ पाच कोटी लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संबंधित असणा-या सभासदांच्या हितार्थ आणि सहकार चळवळीच्या सुरळीत कामकाजासाठी सहकारी संस्थांचे नियंत्रण व संनियंत्रण करणा-या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये सुधारणा करून यामध्ये अक्रियाशील सदस्याची तरतुद रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे असंख्य सहकारी संस्थांच्या सभासदांना दिलासा …
Read More »किरण मुझुमदार शॉ यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने केले उद्योजकांना “हे” आवाहन एकात्मतेसाठी आवाज उठवावा -प्रवक्ते महेश तपासे
कर्नाटकात सध्या हलाल मीट (मटणावरून) राज्यात काही संघटनांनी फतवे काढले असून याविरोधात उद्योग जगतातील बायोकॉन कंपनीच्या प्रमुख किरण मुजुमदार शॉ यांनी आवाज उठवतानाच या गोष्टीमुळे देशातील एकात्मतेला बाधा निर्माण होत असल्याची भीती व्यक्त करत कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना सर्वसमावेशक धोरण असावे असे सूचित केले. तशाच पध्दतीने उद्योग जगतातील सर्व लोकांनी एकात्मतेसाठी आवाज …
Read More »
Marathi e-Batmya