सोलापूर शहरातील काँग्रेसचे नेते तथा माजी महापौर आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे यांचे आज प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी काही मित्रांसोबत गेले होते. तेथे सकाळी गंगा नदीत स्थान करताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर महेश कोठे यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच महेश कोठे (वय-६०) यांचे निधन झाले. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरु करा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आगामी १०० दिवस कामांच्या आराखड्याचा आढावा
राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी आणि पर्यटनाला गती देणाऱ्या शासनाच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे आगामी शंभर दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे …
Read More »माहिती लोकांपर्यंत प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार एआय तंत्राचाही वापर, नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजीटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यात येईल. विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य शासनाच्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा घेतला आढावा
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमण्यात येणार असून नाशिक येथील राम- काल पथ विकास, आणि सिंधुदुर्ग (मालवण) येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉररूमशी जोडण्यात येतील, केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. यासह राज्य लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत पर्यटन विभागाच्या १४ सेवा ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर …
Read More »रोहित पवार यांची टीका, देशमुख कुटुंबियावर आंदोलनाची वेळ येणं हेच दुर्दैवी धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या आंदोलनावर व्यक्त केली भूमिका
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत असतानाच आणि याप्रकरणी राज्यातील जनतेच्या भावना तीव्र असताना राज्य सरकारकडून राजकीय तडजोड करत या प्रकरणाचा तपास करत असल्याची चर्चा सर्वच क्षेत्रात आहे. त्याच या हत्या प्रकरणातील तपासाची माहिती पोलिसांकडून देशमुख कुटुंबियांना देण्यात येत नसल्याच्या मागणीवरून संतोष देशमुख यांचे बंधू …
Read More »चार-सहा तासाच्या आंदोलनानंतर धनंजय देशमुख यांचे आंदोलन मागे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाची माहिती द्यावी या मागणीसाठी आंदोलन
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांकडून सध्या सुरु असलेल्या तपासाची माहिती द्यावी या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाठपुरावा करूनही अद्याप याप्रकरणाच्या तपासाची माहिती दिली नाही. उलट धनंजय देशमुख यांना धमकाविण्याचा प्रकार काहीजणांकडून होत आहे. त्यामुळे धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांकडून पोलिस प्रशासनाच्या विरोधात पाण्याच्या टाकीवर …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारा पणन विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा
दरवर्षी पणन विभागामार्फत सोयाबीनची खरेदी केली जाते. ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे पणन विभागाकडून १०० दिवसात करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणारे …
Read More »राज्यघटनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसचे राज्यव्यापी अभियान २६ जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२६ ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’ व्यापक जनसंपर्क अभियान
भाजपाकडून संविधान व संविधाननिर्मात्याचा सात्यत्याने अवमान केला जात असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान, राज्यघटना, सामाजिक न्याय व समानतेच्या मुल्यांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कट्टीबद्ध आहे. याच हेतूने काँग्रेस पक्षाने ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ हे अभियान आयोजित केले आहे. देशपातळीवर ३ जानेवारीपासून हे अभियान सुरु झाले असून …
Read More »दिल्लीत भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार रमेश बिधुरीः केजरीवाल यांचा दावा रमेश बिधुरी यांनी मात्र केजरीवाल यांचा दावा फेटाळला
पुढील महिन्यात होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाचे उमेदवार असल्याचा आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा दावा भाजपा नेते रमेश बिधुरी यांनी रविवारी फेटाळून लावला. रमेश बिधुरी यांनी या अटकळीला “पूर्णपणे निराधार” म्हटले आणि पक्षाचे समर्पित कार्यकर्ते म्हणून लोकांची सेवा करण्यावर आपले लक्ष असल्याचे सांगितले. रविवारी जारी केलेल्या पत्रात, रमेश …
Read More »नितीन गडकरी यांचे प्रतिपादन, पक्षाची जबाबदारी रामराज्य, शिवशाही आणण्याची सामाजिक समता आणि समृद्ध महाराष्ट्र
आपला महाराष्ट्र समृद्ध आहे. ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्याची ताकद महाराष्ट्राकडे आहे. महाराष्ट्राची अधिकाधिक प्रगती झाली तर देशाचे भविष्य उज्जवल होणार आहे. शिवशाही आणि रामराज्याच्या अपेक्षेने जनतेने अभूतपूर्व यशातून बहाल केलेल्या या सत्तेचा उपयोग करून महाराष्ट्र समृद्ध व्हावा, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, महाराष्ट्रात शिवशाही निर्माण व्हावी, ही देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची, …
Read More »
Marathi e-Batmya