राजकारण

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठाला डिवचले, जनतेनेच दाखवून दिले खरी शिवसेना… नवी मुंबई, पालघर, मुरबाड, नाशिक,धुळे, साक्री, परभणी येथील उबाठा गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

उबाठा गटाचे प्रमुख निवडणुकीपूर्वी बोलताना आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागणार आहोत असे म्हणाले होते. आता जनताच ठरवेल खरी शिवसेना कुणाची..? असे वक्तव्य केले होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अखेर जनतेनेच खरी शिवसेना कुणाची ते दाखवून दिले असल्याचा खोचक टोला उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचे आपवर टीकास्त्र, मुख्यमंत्री निवासस्थान म्हणजे शीशमहल कॅगच्या अहवालाचा आधार घेत अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कॅगच्या अहवालाचा देत आम आदमी पक्षावर (आप) फक्त ‘शीश महल’ अर्थात मुख्यमंत्री निवासस्थावर केलेला खर्चावर टीका करत अरविंद केजरीवाल हे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी असताना त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानासाठी भाजपाचे नाव, आणि काहीतरी ते आप AAP च्या भ्रष्टाचाराचे प्रतीक आहे असा आरोप केला. दिल्लीतील रोहिणी येथील …

Read More »

दादाजी भुसे यांचे आवाहन, शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी योगदान द्यावे चर्चा सत्रात केले आवाहन

गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धतीत विद्यार्थी फक्त परीक्षांसाठी तयार न होता जीवनासाठी तयार होतात, आणि शिक्षण हा त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा स्रोत बनतो. यामुळे शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी आनंददायी शिक्षण पद्धतीच्या यशस्वीतेसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले. ‘गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती’ या विषयावर जयहिंद …

Read More »

देशमुख यांच्या मारेकऱ्यांबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाष्य…मारेकरी गुजरातमध्ये काही दिवस मंदिराच्या आश्रमात लपले होते

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना झाला, परंतु या महिनाभरात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यातच देशमुख यांच्या सगळ्या मारेकऱ्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी राज्याच्या विविध जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चे काढण्यात येत आहेत. तसेच त्या मोर्चांमधील आक्रमक भाषणांवरून आणि महायुतीतील …

Read More »

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावरून मुलगी वैभवी देशमुख यांचा सवाल एक महिना झाला तरी अद्याप न्याय नाही

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यात सामाजिक आणि राजकिय स्तरावर चांगलेच उमटायला लागले आहेत. या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी आणि त्यांना फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी सातत्याने देशमुख कुटुंबिंयाबरोबर सर्वच राजकिय नेत्यांकडून करण्यात येत आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या हत्या प्रकरणातील संशयित …

Read More »

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोठे वक्तत्य, आता महिलांनी ठरवायचंय…. कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा ते

राज्यात विधानसभा निवडणूका जिंकण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्यात सुरु करत १५०० रूपयांची भुरळ महिलांवर घालत सरकारी पैशातून मते विकत घेतल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत आहे. आता विधानसभा निवडणूका होऊन जवळपास दोन महिने झाले. त्यातच राज्याच्या तिजोरीची अवस्था तोळामासाची होत आहे. त्यामुळे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचना, राज्यात इनोव्हेशन हब विकसित करा अल्प कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एक लाख दहा हजार युवकांना प्रशिक्षित

राज्यांतील तरूणांमध्ये कौशल्य विकास करीत असताना त्यांच्या मध्ये नाविन्यता विकासासाठी ठिकठिकाणी इनोव्हेशन हब विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विभागामार्फत अल्प कालावधीचे प्रशिक्षण …

Read More »

वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट, राजन साळवी आणि मला ऑफर….. लोकसभा निवडणूकीनंतर आलेल्या ऑफरची माहिती

लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूका पार पडून त्यातून निवडूण आलेले सरकारही स्थानापन्न झाले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटातील नेत्यांना भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सातत्याने त्यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी विविधस्तरावरून कशा ऑफर देण्यात येत होत्या याची माहिती माजी आमदार वैभव नाईक यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा प्रत्येक मेट्रो मार्गाचा घेतला आढावा

एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा; या कामांना विलंब चालणार नाही, पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान ५० किमी मेट्रो कार्यान्वित होतील, असे नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, पालकमंत्री पदाबाबत कधी नव्हे ती ऐवढी चर्चा का? पालकमंत्र्यांनी लवकर जबाबदारी घेऊन कामाला लागावं

महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांबद्दलची अस्वस्थता फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आहे. दिल्लीतील अनेक खासदार, विचारवंत आणि माध्यम विचारतायत की महाराष्ट्रात चाललंय काय ? अशा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बीडमधील हत्येबाबत दिल्लीमध्येही प्रचंड चर्चा …

Read More »