राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. ३ मार्च ते बुधवार दि. २६ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक रविवारी झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. या …
Read More »विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची स्पष्टोक्ती, न्यायालयाच्या निकालाची प्रत मला मिळाली नाही मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर न्यायालयाची प्रत मिळाल्यानंतरच कारवाई
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या न्यायालयाने दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच ५० हजार रूपयांचा दंडही ठोठावला. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी कधी आणि आमदाराकीवर निर्णय केव्हा अशी विचारणा विरोधकांकडून केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून …
Read More »नीलम गोऱ्हे यांच्या आरोपावर उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली मोठी प्रतिक्रिया… उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेने नीलम गोऱ्हे यांची सावध भूमिका
दिल्लीतील साहित्य संमेलनात मी कसा घडलो या कार्यक्रमात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना मुलाखत वजा कार्यक्रम करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. मात्र शिंदे यांच्या शिवसेनेत असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावर संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया देत …
Read More »नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप, मात्र संजय राऊत यांच्या प्रत्युत्तरावर सावध दिल्लीतील साहित्य संमेलनात आम्ही कसे घडलो कार्यक्रमात बोलताना गोऱ्हे यांचा आरोप
९८ व्या अखिल भारतीय साहित्य समंलेनाच्या निमित्ताने दिल्लीत सध्या राज्यातील साहित्यिक, प्रेक्षक-वाचक यांच्याबरोबरच राजकिय नेत्यांची वर्दळही सुरु आहे. आज साहित्य संमेलनस्थळी मी कसा घडलो या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना बोलविण्यात आले. यावेळी नीलम गोऱ्हे यांच्या मुलाखत वजा कार्यक्रम पार पडली. यावेळी …
Read More »राष्ट्रवादीच्या ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’पदी माजी मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार लहू कानडे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली निवड जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’पदी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील आणि माजी आमदार लहू कानडे यांची प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज नियुक्ती केली आहे. अनिल भाईदास पाटील यांच्यावर जळगाव, नंदुरबार व धुळे जिल्हा संघटनेच्या प्रभारी पदाची तर लहू कानडे यांच्यावर सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे …
Read More »हलक्यात घेऊ नका, एकनाथ शिंदे यांचा इशारा नेमका कोणासाठी फडणवीस की ठाकरे एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिलेल्या प्रकल्पांना स्थगिती आणि चौकशी
राज्यातील शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाढत्या दरीच्या कथित चर्चेदरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विरोधकांना हलके न घेण्याचा इशारा दिला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकांना टाळाटाळ करणारे एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या पतनाचा संदर्भ देत …
Read More »१० वीचा पेपर फुटला, पुणे मंडळ म्हणते, वृत्त चुकीचे बोर्डाच्या परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यात सरकार व शालेय शिक्षण विभाग अपयशी?
१० वी च्या परिक्षेला आज सुरुवात झाली,मात्र या १० वी परिक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची घटना घडली. पेपर सुरु झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यानंतर उत्तर पत्रिकेच्या छायाकिंग प्रत काढून विद्यार्थ्यांना पुरविल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. जालन्यात हा प्रकार घडल्यानंतर यवतमाळ येथेही असाच प्रकार घडला. त्यामुळे विद्यार्थी आणि …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी रद्दचा आदेश कधी? राहुल गांधी आणि सुनिल केदार यांच्याबाबत २४ तासात आदेश
आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत न्यायालयाने आदेश दिल्यानंतर २४ तासाच्या आत खासदार की करण्यात आली. तर काँग्रेसचे राज्यातील आमदार सुनिल केदार यांची आमदारकी त्याच न्यायाने २४ तासात रद्द केली. मात्र आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्दचा आदेश विधानसभा अध्यक्ष कधी काढणार असा सवाल …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, राहुल गांधी, सुनिल केदार आणि माणिकराव कोकाटेंना वेगवेगळा न्याय का? कोकाटेंची आमदारकी तात्काळ रद्द करा
भारतीय जनता पक्ष लोकशाही व संविधानाला डावलून काम करत आहे. स्वतःला एक न्याय व विरोधकांना दुसरा न्याय अशी भाजपाची लोकशाहीविरोधी भूमिका आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी व सुनील केदार यांच्या बाबतीत जो न्याय लागू केला गेला तोच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत लागू केला पाहिजे. न्यायालयाने दोषी ठरवल्याने माणिकराव कोकाटे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, माणिकराव कोकाटे यांची राज्यपालांनी हकालपट्टी करत आमदारकी रद्द करावी कोकाटे मुंडे प्रकरणात सत्ताधारी पक्षाकडून भ्रष्ट मंत्र्यांचा बचाव, सत्ताधारी व विरोधकांना वेगळा न्याय का?
रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा देऊन आदर्श घालून दिला आहे. पण आत्ताच्या सत्ताधारी भाजपाने नैतिकतेला हरताळ फासला आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना फसवणूक प्रकरणी न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता, पण तसे झाले …
Read More »
Marathi e-Batmya