भोंदुबाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावर मुख्यमंत्र्यांनी केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. आता रुपाली चाकणकर यांच्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, अशोक खरात याला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. भोंदु प्रकरणाची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी …
Read More »सुषमा अंधारे यांचा सवाल, एकनाथ शिंदेच्या फोनचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहमंत्री दाखवणार का? भोंदू बाबा खरात प्रकऱणावरून सुषमा अंधारे यांचा सवाल
राज्याच्या राजकारणात उच्च पदावर असलेल्या नेत्यांचे भविष्य सांगणारा भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी ज्या नेत्यांचा यामध्ये संबंध आहे, त्यांचे सीडीआर तपासणी करण्याची मागणी केली ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखाते दाखवेल का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. अशोक खरात …
Read More »तुषार गांधी यांचे आवाहन, रा. स्व. संघाच्या विचाराला महाडच्या ऐतिहासिक भूमितच गाडून टाका छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंद करू नका: उल्का महाजन
मनुवादी व्यवस्थेने जसे अनेक घटकांवर नियंत्रण ठेवले होते तसेच पाण्यावरही नियंत्रण ठेवून समाजातील एका घटकाला पाण्यापासून वंचित ठेवले होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ साली महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून ऐतिहासिक क्रांती केली. या ऐतिहासिक क्रांतीने जातीयवादी, स्पृश्य अस्पृश्य व्यवस्थेला मूठमाती देत समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटीची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी बहुआयामी उपाययोजना केवळ डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण करण्याबरोबरच खर्च नियंत्रणासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले जात असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली. डिझेल खरेदीची निविदा प्रक्रिया कोणताही हस्तक्षेप सहन न करता पारदर्शक पद्धतीने राबविल्यामुळे केवळ …
Read More »वर्षा गायकवाड यांचे आव्हान, गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागा महापौर रितु तावडे यांना खासदार वर्षा गायकवाड यांचे आव्हान
मुंबईच्या महापौरांची जबाबदारी वीज, रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधा पुरवण्याची आहे पण त्या सतत बांगलादेशींबद्दल बोलत राहतात. भाजपच्या १२ वर्षांच्या राजवटीनंतरही जर मुंबईत बांगलादेशी राहत असतील, तर तो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोष आहे. दोन्ही गृहमंत्री अपयशी ठरले आहेत, अशावेळी महापौर रितु तावडे यांनी अमित शाह व …
Read More »जयंत पाटील यांचे मागणी, शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा, मदत देताना अट न ठेवता शेतकऱ्यांना दिलासा द्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जयंत पाटील यांची मागणी
संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, मदत देताना कोणत्याही प्रकारची अट न ठेवता शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील म्हणाले की, उभ्या पिकांचे, फळबागांचे तसेच काढणीस …
Read More »२१ मार्चला रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची प्रमुख उपस्थितीत
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता लोकभवन येथील दरबार हॉल मध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणाऱ्या या विद्यापीठाचा हा पहिलाच दीक्षांत समारंभ असून राज्यपाल जिष्णु देव वर्मा, …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती, ‘ट्रान्सजेंडर संरक्षण सुधारणा विधेयक २०२६’ला विरोध प्रस्तावित सुधारणांच्या तरतूदींवर वंचित बहुजन आघाडीच्या हरकती
‘ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा, २०१९’ मध्ये केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या सुधारणांना वंचित बहुजन आघाडीने (VBA) कडाडून विरोध दर्शवला आहे. हे सुधारणा विधेयक फेटाळत असल्याचे स्पष्ट करत, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यावर लवकरच सविस्तर विश्लेषण प्रसिद्ध करणार असल्याचे जाहीर केले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी …
Read More »महाडमध्ये काँग्रेसचा ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ सोहळ्याचा शुभारंभ कार्यक्रम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, तुषार गांधी, उल्का महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम
राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ या दिवशी महाड येथे चवदार तळ्यावर सत्याग्रह केला होता. या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने उद्या शुक्रवार दिनांक २० मार्च रोजी महाड जि. रायगड येथे ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ सोहळा शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला आहे. …
Read More »फिलिपाईन्समधील भारतीय समाजाचे सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान मनिला येथे मंत्री जयकुमार रावल यांचा मराठी बांधवांशी संवाद
मराठी समाज जगभर पसरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने मर्यादित असला तरी व्यापार, उद्योग, सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मनिला येथे केले. मंत्री जयकुमार रावल यांनी मनिला येथे आयोजित विशेष कार्यक्रमात …
Read More »
Marathi e-Batmya