तुरुंगाच्या कोठडीतून मंत्रिपदाचा कारभार पाहणाऱ्या नवाब मलिक यांच्यावर पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले गेले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. असे असताना त्यांना मंत्रिमंडळात ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत, अशी जोरदार टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली. भाजपा …
Read More »नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांच्या खात्यात त्वरीत ५० हजार रूपये जमा करा केवळ घोषणांचा पाऊस व शेतक-यांची फसवणूक
महाराष्ट्रात १.३७ कोटी शेतकरी आहेत. त्यातील १.०६ कोटी गरीब शेतकरी आहेत. ६ मार्च २०२० रोजी विधानसभेत सरकारने सांगीतले नियमित कर्ज भरणा-यांच्या खात्यात आम्ही ५० हजार रूपये जमा करू ही घोषणा पूर्ण झाली नाही आणि शेतक-यांची फसवणूक करण्यात आली. पुन्हा ८ मार्च २०२१ रोजी तीच घोषणा केली. पुन्हा एकदा सरकार खोटे …
Read More »भाजपाने ‘महागाई’ च्या रुपाने जनतेला करुन दाखवले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांची टीका
७० वर्षात जे झाले नाही ते आम्ही करुन दाखवू म्हणणार्या भाजपने महागाईच्या रुपाने जनतेला करुन दाखवले आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपाला लगावला. देशात होलसेल प्राईज (WPI) महागाईने ३० वर्षात उच्चांक गाठला आहे. अच्छे दिनाचे स्वप्न जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आज महागाईमुळे …
Read More »केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, एका बाजूला भोंगे आहे तर दुसऱ्या बाजूला सोंगे नागपूरात बोलताना राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका
एका बाजूला भोंगे आहे तर दुसऱ्या बाजूला सोंगे आहेत. भोंग्याच्या विषयावर वाद होता कामा नये. पिढ्यान पिढ्यांपासून मशिदींवर भोंगे असतात. ते उतरण्याची मागणी करण्यापेक्षा राज ठाकरेंना मंदिरावर भोंगे लावयचे असतील तर त्यांनी लावावेत. पण धर्माधर्माध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये असा इशारा केंद्रीय मंत्री रामदास आठवले य़ांनी मनसेप्रमुख राज …
Read More »सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेले नाही हे डोक्यात ठेवून कामाला लागा आज महागाई इतकी वाढलीय याबाबत लोकांना सांगा...केंद्र सरकारची पोलखोल करा - जयंत पाटील
प्रचाराचे तंत्र आता बदलले आहे. प्रत्यक्षात पटवून देत नाही तोपर्यंत लोकं मान्य करत नाही. त्यामुळे आपण लोकांशी बोला… आज महागाई इतकी वाढली आहे याबाबत लोकांना सांगा.. केंद्रसरकारची पोलखोल करा… या जगात सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेले नाही. हे डोक्यात ठेवून कामाला लागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मोठी करा असे आवाहन राष्ट्रवादी …
Read More »जयंत पाटील म्हणाले, भोंग्याचे गुजरात, उत्तर प्रदेशात काय झाले चौकशी करा म्हणा भोंग्यावरून लगावला टोला
मागील काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंग्यावरून आणि हिंदूत्वाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच त्याचा सातत्याने पुर्नरूच्चारही करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या टीकेवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टोला लगावला असून …
Read More »गोबेल्स नीतीला मारक अशी संघटना आपल्याला तयार करायचीय देशात, राज्यात जे धार्मिक राजकारण केले जातय त्यामुळे तरुणांमध्ये अस्थिरता-जयंत पाटील
देशात, राज्यात जे धार्मिक राजकारण केले जात आहे, त्यामुळे तरुणांमध्ये एक अस्थिरता आहे. त्यांना फुले – शाहू – आंबेडकर यांच्या मार्गावर चालण्याची दिशा आपल्याला द्यावी लागेल. यासाठी वैचारिक बैठका घ्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाई येथे केले. सध्या देशात गोबेल्स नीती अवलंबिली जात …
Read More »संजय राऊतांच्या वक्तव्यावर राज म्हणाले, मी लवंड्यावर… पुण्यातील पत्रकार परिषदेत दिले उत्तर
मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी मनसेला उपरोधिक टोला लगावत भाजपा आपले काम नव एमआयएम आणि नवं हिंदूत्वावादी ओवेसीच्या माध्यमातून करून घेत असून या निमित्ताने महाराष्ट्रात दंगली घडवून आणण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप केला. यासंदर्भात सध्या पुणे दौऱ्यावर असलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे …
Read More »आमदार गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ: आता गुन्हाही दाखल महिला आयोगापाठोपाठ पोलिस ठाण्यातही गुन्हा नोंद
भाजपाचे नवी मुंबईतील आमदार तथा येथील बडे प्रस्थ असलेल्या गणेश नाईक यांच्या विरोधात त्या महिलेस बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतेच या महिलेने महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. २०२१ मध्ये गणेश नाईक …
Read More »विरोधकांच्या “त्या” वक्तव्यावरील टीकेनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, जर मी… नाना लढले तर तुम्हाला फेस आला जर मी लढलो असतो तर
कोल्हापूरातील पोट निवडणूकीत काहीही करून काँग्रेसच्या ताब्यातील जागा हिसकावून घ्यायचीच असा चंग बांधून कोल्हापूरात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे ठाण मांडून बसले होते. तरीही भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे सध्या चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्याची चर्चा सुरु झाली असून त्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आता हिमालयात जा अशी उपरोधिक …
Read More »
Marathi e-Batmya