साधारणतः १० दिवसांपूर्वी राज्यसभेच्या निवडणूकीच्या मतदानावेळी भाजपाकडून महाविकास आघाडीच्या मतदाना दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदानावर भाजपाने आक्षेप घेतला. त्यावेळी शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत केंद्रीय निवडणूक आयोगाने रद्द केले. त्याचे उट्टे काढत आज काँग्रेसने भाजपाचे आजारी …
Read More »गोपीचंद पडळकर यांचा खोचक टोला, आज कुणीही पावसात भिजलं तरी… राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर साधला निशाणा
विधान परिषदेतील १० रिक्त जागांसाठी जाहिर करण्यात आलेल्या निवडणूकीसाठी आज मतदान होत असून यात कोणताही दगाफटका होवू नये यासाठी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेकडून पुरेशी काळजी घेण्यात येत आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाली. जवळपास भाजपा आणि महाविकास आघाडीच्या अनेक आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. तसेच भाजपा आणि महाविकास आघाडीच्या …
Read More »बिल थकविल्याप्रकरणी सदाभाऊ खोत म्हणाले, तो तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचेच कट कारस्थान
कटकारस्थान रचून आमचा आवाज दाबणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही. जागर शेतकऱ्याचा आक्रोश महाराष्ट्राचा यात्रेदरम्यान हे सरकार मला खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असं मी सांगितलं होतं. त्याचाच हा ढळढळीत पुरावा समोर आलेला आहे. म्हणूनच राष्ट्रवादीला मी इशारा देतो. तुमचा पक्ष हा सरदारांचा पक्ष आहे. चिरेबंदी वाड्यात राहणाऱ्यांचा …
Read More »सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आमचा उमेदवार चमत्कारासाठी नाही तर… पाचही उमेदवार आमचेच निवडूण येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास
भारतीय जनता पक्ष विजयासाठी निवडणूक लढवतो. ज्यांनी आमच्याशी विश्वासघात करून राज्यात सत्ता स्थापन केली तेच लोक आमदारांनी विश्वासघात केला, अशी वक्तव्ये करीत आहेत असा टोला भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेच्या संजय राऊत यांना लगावत शिवसेनेचे आमदार जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही, असे म्हणत असेल तर त्यात …
Read More »उस्मानाबादमधील भाजपाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश… उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षात केले स्वागत
उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उस्मानाबाद येथील भाजपा नेते दिग्विजय शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी राजेंद्र झांबरे, मिलिंद कांबळे, डी. टी. कांबळे, आनंद पाटील, गोपाळ घोडके व इतर पदाधिकारी- कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उस्मानाबाद …
Read More »आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमावेळी शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्ये आमने-सामने तणावपूर्ण परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळविण्यात यश
राज्यसभेच्या निवडणूकीच्या पाठोपाठ विधान परिषदेची निवडणूक जाहिर झालेली असताना आणि त्यातच राज्यातील १४ महापालिकांसह २५ जिल्हा परिषदेंच्या निवडणूकांची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे आता मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणूकाही कधीही जाहिर होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईतील विविध विकास कामांच्या उद्घाटनांचा सपाटा लावला. मात्र आज बोरिवलीतील एका उड्डणापुलाचे उद्घाटन मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य …
Read More »चंद्रकांत पाटील यांचा डिफेन्स; ‘अग्निपथ’च्या विरोधातील हिंसाचार राजकीय हेतुने तरुणांचे करिअरचे कायमचे नुकसान
लष्करात जाऊन देशाची सेवा करू इच्छिणारा तरूण कधीही देशाच्या संपत्तीचे नुकसान करू शकत नाही. अग्निपथ योजनेच्या विरोधात चाललेला हिंसाचार हा राजकीय हेतूने असून त्यातून गुन्हे दाखल झाल्यामुळे संबंधित तरुणांना कोणतीही नोकरी मिळणे अशक्य होईल व त्यांचे करिअरचे कायमस्वरुपी नुकसान होईल, अशी जाणीव भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी करून …
Read More »अग्निपथच्या अग्नीरोषावर संजय राऊत म्हणाले, ठेकेदारीवर गुलाम घेता येवू शकतं पण सैन्य… पंतप्रधान मोदींची प्रत्येक योजना…हा तर सैन्यदलाचा अपमान
मागील काही दिवसात केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह देशाच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत लष्कर भरतीसाठी कंत्राटी पध्दतीची अग्निपथ ही योजना जाहिर करण्यात आली. मात्र या योजनेच्या घोषणेनंतर अग्निपथच्या विरोधात उत्तर भारतातील अनेक राज्यात आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये तरूणांनी आपला रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली असून आपला रोष अग्निचा …
Read More »भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांच्या बचावासाठी काँग्रेसचे नौटंकी आंदोलन भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांना अपुरी मदत, शेतकऱ्यांची वीज तोडणी यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर आंदोलन करण्याऐवजी काँग्रेस कार्यकर्ते गांधी परिवाराच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या गांधी परिवारासाठी काँग्रेसच्या मुठभर कार्यकर्ते नौटंकी आंदोलन करत जनतेला वेठीस धरत आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये …
Read More »देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला भाजपाचा आगामी लोकसभा निवडणूकीचा प्लॅन… बैठकीनंतर दिली माहिती
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडी विशेषत: शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना पराभूत करत भाजपाच्या धनंजय महाडिक यांचा आर्श्चयकारक विजय घडवून आणल्यानंतर भाजपाने आता आगामी लोकसभा निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत मुंबईत एक बैठक पार पडली. या बैठकीत आगामी …
Read More »
Marathi e-Batmya