विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली तिन्ही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते ‘भाजप’पाल झाले आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या, असे असा उपरोधिक सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केला. विधिमंडळ आवारात प्रसारमाध्यमांशी …
Read More »शेतकऱ्यांच्या वीज तोडणी प्रश्नी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केले हे निवेदन वीज तोडणीपासून शेतकऱ्यांना तीन महिन्यांची मुदत
सभागृह सुरू झाल्यापासून सातत्याने संसदीय आयुधे वापरून सदस्यांनी तसेच सभागृहाच्या बाहेरही कृषी पंप वीज तोडणीचा विषय उपस्थित केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी सुद्धा अनेकदा या विषयावर प्रश्न उपस्थित करून सभागृहाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला, कुणाल पाटील,प्रकाश सोळंके,आमदार कल्याणकर यांनी तसेच विरोधी पक्षांनी हे मुद्दे उपस्थित केले. महावितरण कंपनी …
Read More »फडणवीसांच्या पहिल्या पेन ड्राईव्हची चौकशी सीआयडीकडे, पण महाजन सुटले तर आनंदच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे उत्तर
राज्यातील विरोधकांना संपविण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यासोबत हात मिळवणी करून कट कारस्थान रचली जात असल्याचा आरोप पहिल्या पेन ड्राईव्हद्वारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस केला. त्याची चौकशी सीआयडीकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रविण चव्हाण याने आपल्या वकील पदाचा राजीनामा दिल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील …
Read More »आणि अर्थसंकल्पावरून फडणवीसांनी केले अजित पवारांचे कौतुक विधानसभेत अर्थसंकल्पिय चर्चेवेळी केले कौतुक
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्पातील तरतूदींवरून आणि त्यातील युनिक कल्पनांवरून विरोधकाकडून अर्थमंत्र्यांचे कौतुक केल्याची घटना घडली आहे. वास्तविक पाहता राजकिय वर्तुळात त्यातही विशेषतः सत्ताधारी आणि विरोधकांकडून एखाद्या तरतूदीवरून किंवा बाबीवरून विधिमंडळाच्या सभागृहात कौतुक करण्याची घटना तुरळकच असते. परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे कौतुक केले. अजित …
Read More »मंत्री भुजबळ म्हणाले, जोपर्यंत शरद पवार यांची शक्ती सरकारच्या मागे तोपर्यंत… राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या पुण्यतिथी निमित्त राज्य सरकार संपुर्ण राज्यात विविध कार्यक्रम राबवणार
राज्यातले महाविकास आघाडी सरकार हे पुरोगामी सरकार आहे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने पुढे जाणारे सरकार आहे. जो पर्यंत या सरकारच्या पाठीमागे शरद पवार नावाची शक्ती उभी आहे, तोपर्यंत राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला काहीही होणार नाही असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, पण फडणवीस पोहोचलेले… अधिवेशनाला आणखी नऊ दिवस शिल्लक
देशातील लोकशाही संपलेली नाही. महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेने दोन दिवस सुरु असलेला तमाशा पाहिलेला आहे. ज्या माणसाने अधिकाऱ्यांच्या बदल्यांमधील घोटाळ्याची माहिती गोळा केली आणि केंद्रीय गृहसचिवांना दिली त्यांनाच तुम्हाला माहिती कुठून मिळाली असे विचारले जात आहे. तुम्हाला याची माहिती मिळालेली नाही ते आधी बघा. विरोधी पक्षांना याचे स्वातंत्र्य आणि अधिकार …
Read More »जबाबानंतर फडणवीस म्हणाले, पोलिसांच्या प्रश्नाचा रोख मला सह आरोपी… पाठविलेली प्रश्नावली आणि आज विचारण्यात आलेले प्रश्न यात गुणात्मक फरक
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग आणि अहवाल-तांत्रिक माहिती चोरल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी तपासाचा भाग आणि साक्षीदार म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब पोलिसांनी दोन तास जबाब घेतल्यानंतर फडणवीस यांच्या सागर या बंगल्याबाहेरील आवारात झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, त्या प्रकरणात पोलिसांनी पाठविलेली प्रश्नावली आणि आज मला पोलिसांनी विचारलेले प्रश्न …
Read More »फडणवीस आधी म्हणाले “जाणार”, आता म्हणाले “पोलिस स्टेशनला जाणार नाही” जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर काय फिरली सुत्रे
फोन टॅपिंग प्रकरणी आणि रश्मी शुक्लांविरोधात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी १ च्या सुमारास उद्या सकाळी ११ वाजता बीकेसीतील सायबर पोलिस ठाण्यात जाणार म्हणून घोषणा केली. परंतु त्यांच्या या वक्तव्याला काही ४-५ तासांचा अवधी लोटत नाही तोच आता फडणवीस यांनी जाहीर केले की उद्या पोलिस …
Read More »रश्मी शुक्लाप्रकरणी पोलिसांचे समन्स फडणवीस म्हणाले, “जबाबासाठी बोलाविले, मी जाणार” या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असताना हे काय कोणता तपास करणार
राज्यातील पोलिस बदल्यांसंदर्भातील महाघोटाळा मी काही महिन्यापूर्वी भाजपा कार्यालयात उघडकीस आणला. त्यासंदर्भातील अहवाल माझ्याकडे होता. परंतु राज्य सरकारने त्यावर सहा महिन्यात कोणतेही कारवाई केली नाही. त्यामुळे तो मी उघडकीस आणला. आता ही माहिती माझ्याकडे कशी आली याकरीता पोलिसांनी मला चौकशी करता बोलाविले असल्याने मी बीकेसी येथील सायबर पोलिसांकडे चौकशीसाठी जाणार …
Read More »उधारीचा वायदा करणारा आणि जबाबदारी टाळणारा राज्याचा अर्थसंकल्प भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिय
राज्याच्या अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी मांडलेला अर्थसंकल्प हा उधारीचा वायदा करणारा आणि महत्त्वाच्या विषयांत जबाबदारी टाळून दिशाभूल करणारा आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा यापूर्वीच्या अर्थसंकल्पात केली होती. पण त्याची अंमलबजावणी केलीच नाही याची कबुली अर्थमंत्र्यांनी …
Read More »
Marathi e-Batmya