येवला येथील पैठणी उद्योगाला चालना देण्यासाठी या ठिकाणी तुतीच्या शेतीला प्रोत्साहन देवून रेशीम उत्पादनासाठी रेशीम पार्क उभारण्याची गरज आहे. यासाठी आपले प्रयत्न असून ग्रा.पं.एरंडगाव खुर्द येथे गट नंबर २५ एकर जागा रेशीम पार्क करिता देण्यात आली आहे. त्यादृष्टीने सबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल लवकरात लवकर शासनास सादर करावा अशा सूचना …
Read More »विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी विद्यापीठांनी परिक्षांचे निकाल वेळेत जाहीर करा
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, नोकरीच्या संधीमध्ये अडचणी येऊ नयेत. यासाठी त्यांच्या भविष्याचा विचार करून सर्व विद्यापीठांनी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत, असे निर्देश राज्यपाल रमेश बैस यांनी दिले. राजभवन येथे राज्यपाल बैस यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, जर्मनीला कुशल मनुष्यबळ देण्यासाठी महाराष्ट्राचा पुढाकार
जर्मनीला किमान ४ लाख कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे.महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जर्मन येथे रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हावी. आणि जर्मनीला कुशल मनुष्यबळ मिळावे, यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईल. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आज मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,जर्मनी शिष्टमंडळातील फ्रॅंक झुलर, अंद्रेस रिस्किट, ओमकार कलवाडे यांच्या …
Read More »सुशिलकुमार शिंदेंच्या त्या वक्तव्यावरून नाना पटोले यांचे भाजपावर टीकास्त्र
सोलापूर शहरातील एका शासकिय कार्यक्रमानिमित्त उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांची भेट घेत भाजपा प्रवेशाचे आमंत्रण दिल्याची चर्चा आज दुपारपासून सुरु झाली. या सगळ्या घडामोडींवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीकास्त्र सोडत भारतीय जनता …
Read More »नऊ विभागांच्या वार्षिक कार्यक्रम आढावा बैठकीत अजित पवार यांनी दिले हे निर्देश
राज्यातील प्रशासकीय विभागांनी वार्षिक कार्यक्रमांची आखणी करताना २५ वर्षानंतरच्या विकसित महाराष्ट्राचे चित्र डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम, योजना, उपक्रम प्रस्तावित करावेत. योजनांसाठी निधीची मागणी करताना कालबाह्य योजना रद्द कराव्यात. पुढील चार वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समितीने सूचविलेल्या प्राधान्यक्रमानुसार नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित …
Read More »मुंबई विद्यापीठात National Education Policy ची राष्ट्रीय कार्यशाळा
राज्यात National Education Policy अर्थात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. याबाबत अधिक स्पष्टता यावी, यासाठी महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण विभागामार्फत राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा नवी दिल्लीत तसेच मुंबई विद्यापीठात घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री, नीती आयोग, यूजीसी, नॅक यांच्याशी समन्वय करून पाठपुरावा करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत …
Read More »मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यास सरकारची मान्यता
मुंबई विद्यापीठात रिक्त पदांवर मनुष्यबळ भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांची १३८ रिक्त पदे भरण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रा. वर्षा …
Read More »बागेश्वर बाबासमोर नतमस्तक होत देवेंद्र फडणवीस म्हणाले, सनातन म्हणजे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे या देशातील भ्रष्टाचारी, दुराचारी, अनाचारी नेते भयभीत आहेत असे सांगतानाच ,काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देशातील जनता आणि काँग्रेस पक्ष सुद्धा गांभीर्याने घेत नाही असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. काँग्रेस जर गांभीयाने घेत नसेल तर त्यांना मी का गांभीर्याने घेऊ, असा प्रतिप्रश्नही देवेंद्र फडणवीस …
Read More »राज्यातील या तीन शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठे स्थापन करण्याची परवानगी
आता राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे विद्यापीठांवरील भारही कमी होऊन शैक्षणिक संस्थांचे एक शक्तीशाली जाळे तयार होऊन विद्यार्थ्यांना अधिक संधी प्राप्त होतील. राज्यपाल हे कुलपती या नात्याने या समूह विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती करतील. …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्टोक्ती, मराठा आरक्षण प्रश्नी “टीकणारे आरक्षण देणार” ते “प्रयत्न करणार” आधी एकल शिंदे आयोगाचा निर्णय आता तीन न्यायमुर्तींची समिती निर्णय देणार
राज्यात मराठा आरक्षण प्रश्नी गावागावात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी राजकिय नेत्यांना गावबंदी केली. त्यातच मराठा आरक्षणाचे कार्यकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांची आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असून त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आत ६ वा दिवस असून त्यांचा आवाज अत्यंत क्षीण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने …
Read More »
Marathi e-Batmya