Tag Archives: chandrakant patil

भाजपच्या कोट्यातील महामंडळावरील सदस्यांची यादी जाहीर ८ महामंडळावरील सदस्यांच्या नावाची यादी प्रसिध्द

मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या महामंडळावरील सदस्यांची नियुक्ती लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांना खुष करण्यासाठी ९ महामंडळावरील सदस्यांची यादी भाजपकडून जाहीर करण्यात आली. राज्य सरकारच्या विविध महामंडळांवरील शिवसेनेच्या कोट्यातील सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर भाजपच्या कोट्यातील सदस्यांची यादी आज जाहीर करण्यात आली. राज्य अपंग वित्त व विकास महामंडळावर …

Read More »

३ हजार क्षमतेच्या चारा छावण्यांना मान्यता देणार महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता ज्या जिल्ह्यांमध्ये जनावरांसाठी छावण्यांचे प्रस्ताव आले आहेत, तेथील प्रस्ताव तातडीने मंजूर करून छावण्या सुरू कराव्यात. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वितरित केलेल्या निधीतील सुमारे २७०० कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आतापर्यंत राज्यात २८ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. ज्या जिल्ह्यात चारा छावण्यांची …

Read More »

होमगार्डना ५७० तर पोलीस पाटीलांना साडेसहा हजार रुपये मानधन पेन्शन आणि आरोग्य योजनेचाही लाभ देण्याचा सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पोलीस पाटील आणि होमगार्डच्या कर्तव्य भत्त्यात भरीव वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने शुक्रवारी घेतला. पोलीस पाटलांना साडेसहा हजार रुपये मानधन, तर होमगार्डना ५७० रुपये कर्तव्यभत्ता देण्यास समितीने मान्यता दिली. तसेच या दोन्ही पदावरील कर्मचाऱ्यांना आरोग्य व अटल पेन्शन योजनेचा लाभ …

Read More »

हवे तर बिनधास्तपणे शिवसेनेबरोबरची युती तोडा

शिवसेना नेते रामदास कदम यांचा इशारा मुंबईः प्रतिनिधी आगामी निवडणूकीसाठी भाजप-शिवसेने दरम्यान युती होताना शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावानुसार युती झाली आहे. या प्रस्तावानुसार अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पद दोघांना भुषविता येणार आहे. तरीही भाजपमधील नेत्यांना या गोष्टीची मान्यता नसेल तर त्यांनी युती बिनधास्त तोडावी अशा इशारा शिवसेनेचे नेते तथा पर्यावरण मंत्री रामदास …

Read More »

शरद पवारांनी या वयात लोकसभा लढवू नये अन्यथा भाजप पराभव करणार

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा  मुंबई: प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीचे पडघड वाजण्यास सुरुवात झाली असून गतवेळी निवडणूक रिंगणातून संन्यास घेतलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा निवडणूक लढविण्यासाठी गळ घालण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवार साहेबांनी या वयात लोकसभा लढाऊ नये, अन्यथा तो मतदारसंघ भाजपच्या वाटेल आल्यास भाजप त्यांचा …

Read More »

पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेचा महाराष्ट्रातील ८० टक्के शेतकऱ्यांना लाभ

शेतकऱ्यांच्या खात्यात ७२०० कोटी रुपये जमा होणार मुंबई : प्रतिनिधी केंद्र शासनाने जाहिर केलेल्या पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अत्यल्प आणि अल्प भूधारक असलेल्या ८० टक्के शेतकऱ्यांना मिळणार आहे. योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षभरात ७ हजार २०० कोटी रुपये जमा होणार असून योजनेसाठी शेतकऱ्यांची सविस्तर माहिती संकलित करण्यासाठी …

Read More »

नाविन्यपुर्ण शोध आणि तरुणाईचा उत्साह

आपत्ती निवारणासाठी तंत्रज्ञानाचा कल्पक वापर कल्पना करा जर एखाद्या इमारतीला आग लागण्यापुर्वी त्या इमारतीने आपल्याला आग लागण्याची शक्यता आहे असे ट्विट केले तर? खुप उंच डोंगरावर अडकेलेल्या अपघातग्रस्त विमानाला आपण जमीनीवरुनच बघू शकलो तर? भुकंप किंवा एखाद्या दुर्घटनेत बहुमजली इमारतीच्या खाली अडकलेला एखादा जीव वाचविण्यासठी यंत्र मिळाले तर? या सर्व …

Read More »

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपत्ती निवारणाचे नवे मार्ग शोधा

आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण परिषदेत मुख्यमंत्र्यांचे आवाहन मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार सारखी योजना यशस्वी ठरली. शेतीचा शाश्वत विकास होण्याबरोबरच कमी पाऊस होवून देखील शेतीच्या उत्पादकतेत घट होण्याऐवजी भरघोस वाढच झाली. ही किमया जलयुक्त शिवार योजनेमुळे साधता आल्याचे सांगत कृत्रिम बुद्धीमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि समाजातील …

Read More »

रामदेव बाबांच्या पतंजलीची कोट्यावधी रूपयांची स्टँम्प ड्युटी माफ करण्याच्या हालचाली

महसूल विभागाकडून लवकरच अंतिम निर्णय होणार मुंबई : प्रतिनिधी नागपूर येथील मिहान प्रकल्पात सवलतीच्या दरात रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीला स्वस्त दरात जमिन दिल्यानंतर जमिनीच्या येणेसाठी भरावी लागणारी साडेतीन कोटी रूपयांची स्टँम्प ड्युटी माफ करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरु असल्याची धक्कादायक माहिती सामान्य प्रशासन विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून …

Read More »

राज्यात दुष्काळामुळे चारा छावण्या सुरु होणार

३०० ते ५०० जनावरे एका छावण्यात ठेवण्याची अट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांना चारा, पिण्याची पाणी पुरेसे मिळेनासे झाल्याने त्यांच्या जीवीताचा प्रश्न निर्माण झाला. त्यातच चारा छावण्यांवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सासत्याने राज्य सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. त्यामुळे अखेर राज्य सरकारकडून दुष्काळी भागात चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय …

Read More »