मुंबईः प्रतिनिधी देशाच्या संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. कालच पंतप्रधान मोदी यांनी चेन्नईमध्ये स्वदेशी बनावटीचा हायटेक अर्जुन रणगाडा लष्कराला सुपूर्द केल्यामुळे देशाची संरक्षण व्यवस्था अधिक बळकट व सक्षम झाली आहे. यामुळे सातत्याने देशाच्या संरक्षण मंत्रालयाबद्दल अपप्रचार करणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व काँग्रेसचा …
Read More »‘आयत्या बिळावर नागोबा’ चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांची मापं काढणे बंद करावे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा इशारा
सांगलीः प्रतिनिधी ज्या महिलेने मतदारसंघ लोकप्रिय केला त्यावर ‘आयत्या बिळावर नागोबा’ सारखे जाऊन बसलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारसाहेबांची मापं काढणे बंद करावे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला. सांगली येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी शरद पवारच्यांवर चुकीचं विधान करणार्या चंद्रकांत पाटील …
Read More »राज्यपाल कोश्यारी यांच्या विमान वापरावरून भाजपा नेते काय म्हणाले? वाचा तर मग
मुंबई : प्रतिनिधी अत्यंत दुर्दैवी घटना- देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात आजपर्यंत अशी घटना यापूर्वी कधी घडलेली नाही. राज्यपाल हे व्यक्ती नाही एक पद आहे. व्यक्ती येतात आणि जातात. परंतु, विमानात बसेपर्यंत जाणीवपूर्वक परवानगी देण्यात आली नाही. मुख्यमंत्र्यांनी एवढा एवढा अहंकार बाळगणे योग्य नाही. आजपर्यंत मी एवढे इगोस्टीक सरकार कधी पहिले नाही,अशी …
Read More »प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची आता थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडे धाव विखारी वक्तव्य करणा-या शरजिल उस्मानीला तातडीने अटक करण्याची मागणी
मुंबई: प्रतिनिधी हिंदू समाज सडलेला आहे.. असे विखारी वक्तव्य करणारा उत्तर प्रदेशचा नागरिक शरजिल उस्मानी याला तातडीने अटक करण्याची मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री योगी यांना पाठविलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, पुणे येथे झालेल्या …
Read More »समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या महासाथीमुळे संकटात सापडलेल्या समाजाच्या सर्वच घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडला असून त्याबद्दल मा. मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आपण अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केली. कोरोनाच्या महासाथीमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आणि देशाच्या …
Read More »न्यायालयाचा चंद्रकांत पाटील यांना दिलासा मात्र आव्हान कायम निवडणूक शपथपत्राबाबतची याचिका न्यायालयाने निकाली काढली
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत खोटे शपथपत्र सादर केल्याप्रकरणी पुणे न्यायालयात दाखल करण्यात आलेली चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातील याचिका निकाली काढल्याने पाटील यांना दिलासा मिळाला. मात्र न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात सत्र न्यायालयात लवकरच आव्हान देणार असल्याची माहिती याचिकाकर्त्ये डॉ. अभिषेक हरिदास यांनी दिली. चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणूकी दरम्यान आणि विधान …
Read More »सहा हजार ग्रामपंचायतींत भाजपाला बहुमत मिळेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असून सध्याच्या कलानुसार ६ हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींत भाजपा बहुमत मिळवेल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपाचे निवडणूक आघाडीचे संयोजक सुनील कर्जतकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख …
Read More »भाजपाच्या या नेत्यांना स्वतःच्या गावातील ग्रामपंचायती राखता आल्या नाहीत शिवसेनेने केली घुसखोरी
मुंबईः प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल आज झाले. मात्र या निवडणूकीत राज्याच्या स्थानिक पातळीवरील जनतेचा कल दाखविणारी असून भाजपाच्या दोन आजी-माजी प्रदेशाध्यक्ष असलेल्या दोन नेत्यांना त्यांच्याच मुळ गावातच ग्रामपंचायतीतील पक्षाची सत्ता राखता आली नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे गाव असलेल्या खानापूर ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचा पराभव झालाय. हा पराभव …
Read More »नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे अन्यथा आंदोलन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पुनरुच्चार
मुंबई : प्रतिनिधी बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे खुलासा करताना आरोप करणाऱ्या रेणू शर्माची बहीण करुणा शर्माशी आपले विवाहबाह्य संबंध असून त्यातून दोन मुले जन्माला आल्याची व त्यांना आपण आपले नाव दिल्याची जाहीर कबुली दिली आहे. हे ध्यानात घेता, धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, …
Read More »“माझीही सुरक्षा काढून घ्या”, आमचे नेते पवारसाहेबांचा मला फोन गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भाजपा (bjp) नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली म्हणून एकाबाजूला राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली असताना दुसऱ्याबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांनी मला वैयक्तिक फोन करून माझी सुरक्षा काढून घ्या असे सांगितले. तसेच यासंदर्भात मला पत्रही लिहिल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी …
Read More »
Marathi e-Batmya