मराठी ई-बातम्या टीम सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला असला तरी या निर्णयामुळे गंभीर पेच निर्माण होणार असून आयोगाने ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सर्वच जागांवरील निवडणूक रद्द केली पाहिजे, अशी मागणी भारतीय …
Read More »ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा
मराठी ई-बातम्या टीम महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून केवळ अध्यादेश काढून ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे तो अध्यादेश न्यायालयात टिकला नाही आणि सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली. भारतीय जनता पार्टी ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुण्यात …
Read More »त्या चर्चेवर चंद्रकांत पाटील म्हणाले, पाटील काय चीज आहे माहित नाही ४२ वर्षे झाली राजकारणात थोडी नाहीत
पुणे: प्रतिनिधी मागील काही महिन्यांपासून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्ली दौऱ्यावर गेले की त्यांची गच्छंती अटळ असल्याच्या चर्चेला सुरुवात होते. या पार्श्वभूमीवर आज दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषेदेला सामोरे जाणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, त्या सूत्रांच हिंमत असेल तर नाव सांगा, त्यांना …
Read More »आम्ही मोदींचे शिष्य, फेसबुक-ट्विटर कसे वापराचे हे त्यांच्याकडूनच शिकलो पवारसाहेबांचा फोटो मॉर्प करणार्या भाजपचा फर्जीवाडा समोर आणलाय - नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी चीन संदर्भातील महत्त्वाच्या बैठकीला शरद पवारसाहेब आणि प्रफुल पटेल दिल्लीत गेले असताना पवारसाहेबांचा एक फोटो मॉर्प करुन भाजपच्या आयटी सेलने प्रसिद्ध करुन जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही त्यांचा हा फर्जीवाडा समोर आणल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. …
Read More »त्या हिंसक घटनांची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्तीकडून चौकशी करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी
कोल्हापूरः प्रतिनिधी त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना, जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल करून; महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती व नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या. पंधरा हजार ते चाळीस हजार लोकांचे जमाव रस्त्यावर उतरून दुकाने, कार्यालये, गाड्या यांचा विध्वंस केला गेला. या घटनेचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोल्हापुरात …
Read More »२ वर्षानंतर भाजपाने विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केली ही चांगली गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा भाजपाला उपरोधिक टोला
मुंबईः प्रतिनिधी भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे असा खरमरीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. भाजपा आता महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर केले. भाजपाने आपले मनोगत व्यक्त केले ही चांगली गोष्ट आहे. …
Read More »लाल गहू मागणारा भारत आज मोदींमुळे साठ सत्तर देशांना कोरोना लस निर्यात करतोय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची काँग्रेसवर उपरोधिक टीका
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले आहे. सामुहिक बलात्कारासारख्या घटनांचेही या सत्ताधारी आघाडीला काही वाटत नाही, इतके हे सरकार संवेदनाशून्य झाले आहे. भारतीय जनता पार्टी प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करत असून आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र संघर्ष करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. भाजपा …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, “अब हिंदू मार नहीं खाएगा” अमरावती हिंसाचारानंतर भाजपाची प्रतिक्रिया
पुणे: प्रतिनिधी त्रिपुरामध्ये घटना घडली की नाही हा प्रश्न आहे. पण त्यासाठी अमरावती, नांदेड, मालेगाव मध्ये अशांतता पसरवणे हे कितपत योग्य आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये जे घडलं ती, हिंदुंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. अब हिंदू मार नहीं खाएगा, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. १९९३ च्या दंगलीत …
Read More »… तर श्रीमंत महाराष्ट्रालाही सवलत देणे परवडले पाहिजेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी
पुणे: प्रतिनिधी मोदी सरकारने पेट्रोलच्या दरात पाच रुपये आणि डिझेलच्या दरात दहा रुपये सवलत दिल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारनेही व्हॅटमध्ये कपात करून राज्यात अधिकची सवलत दिलीच पाहिजे. आसाम आणि गोवा या छोट्या राज्यांना सवलत देणे परवडते तर महाराष्ट्र या सर्वात श्रीमंत राज्यालाही सवलत परवडली पाहिजे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यात मुख्यमंत्री बदल झाला का?” शरद पवारांच्या आवाहनावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा टोला
कोल्हापूर: प्रतिनिधी राज्यात आपल्या विविध मागण्यांप्रश्नी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून या संपावरून आता चांगलेच राजकारण तापणार असल्याचे चित्र निर्माण झालेले असताना एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा राज्य सरकार योग्य निर्णय घेईल असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री बदल झालाय का? असा खोचक सवाल …
Read More »
Marathi e-Batmya