अहमदनगर : प्रतिनिधी सध्याच्या परिस्थितीत साखर कारखानदारी ही तोट्यातील असून आपल्याकडे साखरचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच साखरेचे उत्पादन होऊनही शेतकऱ्यांना योग्य पैसे मिळत नाहीत. त्यामुळे नव्या साखर कारखानदारींना बंदी घालायला पाहिजे अशी सूचना केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत केली. अहमदनगर महामार्ग प्रकल्पाचे उद्घाटनानिमित्त …
Read More »महाराष्ट्रातील राजकिय नेत्यांसाठी दिल्ली असुरक्षित बनतेय ? बैठकीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे थेट मुंबईकडे रवाना
नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी स्वातंत्र्यपूर्व काळापासून दिल्ली राजकिय घडामोडींचे प्रमुख केंद्र राहिलेलं आहे. मात्र या दिल्लीत राजकिय अस्थिरता नेहमीच अनेक राजकिय पक्षांनी अनुभवली असली तरी मागील काही वर्षांपासून देशातील राजकिय नेत्यांनाच आता दिल्ली असुरक्षित वाटू लागल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून राजकिय वर्तुळात सातत्याने सुरु आहे. विशेषत: महाराष्ट्रातील भाजपेतर पक्षाच्या नेत्यांकडून दिल्लीत …
Read More »नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडणार आरोग्याच्या नियमांचे मात्र काटेकोर पालन व्हावे-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल …
Read More »“ठाकरे सरकारला झुकावं लागेल”, असे म्हणत सोमय्या कोल्हापूरकडे पोलिसांच्या विरोधानंतरही सीएसटीएमहून महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रवास सुरू
मुंबई : प्रतिनिधी कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना जिल्हाबंदी केली. त्या आधारे मुंबई पोलिसांनी सोमय्या यांना स्थानबद्ध करत रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी कायदेशीर मार्गाने मला मुंबईत रोखता येत नाही रोखायचे असेल तर ते कोल्हापूरच्या वेशीवर असे सांगत ठाकरे सरकारला झुकावं लागेल …
Read More »शरद पवारांनी व्यक्त केली चिंता, आज वाद नाहीतर कोथळा…. स्व. मृणालताई गोरे यांच्या जागविल्या आठवणी
मुंबई: प्रतिनिधी केशवराव गोरे स्मारक सभागृहात यापूर्वी अनेक वाद व्हायचे पण ते वाद राज्याच्या हिताचे असायचे. एक सुसंवाद असायचा पण आज तो सुसंवाद पाह्यला मिळत नाही. आता कोथळा बाहेर काढण्याची भाषा वापरली जात असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. गोरेगांव येथील केशवराव गोरे स्मारक ट्रस्टच्यावतीने मृणालताई …
Read More »पवारांना पटोलेंचे प्रत्युत्तर, “राखायला दिलेल्यांनीच जमीन चोरली” शरद पवारांच्या टीकेनंतर काँग्रेसकडून उपरोधिक टोला
मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज गणेश चतुर्थीचा दिवस असल्याने राजकिय क्षेत्रात सगळी शांतता असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसची अवस्था एखाद्या जमिनदाराच्या हवेली सारखी झाल्याची टीका करत खळबळ उडवून दिली. त्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यास प्रत्युत्तर देत जमीन राखायला दिलेल्यांनीच जमिनीची चोरी केल्याचा पलटवार करत पवारांवर …
Read More »शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या या भेटीसंदर्भात अजित पवार म्हणाले… म्हणून पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असेल
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील अनेक लोकं पवारसाहेबांना भेटत असतात. त्यांच्या काही समस्या मांडत असतात. ‘त्या’ समस्या राज्याच्या प्रमुखाच्या कानावर घालून काही निर्णय घ्यायचा असेल म्हणून पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असेल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीबाबत व्यक्त केली. पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना …
Read More »शरद पवारांनी बोलाविलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत या मुद्यांवर झाली चर्चा विद्यमान आमदारांमध्ये कामे होत नसल्यावरून नाराजी
मुंबईः प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून काही काळासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या असल्या तरी त्या निवडणूका फार काळ लांबविता येणार नाही. त्यामुळे उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जर तातडीने निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करावा लागला तर ओबीसीच्या जागेवर ओबीसीचाच उमेदवार देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती या बैठकीस उपस्थित …
Read More »सहकारातील स्वाहाकार संपण्याच्या भीतीपोटीच पवारांचा या गोष्टीला विरोध माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी बँकांमधील ठेवी सुरक्षित राहाव्यात यासाठीच रिझर्व्ह बँकेने सहकारी बँका व नागरी बँकांवर नियंत्रणे आणल्याची ग्वाही अर्थमंत्र्यांनी लोकसभेत दिली असतानाही, सहकारातील स्वाहाकार संपण्याच्या भीतीने नियंत्रणास विरोध करण्याचा शरद पवार यांचा कांगावा आता फोल ठरणार आहे, अशा शब्दांत राज्याचे माजी कृषीमंत्री व भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी पवार यांच्या …
Read More »पवारांनी कानपिचक्या देत केंद्राच्या कृषी धोरणाबाबत म्हणाले… आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय
मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तसेच या दरम्यान एकमेंकाना “पाठीत खंजीर खुपसला”, “कोथळा बाहेर काढणारे” अशा शब्दांचा वापर सुरु झाल्या आहेत. त्यातच काल जुन्नर मध्ये संजय राऊत यांनी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यावर टोकाची टीका …
Read More »
Marathi e-Batmya