मुंबई : प्रतिनिधी मौजे भोसे (जि. सांगली) येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये येणारा चारशे वर्ष पुरातन वटवृक्ष वाचविण्याचा निर्णय झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ च्या प्रकल्प संचालकांनी वटवृक्ष वाचविण्याबाबतचे पत्र सर्व संबंधितांस दिले आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री, आदित्य ठाकरे यांनी हा वटवृक्ष वाचाविण्यासंदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री , नितीन गडकरी यांना …
Read More »वाढदिवसाला फलक, हारतुरे नको तर निधीला देणगी द्या, रक्तदान-प्लाझ्मा दान शिबिरे घ्या वाढदिवस साजरा करणार नसल्याची मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी ‘आपण वाढदिवस साजरा करणार नसून सध्याच्या कोरोना परिस्थितीत कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये. तसेच हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ देणगी द्यावी. नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत‘, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेस केले आहे. आपल्याला दिलेल्या शुभेच्छा या सर्व कोविड …
Read More »२०० खाजगी व अफोर्डेबल अशा इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मोफत परवाना देणार लीड स्कूलची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये खाजगी व अफोर्डेबल इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी तंत्रज्ञान आणणे आणि शिक्षकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कठीण काळात देखील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत राहावे यासाठी या शाळांच्या प्रयत्नांमध्ये लीड स्कूलने (LEAD School) मदतीचा हात पुढे केला आहे. भारतातील सर्वात …
Read More »संपूर्ण वीजबिल माफ झालेच पाहिजे भीम आर्मीची ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्याकडे निवेदनामार्फत मागणी
मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन अद्यापही आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. तर काहीजणांना कमी वेतनात काम करावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर वीजेचा वापर वाढणे सहाजिकच आहे. मात्र वीज वितरण विभागाकडून वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले पाठविण्यात आल्याने ही सर्वसामान्य नागरिकांना वीज बिल भरणे अवघड बनले असल्याने वीज बिलेच माफ …
Read More »बालवाडी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण वेळापत्रक जाहीर केल्याची शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रसारावर अद्याप नियंत्रण मिळविण्यात म्हणावे तसे यश आलेले नसल्याने अखेर राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने पूर्व प्राथमिक ते १२ पर्यतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार पूर्व प्राथमिक आणि १ ते २ रीच्या विद्यार्थ्यांसाठी दररोज सकाळी ३० मिनिटाचे ऑनलाईन शिक्षण देण्याचे निश्चित करण्यात …
Read More »शासकिय बदल्यांसाठी आता आणखी १० दिवसांची मुदतवाढ १० ऑगस्टपर्यत वाढविली मुदत
मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे राज्यात रखडलेल्या शासकिय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी ३१ ऑगस्टपर्यतची मुदत देण्यात आली होती. मात्र आता या बदल्यांची प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी आणखी १० दिवसांची मुदतवाढ राज्य सरकारने दिली असून या कालावधीत एकूण आस्थापनेच्या फक्त १५ टक्के कर्मचाऱ्यांच्याच बदल्या करता येणार आहेत. काही दिवसांपूर्वी या रखडलेल्या बदल्यांची पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांची …
Read More »आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भविष्यवाणी खरी ठरतेय राज्यात महिनाभरात दोन लाख बाधित वाढले
मुंबई: प्रतिनिधी साधारणत: १ महिन्यापूर्वी राज्यातील कोरोनाबाधितींची संख्या पुढील जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वाढताना दिसणार असल्याचे भाकित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. त्यास आज बरोबर एक महिना पूर्ण होत असून या कालावधीत कोरोनाग्रस्तांची संख्या चांगलीच वाढताना दिसत असल्याने अजित पवारांचे भाकित खरे होताना दिसत आहे. २३ जून २०२० रोजी राष्ट्रवादी …
Read More »आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी तज्ञांनो उपचाराच्या मार्गदर्शक सूचना टास्क फोर्सकडे द्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी कोरोना रुग्णांवर उपचारासाठी होमिओपॅथी,आयुर्वेद, युनानी या क्षेत्रातील तज्ञांनी मार्गदर्शक सूचना तयार करुन टास्क फोर्सकडे द्याव्यात जेणेकरून एकात्मिक औषधोपचार देऊन रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातील विविध पॅथींचे तज्ज्ञ व वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत …
Read More »मुंबई उपनगरातील बेरोजगारांनों या संकेतस्थळावर नावे नोंदवा कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छूक उमेदवारांना नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि मुंबई उपनगर जिल्ह्यातील आतापर्यंत नोंदणी केलेल्या बहुसंख्य उमेदवारांनी आपल्या आधार क्रमांकाची नोंद केलेली नाही. तरी अशा उमेदवारांना आपल्या नोंदणी क्रमांकास आधार क्रमांकही जोडावा लागणार आहे, अन्यथा 15 ऑगस्ट नंतर …
Read More »कोरोना: राज्यातील रूग्ण संख्या पहिल्यांदाच १० हजारापार ५५५२ जण घरी तर २८० जणांचा मृत्यू
मुंबई: प्रतिनिधी राज्यात सर्वाधिक १० हजार ५७६ बाधित रूग्ण आढळून आले असून आतापर्यंतची २४ तासातील ही सर्वाधिक संख्या आहे. तर आज ५५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ८७ हजार ७६९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाबाधितांच्या सर्वाधिक संख्येमुळे बाधितांची संख्या १ लाख ३६ हजार ६०७ रुग्णांवर …
Read More »
Marathi e-Batmya