मुंबई ; प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागातील बंद असलेले उद्योग सुरु करण्याबाबत उद्योजकांना परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्य सरकारने तयार केल्या नियमानुसार अर्थात जे कारखाने, उद्योग कामगारांच्या राहण्याची, प्रवासाची सोय करतील अशांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून त्या उद्योगांना सूटही देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे …
Read More »लोककलावंताना राष्ट्रवादीकडून मदतीचा हात भटक्या विमुक्त जातीतील लोककलावंतांच्या खात्यात जमा होणार ३ हजार रुपये
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील भटक्या विमुक्त जातीतील लोककलावंतांच्या मदतीला राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट धावून आली असून प्रत्येक लोककलावंतांच्या खात्यात उद्यापासून (शुक्रवार) प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे खजिनदार आमदार हेमंत टकले यांनी दिली. कोरोनाच्या संकटामुळे समाजातील अनेक वेगवेगळे घटक अडचणीत सापडले आहेत. स्थलांतरित मजुर असतील किंवा …
Read More »विद्यापीठाच्या परीक्षाही आता लॉकडाऊननंतरच नवे वेळापत्रक मे मध्ये जाहीर होण्याची शक्यता
मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारने ३ मे पर्यत लॉकडाऊनची मुदत वाढविली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सर्व परिक्षा ३ मे नंतर घेण्याचा निर्णय घेतला असून लॉकडाऊन संपल्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच अर्ज भरण्याच्या सर्व तारखाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई विद्यापीठ …
Read More »रात्रो ८ वाजेपर्यत दुकाने चालू ठेवा मात्र तांदूळ वाटा आतापर्यत ४६०३८७ रेशनकार्डधारकांना मोफत तांदळाचे वाटप
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रति महिन्याचे धान्य वाटून प्रति माणसी ५ किलो तांदूळाचे मोफत वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी करण्यात आले आहे. तसेच हे मोफत धान्य वाटप करण्यासाठी सकाळी ८ ते रात्रो ८ वाजेपर्यत धान्य वाटण्याचे आदेश सर्व रेशनिंग अर्थात रास्तभाव …
Read More »महाराष्ट्र कोरोनाबरोबरची लढाई जिंकतोय चिमुकल्यापासून ते आजीबाईंसह २९५ रूग्णांनी केली मात
मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील अनेक भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच याच कोरोनाग्रस्तांकडून या विषाणूवर मात करण्यात येत असून महाराष्ट्राचा कणखरपणा दाखवित २९५ जणांनी आजारातून बरे होवून दाखविले आहे. मुंबई महानगरातील २०६ जणांसह ८९ नागरिकांनी कोरोनावर मात केल्याचे दिसून आले आहे. राज्यात कोरोना चाचणीसाठी ५२ हजार जणांचे नमुने पाठविण्यात आले …
Read More »सोलापूरात आणखी १० कोरोनाबाधीत रूग्ण जिल्हाधिकारी शंभरकर यांची माहिती
सोलापूर: प्रतिनिधी राज्यात कोरोना विषाणू ग्रस्त रूग्णांची संख्या वाढत असताना सोलापूर जिल्ह्यात एकही कोरोनाचा रूग्ण नव्हता. मात्र मागील काही दिवसात एक रूग्ण सापडला त्यानंतर त्याचा मृत्यूही झाला. त्यानंतर काहीजणांच्या करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये निगेटीव्ह अहवाल प्राप्त झाला. मात्र आज १० कोरोनाबाधीत रूग्ण सापडल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. यापूर्वीचा रूग्ण …
Read More »कामगारांसमोर तगुन रहायचं आव्हान कोव्हीडी -१९ आणि लॉक डाऊन
आज, हजारो घरकामगार महीला आपल्या घरकामा सारखे कामापासून वंचित झाल्या आहेत, सोबत आपले खात्रीचे उत्पन्न ही गमावून बसल्या आहेत. याचा थेट परीणाम त्यांच्या उपजीविकेला बसला असुन आज प्रचंड अस्वस्थता या घर कामगार महीलांमध्ये पसरली आहे, याची प्रमुख दोन कारणे आहेत की एक तर या महीलांची कुटुंबे ही अत्यल्प उत्पन्न गटातील …
Read More »शेतीशी संबधित दुकांनासह या गोष्टी सुरु राहतील लॉकडाऊनमधील सूट देण्यात आलेली सरकारी यादी
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाने 3 मेपर्यंत घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत शेतीशी संबधित विविध बाबींना सूट दिली आहे. तसेच सर्व प्रकारच्या माल आणि वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली असून बसून खाण्याची व्यवस्था नसलेली मिठाईची दुकाने, नाष्टयाचे पदार्थ आणि फरसाणाची दुकाने यांनाही सूट देण्यात आली आहे. कोविड-19 (कोरोना विषाणू) चा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्य …
Read More »आईच्या १४ व्याचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीला सामाजिक न्यायमंत्र्याच्या स्वीय सहायकाकडून सामाजिक जाणीवेच्या "गोड जेवण"चा आदर्श
मुंबई: प्रतिनिधी आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेंव्हा जाणवत नाही, आता नसलीच कुठे तरी नाही म्हणवत नाही… कविवर्य फ.मु. शिंदे यांच्या या कवितेतील भावना प्रशांत भास्कर जोशी आणि त्यांचे कुटुंबिय प्रत्यक्ष अनुभवत आहेत. नुकतेच सामाजिक न्याय मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या प्रशांत जोशी यांच्या आईचे म्हणजे सौ. इंदुबाई …
Read More »शेलार म्हणाले ठाकरेंना कालचा उद्रेक हा प्रीपेड मोबाईलमुळे पत्र लिहून पालकमंत्री आदित्य ठाकरेंचे लक्ष वेधले
मुंबई: प्रतिनिधी काल वांद्रे स्टेशन परिसरात बांधकाम मजूर आणि कामगारांचा जो जमाव गोळा झाला त्यानंतर आज भाजपा नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी या मजुरांच्या विविध संस्था-संघटना यांच्याशी संवाद साधला.. त्यातून विविध बाबी व त्यांच्या अडचणी समोर आल्या त्याबाबत आज पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून हे मुद्दे सरकारच्या लक्षात …
Read More »
Marathi e-Batmya