मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत असून मागील १० दिवसात राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १० हजार ३९७ ने वाढली आहे. २४ तासात १४९५ नव्या रूग्णांचे निदान आज झाले असून ५४ जणांच्या मृत्यूची नोंदही आजच झाली आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत राज्यातील रूग्णांची संख्या २५ हजार ९२२ वर …
Read More »राज्याच्या कौशल्य विकासचे विद्यार्थीही उतरले कोविडच्या युध्दात १५० उमेदवारांना हॉस्पीटलमध्ये मिळाली अप्रेंन्टीसशिप
मुंबई: प्रतिनिधी कोविड विरोधी लढ्यात नर्स, डॉक्टरांचा स्टाफ कमी पडत असल्याने कोरोना यौध्द्यांची भरती राज्य सरकारकडून करण्यात आली. मात्र तरीही संख्या कमी पडत असल्याने कौशल्य विकास विभागाच्या अंतर्गत असलेल्या प्रशिक्षण केंद्रातून नर्सिंग, लॅब टेक्निशियन, डायलेसिस टेक्निशिअन आणि पॅरा मेडिकल कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना आता मुंबई. ठाणे येथील रूग्णालयात अप्रेंटीशिप देण्यात येत …
Read More »सोलापूरात रूग्णांचा आकडा ३०० पार २४ तासात ३१ रूग्णांचे निदान : २ जणांचा मृत्यू
सोलापूर: प्रतिनिधी काल सोलापूरात अवघे २ रूग्णांचे निदान झाल्याने जिल्ह्यात दिलासादायक वातावरण निर्माण झाले. मात्र आज २४ तासात नव्याने ३१ रूग्ण आढळून आले असून ,रूग्णांची संख्या ३०८ वर पोहोचल्याने पुन्हा जिल्ह्यातील वातावरण चिंताजनक बनले. तसेच आज दोन रूग्णांचा मृत्यू झाला. ३ हजार ५०२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३३६० जणांचे …
Read More »कोरोना लढ्यासाठी देवस्थानातील १ ट्रिलियन किंमतीचे सोने ताब्यात घ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेले आहेत. त्याचा फटका अनेकत कष्टकरी, कामगार आणि उद्योजकांना बसत असून सरकारची तिजोरीही रिकामी होत चालली आहे. यापार्श्वभूमीवर निधीची आवश्यकता भासणार असल्याने देशातील सर्व देवस्थानात पडून असलेले १ ट्रिलियन अर्थात ७६ लाख कोटी रूपये किंमतीचे …
Read More »सरपंच, उपसरपंचांची निवड होणार, पण ग्रामसभा नाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतींच्या या बैठका घेण्यास संमती देण्यात आली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करुन घेण्यात याव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला करत ग्रामसभा घेण्यास त्यांनी परवानगी नाकारत असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन …
Read More »पॅकेज-१: आयकरसाठी ३० नोव्हें. पर्यंतची मुदत : टीडीएस टीसीएसमध्ये २५ टक्के कपात लघु व मध्यम उद्योजकांसाठी ३ लाख कोटींचे कर्ज देणार
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे भेडसाव्या लागत असलेल्या आर्थिक नुकसानीत नागरिकांना आणि उद्योगांना दिलासा देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोकरदार, व्यापारी आणि उद्योजकांना उत्पन्नावरील आयकर भरण्यासाठी ३० नोव्हेंबर आणि ऑडिट करण्यासाठी ३१ ऑक्टोंबर पर्यंतची मुदत देत टीडीएस आणि टीसीएसच्या दरात थेट २५ टक्के कपात करण्यात येत असल्याची घोषणा केली. तसेच ही …
Read More »उत्पादकतेला आरोग्याची जोड द्यावी लागणार कोरोनासोबत जगण्यासाठी पोटाला भाकर आणि हाताला काम द्यावे लागेल
चीनमध्ये डिसेंबर १९ ला मध्ये आढळून आलेल्या covid-19 विषाणूचा फैलाव भारतात होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मार्च २४ ला लॉकडाउन सुरू झाला. १३० कोटीचा देश स्तब्ध झाला. यामुळे मोठ्या जनसंख्येचे उत्पन्न बुडाले, बचत संपायला लागली, रोजगार बुडाला. साहजिकच साथ येण्यापूर्वी डबघाईस आलेली अर्थव्यवस्था पूर्ण बुडण्याच्या मार्गावर आहे. धोरणकर्ते लॉकडाउनमध्ये काय करावे …
Read More »सलग ६ व्या दिवशी १ हजाराहून अधिक रूग्ण २४ हजार ४२७ वर राज्याची संख्या: ५३ जणांचा मृत्यू
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णाची संख्या आज सलग सहाव्या दिवशी १ हजारने वाढली असून २४ तासात १ हजार २६ रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे राज्याची रूग्णांची संख्या २४ हजार ४२७ वर पोहोचली असून ५३ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ५ हजार १२५ रूग्ण बरे होवून घरी गेल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश …
Read More »२० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजसोबत ४ था लॉकडाऊन १८ मेपासून सर्वस्तरातील घटकांचा विचार पॅकेजमध्ये केल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील तीन टप्प्यात लॉकडाऊन होता. मात्र त्या सर्वांपेक्षा वेगळा आणि नवा लॉकडाऊनचा ४ था टप्पा सुरु होणार आहे. देशातील रस्त्यावर विक्री करणारा, फुटपाथवरचा ठेलेवाला यांच्यासह कुटीरोद्योग, लघु उद्योग, गृह उद्योग, छोटे-मोठे उद्योग यासह संपूर्ण उद्योग जगातासाठी २० लाख कोटी रूपयांचे विशेष आर्थिक पॅकेज भविष्यकाळात देशाला आत्मनिर्भर …
Read More »कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दिलासा: फक्त अंतिम सत्राची परिक्षा होणार १५ जून पूर्वी परिक्षा तर १५ जुलैपूर्वी निकाल- कृषीमंत्री दादाजी भुसे
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कृषि व संलग्न अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी चारही कृषि विद्यापीठातील परिक्षांच्या नियोजनाचा कृषि अनुसंधान परिषदेने तयार केलेला कृति आराखडा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहिर केला. कृषि पदविका (दोन वर्ष) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यमापनाव्दारे १०० टक्के गुण देऊन व्दितीय वर्षात प्रवेश देण्यात येईल. तर व्दितीय …
Read More »
Marathi e-Batmya