Editor

एकामुळे दुसऱ्या मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारीही अंडर ऑब्जर्व्हवेशनखाली ? मंत्रालयातील दोन कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी नेले

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही राज्य मंत्रिमंडळातील काही बेजबाबदार सदस्यांकडून नको त्या गोष्टींची उठाठेव केली जात आहे. सदर या मंत्र्यांमुळे त्यांच्याच सहकारी मंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाच्या अंडर ऑब्जर्व्हव्हेशन खाली जावे लागल्याची माहिती मंत्रालयातील प्रत्यक्षदर्शीने दिली. राज्य मंत्रिमंडळातील एक मंत्री कोरोना निगेटीव्ह-पॉजीटीव्ह असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सतत सुरु …

Read More »

मुख्यमंत्र्याच्या फोनचा ४० हजार जणांना फायदा अखेर केंद्रीय नौकानयन मंत्रालयाची परवानगी

मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नाने अखेर मरिला डिस्कव्हरी या एका मोठ्या क्रुझ शिपवर महिन्याभरापासून अडकून पडलेल्या १४६ भारतीय खलाशी व नाविक यांना मुंबई बंदरावर उतरण्याची परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री स्वत: नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी बोलल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने काल उशिराने यासंदर्भातील एक आदेश जारी केला. त्याचा फायदा …

Read More »

कन्टेजन (contagion) अर्थात कोरोना चित्रपट आणि सद्यपरिस्थिती चित्रपटात दाखविलेल्या सुरक्षेच्या उपायाची वास्तवात अंमलबजावणी

वास्तविक पाहता चित्रपट, कांदबरी, कथा किंवा गेला बाजार वर्तमानपत्र ही सर्व माध्यमातील पोटअंगे समाजाचा आरसा म्हणून आपणा सर्वांना परिचित आहेत. मात्र २०१६ साली वॉर्नर ब्रदर्स या प्रसिध्द चित्रपट निर्मिती संस्थेने हॉलीवूड सिनेमा “कन्टेजन” हा आणला होता. तो सर्व जगभरात प्रदर्शित झाला. त्यावेळी सिनेमाप्रेमींनी हा चित्रपट पाहिलाही असेल. मात्र सायन्स फिक्शन …

Read More »

मुंबई- पुणेकरांनो ऐकत नाही ना काढून घेतल्या तुमच्या सवलती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी लॉकडाऊन मध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द केली असून अधिक काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले जावे असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. २० एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरविल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे …

Read More »

मुंबई महानगरची ४ हजार तर राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५ हजारावर ३ दिवसात १५०० ने वाढली: १९ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मागील दोन दिवसात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या १०१८ वर पोहचली होती. त्यात आज नव्याने ५५२ रूग्णांची नोंद झाल्याने तीन दिवसात १५०० ने संख्या वाढली असून कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ५ हजार २१८ वर पोहोचली आहे. मुंबई महानगरातील रूग्णांची संख्या ४ हजार ७७ वर पोहोचली असून तर २४ तासात १९ …

Read More »

कोरोना रुग्णालयात आता व्हेंन्टीलेटर नाहीतर ऑक्सिजन स्टेशन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यामध्ये असलेल्या तोकड्या व्हेंटीलेटरवरच्या संख्येवर तोडगा म्हणून कोरोना उपचारासाठी असलेल्या विशेष रुग्णालयांमध्ये आणि अलगीकरणाची (क्वारंटाईन) सुविधा असलेल्या ठिकाणी आता ऑक्सिजन स्टेशन उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक खाटांवर आता ऑक्सिजन मास्क लावण्यात येईल आणि त्याला ऑक्सिजन पुरवठ्याची सोय त्याठिकाणी केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे …

Read More »

महिलाही कोरोना विरोधी लढ्यात पुढे माविमची ११ लाख रूपयांची मदत तर बचतगटांकडून लाखावर मास्क

मुंबई-यवतमाळ : प्रतिनिधी महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने (माविम) मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ साठी ११ लाख ३५ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. माविम अंतर्गत बचत गटातील महिलांनी प्रत्येकी १ रुपये आणि माविमच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन असे योगदान यात दिले आहे. कोविडविरोधी लढ्यात सक्रिय योगदानाबद्दल महिला व बालविकास …

Read More »

१ लाख रूपयांपर्यत उत्पन्न असणाऱ्यांना ८ रू. आणि १२ रू.ने तांदूळ -गहू २४ तारखेपासून वाटप होणार रेशनिंगच्या दुकानातून

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केलेला असल्याने या कालावधीत सर्वच व्यावसायिक संस्था, रोजगाराच्या संधी बंद आहेत. त्यामुळे कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच ज्यांचे उत्पन्न ५९ हजार ते १ लाख रूपयांपर्यत असणाऱ्या केशरी कार्डधारकांना ८ रूपये प्रति …

Read More »

बेकायदेशीर वागणाऱ्यांकडून २ कोटी ३० लाखांची तिजोरीत भर कोविड संदर्भात ६० हजार गुन्हे दाखल -१३ हजार व्यक्तींना अटक तर ४१ हजार वाहने जप्त

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते २०एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ६० हजार ५ गुन्हे दाखल झाले आहेत. तर १३,३८१ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ४१,७६८ वाहने जप्त करण्यात आली असून विविध गुन्ह्याखाली बेकायदेशीर वागणाऱ्यांकडून २ कोटी ३० लाख रूपयांचा दंड आकारण्यात  आल्याची …

Read More »

अमित शाह, फडणवीस बोलले…देशमुख यांची हकालपट्टी करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने दोन साधूंची जमावाकडून हत्या झाल्याची मॉब लिंचिंगची घटना अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. राज्यात वारंवार कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी व या घटनांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी …

Read More »