Editor

राज्यात कोरोनामुळे मृतकांच्या संख्येत विक्रमी नोंद : ३० हजाराचा टप्पा पार १८४२ रूग्णांचे निदान, ७ हजाराहून अधिक रूग्ण घरी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना या आजारामुळे मृत पावणाऱ्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून करण्यात येत होता. मात्र आज सर्वाधित ६७ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाल्याची विक्रमी नोंद झाली असून राज्यात १६०६+३६=१८४२ रूग्णांचे निदान होत बाधीत रूग्णांची संख्या ३० हजार ७०६ वर पोहोचली आहे. मागील …

Read More »

कोविड आणि मी…. आजारातून बरे झालेले मंत्रालयातील अधिकारी सांगतायत आपबीती खास मराठी e-बातम्याच्या वाचकांसाठी

मेरा मुझमे कुछ नही, जो कुछ है ये तेरा । तेरा तुझको सौप दे, क्या लागे है मेरा ।। …संत कबीर साधारण: जानेवारी महिन्यामध्ये माझ्या मित्रांसोबत एका डिनरवेळी कोविड संदर्भाने चर्चा झाली होती. त्यावेळी चीनच्या वुहान प्रांतात या रोगाने पूर्ण धुमाकुळ घातला होता. कालौघात त्याने अमेरिका, युरोप सारख्या वैद्यकिय प्रगत …

Read More »

सोलापूरात रात्रीतील १७ सह दिवसभरात २१ जणांचे निदान संख्या ३६४ वर १५० जण बरे होवून घरी

सोलापूर: प्रतिनिधी पुणे जिल्ह्यापाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असून दररोज किमान १० कोरोननाबाधीत आढळून येत आहेत. काल दिवसभरात अवघे दोन रूग्ण आढळून आल्यानंतर रात्रीत १७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर दिवसभरात ४ रूग्णांचे निदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंबरकर यांनी दिली. सद्यपरिस्थित कोरोनाग्रस्तांची संख्या ३६४ वर पोहोचली …

Read More »

पॅकेज सर्वसामान्यांसाठी की धनदांडग्या उद्योगपतींसाठी? मंत्री अशोक चव्हाण यांचा केंद्र सरकारला संतप्त सवाल

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारचे पॅकेज कोरोनामुळे होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्यासाठी आहे की धनदांडग्या उद्योगपतींची घरे भरण्यासाठी आहे, असा सवाल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. कोरोना पॅकेजच्या नावाखाली केंद्र सरकारने नवीन आर्थिक धोरणे जाहीर करण्याचा सपाटा सुरू केला आहे. कोरोनाविरूद्ध आज सुरू असलेल्या लढाईशी …

Read More »

राज्याची जीवन वाहीनी ठरलेली लाल परी बनली मजुरांची मदत वाहीनी ११ हजार ३७९ बसेस मधून १ लाख ४१ हजार ७९८ मजुरांचा प्रवास

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ज्या एस.टी बस कडे पाहिले जाते त्या एस.टी बसेसही स्थलांतरीत मजुर आणि कामगारांच्या मदतीला धावून आल्या आहेत. आतापर्यंत ११ हजार ३७९ बसेसद्वारे सुमारे १ लाख ४१ हजार ७९८ स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बसची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत आपल्या …

Read More »

मुख्यमंत्री आणि पवारांमुळे अखेर बिहार, प.बंगालचे कामगार पोहोचले घरी गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात अडकून पडलेल्या बिहार आणि पश्चिम बंगालच्या कामगारांना ठाम नकार देण्यात येत होता. मात्र यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्तीशं बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधल्याने या कामगारांना त्यांच्या मुळ घरी जाता आले. …

Read More »

व्रतस्थाची सावली हरपली सविता दिनू रणदिवे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविता रणदिवे यांचे शनिवारी निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. प्रेमजी देवजी कन्या विद्यालय, चिंचपोकळी येथे गुजराती भाषेच्या शिक्षिका म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांच्या पश्चात ज्येष्ठ दिनू रणदिवे हे आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आघाडीवर राहिलेले ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे …

Read More »

पॅकेज ४- आत्मनिर्भर भारतासाठी संरक्षण, अंतराळ, कोळसा, खाण उद्योगात खाजगी कंपन्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून घोषणा

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी कोरोना संकटाला संधीत रूपांतरीत करण्यासाठी आत्मनिर्भर भारताचा नारा देत लोकल टू ग्लोबल बनण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यातील ४ थ्या टप्प्यात अंतराळ, ऑटोमिक एनर्जी, संरक्षण, इस्त्रो, खाणी, विमानतळ, वीज वितरण, रिमोट सेंन्सिंग आदी क्षेत्रातील सरकारची एकाधिरशाही संपुष्टात आणत खाजगी गुंतवणूकदारांच्या मदतीने …

Read More »

९ वा महिना शुरू है, यहाँ कपडा और ब्लेड मिलेगा …..? राहत केंद्र (निंबळक बायपास रस्ता), सासऱ्याची सूनेसाठी धडपड- स्नेहालय संस्थेने पाठविलेली हकिकत

अहमदनगर : प्रतिनिधी “गर्भवती असलेल्या आपल्या सुनेची, शैलाची प्रसूती चालू कंटेनरमध्ये करावी लागली तर त्यासाठी नाळ कापायला दोन नवे ब्लेड ,कापूस,स्पिरीट आणि निरुपयोगी कपडे मिळतील का ? ” असे विष्णू यादव याने विचारले तेव्हा राहत केंद्रावरील सर्वजण सुन्न झाले. उत्तर भारतातील आपल्या घरांकडे पायी , सायकलिंद्वारे तसेच मिळेल त्या वाहनाने …

Read More »

राज्याची वाटचाल ३० हजार रूग्ण संख्येकडे : तर मृतकांची संख्या एक हजारावर कोरोनाचे आज १५७६ नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण २९ हजार १००

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या २९ हजार १०० झाली आहे. आज १५७६ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५०५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६५६४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २१ हजार ४६७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज …

Read More »