कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटीच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांना कोणतीही तडजोड न करता तातडीने निलंबित करण्याचे सक्त निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. आज मुंबईतील परळ बसस्थानकाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची पाहणी केली. यावेळी विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या …
Read More »एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या पाठीशी आता इम्तियाज जलिल पुरे मुंब्रा पण आता पुरा महाराष्ट्र हरा करेंगे
ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूकीतील विजयानंतर एमआयएमच्या मुंब्रा येथील उमेदवार सहर शेख यांनी विजयी कार्यक्रमात बोलताना कैसा हराया, अभी हम लोगोंको पूरे मुंब्रा को हरा कर देना है असे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह काही हिदूत्ववादी संघटनांच्या स्वयंघोषित नेत्यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेत सहर शेख यांच्यावर टीकेची …
Read More »बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गंभीर दखल पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे शिक्षण विभागाला निर्देश
बदलापूर येथील लहान मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे.भविष्यात लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी आणि पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांना दिले. कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष व शिक्षण …
Read More »एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा सत्कार न्यायप्रिय व्यक्ती सर्वोच्च पदावर असतील, तोपर्यंत लोकशाही सुरक्षित
“न्यायप्रिय व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर असतील, तोपर्यंत आपल्या संविधानाला आणि लोकशाहीला कोणताही धोका नाही,” असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या सन्मानार्थ मुंबई उच्च न्यायालयात आयोजित भव्य सत्कार सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी बोलत होते. एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, चंद्रपूर काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही मुंबईत बिहार भवन तर पाटण्यात महाराष्ट्र भवन का नाही
महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेने राज्यात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवले असून सर्वात मोठा विरोधी पक्ष बनवले आहे. आता चंद्रपूर, लातूरसह इतर शहरातील महापौरपदासाठी काम सुरु आहे. चंद्रपूरमध्ये पक्षात कोणताच वाद नाही, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात योग्य समन्वय असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. बुलढाणा …
Read More »यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या भव्य पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला असून, यंदा राज्याच्या वतीने ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर यंदाचा सोहळा विशेष ठरणार आहे. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो …
Read More »दादाजी भुसे यांची माहिती. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर कवायत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त घेतलेल्या निर्णयाची माहिती
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या २६ जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये एकाचवेळी ‘देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या या कवायती शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर होणार असून यामध्ये राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांमधून, सात लाखापेक्षा …
Read More »त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील समितीस ४ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ राज्य सरकारचा निर्णय, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दि. ३० जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला, या समितीच्या कार्यकाळास दि. ५ जानेवारी पासून दि. ४ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीसाठी (एक महिना) मुदतवाढ देण्यात आली आहे. …
Read More »भारत निवडणूक आयोगाच्या ‘ईसीआयनेट’ डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संकल्पनेतून ईसीआयनेटची निर्मिती
भारत निवडणूक आयोगाने इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (आयआयसीडीईएम)-२०२६ दरम्यान ‘ईसीआयनेट (ईसीआयएनईटी)’ या एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले. २१ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान भरत मंडपम, नवी दिल्ली येथे ही तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संकल्पनेतून, तसेच निवडणूक …
Read More »प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यातून मिळतोय जलद न्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार
‘सर्वांसाठी न्याय.. जलद न्याय ‘ या तत्वावर राज्य शासन काम करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली जलद गतीने न्याय मिळण्यासाठी न्यायदान साखळीतील कमतरता दूर करण्यात येत आहे. नवीन फौजदारी कायद्याअंतर्गत जलद न्यायाला प्राधान्य दिले असून त्यानुसार न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येत आहे. त्यामुळे …
Read More »
Marathi e-Batmya