Tag Archives: खासदार

निलंश लंके यांची स्पष्टोक्ती, राष्ट्रवादीच्या खासदारांचे ऑपरेशन कधीही होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

पक्ष पुन्हा एकदा नवीन जोमात उभा करण्याकरिता पक्ष संघटनेत लवकरच बदल करण्यात येणार असून त्यानंतर राज्यभर दौरा केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे. शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून जिल्हास्तरावर …

Read More »

खासदार वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे लेखी हमीची मागणी धारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी

धारावीच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सध्या सुरू असून, धारावी पुनर्विकास प्रकल्प हा केवळ इमारती उभारण्यापुरता मर्यादित नसून धारावीतील नागरिकांच्या सर्वांगीण सामाजिक, आर्थिक विकासाशी निगडित आहे. त्यामुळे धारावीतील रहिवासी, त्यांचे रोजगार, उद्योगधंदे आणि स्थानिक सामाजिक व्यवस्था (इकोसिस्टम) यांना या प्रकल्पाच्या केंद्रस्थानी ठेवणे अत्यावश्यक आहे. या सर्व  मुद्द्यांचा विचार करून एक विशेष बैठक आयोजित करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस …

Read More »

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम राबविताना पक्षपातीपणा केला जात असल्याचे दिसून आले आहे. एसआयआर (SIR) मोहिम राबविताना काही बाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्रात पुढील तीन-चार वर्षात कोणत्याच निवडणुका नाहीत, त्यामुळे मुंबईत एसआयआर (SIR) मोहिम राबविताना घाईघाईत न करता त्यासाठी वेळ द्यावा …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, एसआयआर (SIR) प्रक्रियेतून एकाही मुंबईकराचे नाव वगळले जाणार नाही याची खबरदारी घ्या जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा

लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा केवळ घटनात्मक अधिकार नाही, तर भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. परंतु भाजपा सरकार निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्येही घोटाळा करत आहे. विविध राज्यात राबवण्यात आलेल्या एसआयआर प्रक्रियेतून मोठ्या संख्येने मतदार वगळण्यात आलेले आहेत. अशी परिस्थिती मुंबईकरांवर ओढवू नये, यासाठी एसआयआर प्रक्रियेवर बारीक नजर ठेवावी व एकाही मुंबईकराचे नाव …

Read More »

तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांचा तडकाफडकी राजीनामा पक्षाच्या बैठकीनंतर तडकाफडकी राजीनामा दिल्याने आर्श्चयाचा धक्का

तृणमूल काँग्रेसच्या बारासात लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांनी, ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्ती आणि ज्येष्ठ खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी पक्षातील सर्व संघटनात्मक पदांवरून पायउतार झाल्या. बारासात लोकसभा मतदारसंघातून चार वेळा खासदार राहिलेल्या घोष दस्तीदार यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्त्वाच्या प्रशासकीय बैठकीला हजेरी लावल्यानंतर काही …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, पेट्रोल पंप बंद, महागाई वाढली, सरकार खरं का बोलत नाही? राज्यातील यंत्रणा कुलमोडली, पुणे बनले ‘क्राईम कॅपिटल’, पेट्रोल-डिझेल दरवाढ ही फक्त सुरुवात पिक्चर अभी बाकी है

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीबाबत काही आश्वर्य वाटत नाही. ही फक्त सुरूवात आहे, पिक्चर अभी बाकी है कशाचेही सोंग घेता येते हो पण पैसे आणि अन्नधान्याचे सोंग घेता येत नाही असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. मुंबईमध्ये पेट्रोल पंप …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा टोला, त्याग व काटकसर मोदींनीव स्वतःपासून करावी पंतप्रधानांच्या सल्ल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्र्यांनीही गाड्यांचा ताफा सोडून मेट्रो, बेस्ट व लालपरीने प्रवास करावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अखेर देश संकटात आहे हे कबुल करून स्वतःचे अपयश मान्य केले आहे. १२ वर्षांपासून नरेंद्र मोदींनी देशाला वेठीस धरले आहे. निवडणुका, प्रचार व द्वेष पसरण्यापलिकडे भाजपा व मोदी सरकारने काहीही केलेले नाही. अमेरिका-इराण युद्धाचा फटका देशाला बसणार हे माहित असतानाही मोदी सरकारने कोणतेही नियोजन केले नाही, त्याचा मोठा फटका …

Read More »

शिवसेना खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा दोन महिन्यांचा राज्यव्यापी दौरा राज्यातील २२ जिल्हे, १०० हून अधिक विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक मजबूत, सक्षम आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेना संसदीय गटनेते तथा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विधानसभा निहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी संवाद दौरा १६ मे २०२६ पासून सुरू होत आहे. १६ मे ते १५ जुलै असे …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, कायदा सुव्यवस्थेप्रश्नी राज्यपालांनी लक्ष घालावे; ‘शक्ती’ कायदा लागू करा मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांची राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे पत्र पाठवून मागणी

राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. गुन्हेगारांना भिती बसली पाहिजे अशी शिक्षा झाली पाहिजे. नसरापूरच्या घटनेनंतर आतातरी राज्य सरकारने गंभीर होऊन महिला सुरक्षेवर काम करावे, यासाठी राज्यपाल यांनी जातीने लक्ष घालावे व ‘शक्ती’ कायदा लवकरात लवकर राज्यात लागू करावा यासाठी …

Read More »

वर्षा गायकवाड यांचे आव्हान, भाजपाला महिलांना आरक्षण द्यायचेच नाही, हिम्मत असेल तर…. तामिळनाडू, प. बंगालमधील विधानसभा निवडणुकीत राजकीय लाभ मिळवण्यासाठी महिला विधेयकाचा अस्त्रासारखा गैरवापर

महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे करून भारतीय जनता पक्ष फक्त राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग करत आहे. १६ एप्रिलच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक नाही तर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा पराभव झाला आहे, कारण महिला आरक्षण विधेयक तर २०२३ मध्ये सर्वसंमतीने मंजूर झालेले आहे, त्याचा कायदाही बनला आहे, पण त्याची अंमलबजावणी मात्र भाजपा …

Read More »