काँग्रेसची टीका, फडणवीसांची सपकाळांविषयी ‘नया है वह’ प्रतिक्रीया हिंदी सक्ती मानसिकतेतून’ ‘काँग्रेस अध्यक्षांना’, गुन्हेगारी आरोपांबाबत अँफीडेव्हीट देण्याची गरज कधी भासली नाही..!!

मुख्यमंत्री फडवीसांवर हिंदी’चा प्रभाव किती खोलवर पोहेचलाय हे काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळांचे आरोपां प्रती, पत्रकारांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांवर, फडणवीसांनी अनाहुत पणे दिलेली.. ‘नया है वह’ ची प्रतिक्रिया” हिंदी सक्तीच्या मानसिकतेतुन दिसुन आली व मोदी-शहांच्या दमनशाही वृत्तीचा मुख्यमंत्र्यांना ‘वाण नाही पण गुण लागला’हे स्पष्ट झाल्याचे टिकात्मक प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी  केले.

गोपाळ तिवारी पुढे म्हणाले की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमातील विनोबा भावे आदींचे सत्य, अहिंसा व निर्भयतेचे संस्कार लाभलेले नेते आहेत.. साधी राहणी, ऊच्च विचारसरणी व नैतिक चारीत्र्याचे अधिष्ठान’ लाभलेले व सत्याची कास धरणारे नेते आहेत.

पुढे बोलताना गोपाळ तिवारी म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळांचे प्रती बोलण्यापुर्वी, भाजपा’च्या ‘नवीन अध्यक्षां’च्या चारीत्र्याची माहीती स्वतःकडे गृहखाते असल्याने फडणवीसांकडे निश्चितपणे असेल, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर भाजपा’ला गुन्हेगारी कृत्याबाबत वादातीत अध्यक्ष नेमण्याची वेळ का आली(?) यावर अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. अन्यथा भाजपाच्या ‘नव्या प्रदेशाध्यक्षाचे’ काही गंभीर प्रकरण पुढे आल्यास..‘नया है वह’ सांगून सुटका करण्याची आपणावर वेळ येऊ नये, अशी पुस्तीही त्यांनी जोडली..!

About Editor

Check Also

अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा- विद्यार्थ्यांना दिलासा

राज्यातील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *