मुंबई: विशेष प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता स्व. सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी केली. ही मागणी जरी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगेच फेटाळून लावली. मात्र त्यानंतर काही दिवसांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी शरद …
Read More »ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय: आजी, माजी सैनिकांना मालमत्ता करमाफी मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. यासंदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागामार्फत काल निर्गमित करण्यात आला असून देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राज्यातील सर्व आजी, माजी सैनिकांसाठी हा निर्णय लागू करण्यात येत असल्याचे त्यांनी …
Read More »मुंबई पोलिसांनी जी लपवाछपवी केली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का? भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर या निर्णयाचे स्वागत करीत भाजपा नेते आमदार. अँड. आशिष शेलार यांनी राज्य सरकारने आतापर्यंत या प्रकरणात लपवाछपवी केली होती आता तरी सीबीआयला सहकार्य करा, अन्यथा जनप्रक्षोभाला समोरे जावे लागेल, असा इशारा राज्य सरकारला दिला. भाजप …
Read More »औरंगाबादच्या आरएसएसच्या कार्यालयाच्या इमारतीत राष्ट्रध्वजाचा अपमान गुन्हा दाखल करण्याची भीम आर्मीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
औरंगाबाद : प्रतिनिधी देशाचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंगा झेंड्याला १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन करताना हा ध्वज त्या त्या भागात सर्वोच्चस्थानी फडकवावा अशी राज्यघटनेतच नियम आहे. मात्र १५ ऑगस्ट२०२० रोजी येथील समर्थनगरातील “प्रल्हाद भवन” या आरएसएसच्या कार्यालयाच्या इमारतीतवर सर्वात उंचीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ध्वज, तर …
Read More »अनुसूचित जाती-जमातीच्या शासकिय कर्मचाऱ्यांची माहिती २ दिवसात सादर करा सामान्य प्रशासन विभागाचे सर्व विभागांना आदेश
मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील नागरिकांना देण्यात येत असलेल्या पदोन्नती विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्याची पुढील सुणावनी लवकरच होणार असल्याने सध्या शासकिय विभागात कार्यरत असलेल्या या दोन्ही प्रवर्गासाठीची मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती दोन दिवसात अर्थात २० ऑगस्ट पर्यत सामान्य प्रशासन …
Read More »देशाचा मृत्यूदर १.९२ टक्के, तर मुंबईचा मृत्यूदर ऑगस्टमध्ये ५.४० टक्के मुंबईत संसर्गाचे प्रमाणही १९.७२ टक्के, चाचण्या वाढविण्याची विरोधी पक्षनेते फडणवीसांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी देशाचा मृत्यूदर १.९२ टक्क्यांवर आहे. मात्र, मुंबईतील ऑगस्टमधील १७ दिवसांत मुंबईचा मृत्यूदर ५.४० टक्क्यांवर गेला आहे. मुंबईत चाचण्या वाढविण्याची नितांत गरज आहे. ही मागणी करणारे आणखी एक पत्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतेच पाठविले. सातत्याने आग्रह करून सुद्धा मुंबईत चाचण्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचे कारण आता कळेनासे झाले …
Read More »कोरोना: २ ऱ्या दिवशीही घरी जाणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या जास्त ११ हजार ११९ नवे बाधित, ९३५६ बरे झाले, ४२२ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज सलग दुसऱ्यादिवशी बरे होवून घरी जणाऱ्या रूग्णांच्या संख्येपेक्षा बाधित रूग्णांची संख्या जास्त आढळून आली आहे. ११ हजार ११९ नवे बाधित रूग्णांचे निदान झाल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ५६ हजार ६०८ वर पोहोचली तर एकूण रूग्ण संख्या ६ लाख १५ हजार ४७७ वर पोहोचली आहे. तर …
Read More »कॅप्टन अमोल यादव यांच्या विमान प्रकल्पास राज्य सरकार देणार जमिन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी कॅप्टन अमोल यादव यांनी भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांच्या पुढील प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली. कॅप्टन अमोल यादव यांनी मोठ्या कष्टाने भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांचे प्रात्यक्षिकदेखील यशस्वी झाले आहे. यापुढे …
Read More »मृत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या सामाजिक संस्था, संघटनांना आता विमा संरक्षण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार विधी करणारे ग्रामीण भागातील शासकीय सेवेत नसलेल्या सामाजिक संस्था, संघटनेचे कर्मचारी यांना २५ लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यासंदर्भातील शासन परिपत्रक आज निर्गमित करण्यात आले असून सर्व जिल्हा परिषदांना यासंदर्भात सूचना …
Read More »मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्री अशोक चव्हाणांवर सोपविली ही जबाबदारी मराठा समाजाच्या इतर मागण्यांबाबत तोडगा चव्हाण काढणार
मुंबई: प्रतिनिधी मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री व सचिवांची बैठक घेऊन शासनाला प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील उपसमितीकडेच सोपवण्यात …
Read More »
Marathi e-Batmya