Editor

कोरोनाबाधितांवरील उपचार, आरोग्य सुविधांच्या देखरेखीसाठी आता जिल्हास्तरीय समिती सीसीटीव्ही बसविण्याचे आणि नातलगांना रुग्णांच्या चौकशीसाठी रुग्णालयात सोय करण्याचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी त्रिस्तरीय रुग्णालय असून लक्षणांनुसार रुग्णांना या रुग्णालयात दाखल केले जाते. रुग्णांवर होणारे उपचार, कोरोना रुग्णालयातील आरोग्य सुविधा याची देखरेख करण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती कोरोना रुग्णालयांना नियमित भेटी देईल. यासंदर्भात आरोग्य विभागाने नुकताच शासन निर्णय जाहीर केला आहे. …

Read More »

कोरोना: अॅक्टीव्ह रूग्ण मुंबई-ठाण्यात ५० हजारावर तर राज्यात ८० हजाराच्या काठावर ३५१५ बरे होवून घरी तर ६३६४ नव्या रूग्णांचे निदान, १९८ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी मुंबईचे उपनगर म्हणून ओळखले जाणाऱ्या ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई-विरार आदी भागात सातत्याने रूग्ण संख्या वाढीस लागल्याने अखेर पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आला. परंतु तरीही या भागातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून ठाणे शहर व ग्रामीण भागातील बाधीतांची एकूण संख्या ५६६३ आणि ११२१४ वर पोहोचली …

Read More »

पोलिस उपअधीक्षक, सहायक पोलीस उपायुक्तांना पुस्तकासह परिक्षा देता येणार विभागीय परीक्षा आता ऑगस्टमध्ये -गृहमंत्री देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक/ सहायक पोलीस उपायुक्त यांची विभागीय परीक्षा आता ऑगस्टमध्ये घेण्यात येणार असून त्यांना परीक्षेसाठी पुस्तकासह परवानगी असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी संबंधितांना पुरेसा कालावधी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे सदर …

Read More »

पतंजलीने दिशाभूल केल्यास कडक कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

मुंबई: प्रतिनिधी पतंजलीने बाजारात आणलेल्या कोरोनील नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही. पतंजलीने या औषधामुळे कोरोना बरा होतो असा जनतेत संभ्रम निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास गृह विभागाच्या मदतीने औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन …

Read More »

प्रितम मुंडे, चित्रा वाघ, भांडारी, राम शिंदेसह भाजपाची नवी कार्यकारीणी जाहीर केशव उपाध्ये बनले प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते

मुंबई: प्रतिनिधी सत्तेतून उतरल्यानंतर भाजपातील अंतर्गत राजकिय धुसफूस काही काळ थांबलेली असतानाच नाराज पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश महेता आणि पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची आमदारकी नाही किमान पक्ष संघटनेच्या कामात तरी सामावून घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर पक्ष संघटनेतही या नेत्यांना डावलत पंकजा मुंडे यांच्या …

Read More »

‘पुण्या’साठी टेस्टींग इन्चार्ज म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नेमा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

पुणे: प्रतिनिधी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोराना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी ‘टेस्टींग इन्चार्ज’ म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याची नेमूणक करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे …

Read More »

वैद्यकिय शिक्षण मंत्र्याचा ३८ हजार चाचण्यांचा दावा आरोग्य विभागाने ठरविला खोटा कोरोना चाचण्या कमी होत असल्याचे सरकारच्याच प्रसिध्दी पत्रकातच उघडकीस

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे धोरण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले. त्यासाठी राज्यात १०० प्रयोगशाळांची स्थापना केली. या प्रयोगशाळांमुळे राज्यात प्रतिदिन ३८ हजार चाचण्या होत असल्याचा दावा वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केला. परंतु प्रत्यक्षात १० लाखांमागे ७७१५ कोरोनाचाचण्या होत …

Read More »

कोरोना संसर्गाचे प्रमाण देशापेक्षा मुंबईत जास्त ,तब्बल २८ टक्के मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहीत मुंबईतील कमी चाचण्यांकडे फडणवीस यांनी वेधले पुन्हा लक्ष

मुंबई: प्रतिनिधी मुंबईत सातत्याने कमी होत असलेल्या चाचण्या, त्यामुळे संसर्ग शोधण्यात येत असलेल्या अडचणी, मृत्यूसंख्येची अद्याप होत नसलेली फेरपडताळणी, मृतदेहांची कोरोना चाचणी होत नसल्यामुळे कोरोना योद्ध्यांनाच मदतीपासून वंचित रहावे लागणे, याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून …

Read More »

कोरोना: आज महिन्यातील सर्वाधिक बरे होणारे, नवे रूग्ण आणि चाचण्यांचा टप्पा ६ हजार ३३० नवे सर्वाधिक रूग्ण तर १२५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असले तरी बाधितांची संख्यांही चांगलीच वाढताना दिसत आहे. मागील २४ तासात ८ हजार १८ रूग्ण बरे होवून घरी गेले. तर आतापर्यंतची सर्वाधिक रूग्ण अर्थात ६ हजार ३३० रूग्णांचे निदान झाले. तर १२५ मृतकांची नोंद झाली असून घरी जाणाऱ्यांची संख्या १ …

Read More »

सुखद बातमी: २४ तासात ८ हजार रूग्ण घरी: कोरोनामुक्तांची संख्या लाखावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार झाली असून जुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी ८०१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आता बरे झालेल्यांची संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. आज सर्वाधीक बरे झालेले रुग्ण मुंबई मंडळतील असून ७०३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती आरोग्यमंत्री …

Read More »