मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. तसेच लॉकडाऊन, संचारबंदी आदी गोष्टींची अंमलबजावणीही करण्यात येत आहे. मात्र कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढच होत असून आज सर्वाधिक ३१ जणांचा मृत्यू झाला असून राज्यात नव्याने ७२९ रूग्ण आढळून आले असून ९ हजार ३१८ वर संख्या …
Read More »कुडाळ तहसीलदारांचे ते पत्र अखेर रद्द माहिती जमा करण्याच्या उद्देशासाठी आदेश होता
मुंबई: प्रतिनिधी ३ मे नंतर जर लॉकडाऊन वाढल्यास किंवा अडकलेल्या व्यक्तींना जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी परवानगी देण्याच्या उद्देशाने कुडाळमधून बाहेर परराज्यात, परदेशात आणि आपल्या मूळ गावी जावू इच्छिणाऱ्या व्यक्तींची माहिती जमा करण्यासाठी ते आदेश जारी करण्यात आले. मात्र ते कार्यालयीन कामकाजासाठी असलेले पत्र बाहेर आल्याने सदरचे ते पत्र रद्द करण्यात आल्याचा कुडाळच्या …
Read More »सोलापूरची संख्या ३ ने वाढत ६८ वर मात्र ते सारीचे रूग्ण एकाचा मृत्यू
सोलापूर: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच सोलापूरातील कोरोना रूग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. आज ५८ जणाची तपासणी करण्यात आली होती. यापैकी ३ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याने एकूण रूग्णांची संख्या ६८ वर पोहोचली आहे. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला असून एकूण मृतकांची संख्या ६ वर पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी …
Read More »सोशल मिडीया नियमांचा भंग? केंद्रीय मंत्र्यांचेच अकाऊंट ब्लॉक पंतप्रधानांना पत्र लिहीत पेड ट्रोलिंग चालवित जात असल्याचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी ट्विटर, फेसबुक यासह इतर सोशल मिडियावर कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून बारीक लक्ष ठेवण्यात येते. मात्र केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी सोशल मिडीयाच्या नियमांचा भंग केल्याने त्यांचे अकाऊंट ट्विटरने ब्लॉक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी हेगडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत सरकार आणि …
Read More »सरकारकडून देहविक्रयातील महिलांना ‘रेशन’, वैयक्तिक स्वच्छता साधनांचा पुरवठा अॅड. यशोमती ठाकूर वेळोवेळी घेत आहेत आढावा
मुंबई: प्रतिनिधी देहविक्रय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांच्या समस्यांकडे एरवी समाजाचे लक्ष जात नाही. या व्यवसायात नाईलाजाने आलेल्या महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्न करतो. सध्याच्या ‘कोविड-19’ परिस्थितीत या महिलांच्या उत्पन्न बंद झाल्याने कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत महिला व …
Read More »कोविड विरोधी लढ्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कर्मचारी मध्यवर्ती महासंघाकडून उपमुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या गट ‘ड’ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी मे महिन्यातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला असून ‘राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघा’चे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, सरचिटणीस प्रकाश बने यांनी त्यासंबंधीचे पत्र आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द केले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्य शासनाचे अधिकारी, …
Read More »योगीजी “त्या” प्रकरणात आम्ही कठोर कारवाई केलीय तुम्हीही कराल साधूंच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी उ.प्र. मुख्यमंत्री आदीत्यनाथ यांच्याजवळ व्यक्त केली चिंता
मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशमधल्या बुलंद शहर येथे दोन साधूंच्या झालेल्या हत्येबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून बोलून चिंता व्यक्त केली. तसेच मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातही अशीच घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यावेळी संबधित गुन्हेगारांच्या विरोधात कडक कारवाई केल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …
Read More »स्वत:ची गाडी आहे ? मूळ गावी, परराज्यात- परदेशात जायचं मग उद्याच भेटा तहसीलदाराकडून आदेश जारी
मुंबई: विशेष प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे अनेक नागरिक स्वत:चा जिल्हा, गाव आणि राज्य सोडून इतररत्र आडकले आहेत. अशा नागरिकांना आता आपल्या मूळ गावी किंवा राज्यात परतण्याची संधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिली आहे. कुडाळमध्ये अशा अडकलेल्या व्यक्तींनी सरकारने दिलेल्या फॉर्मेटमघ्ये उद्या २८ एप्रिल रोजी संध्याकाळी प्रत्यक्ष कार्यालयात येवून अर्ज सादर करण्याचे आदेश …
Read More »रूग्ण सापडल्यानंतर मंत्रालय आणि प्रशासकिय इमारत दोन दिवसांसाठी बंद निर्जंतुकीकरणासाठी बंद ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची लागण मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना होवू नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या सरकारला अखेर मंत्रालयातच या विषाणूची लागण झालेले रूग्ण सोमवारी सापडले. त्या विषाणूचा प्रादुर्भाव इतरांनाही होवू नये यासाठी मंत्रालय, नवीन प्रशासकिय इमारतीत निर्जंतुकीकरण करण्यासाठी दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. २९ आणि ३० एप्रिल या दोन …
Read More »आपला फोकस कोरोनाच्या लढाईवर…त्यांच्याकडे रिकामा वेळ असेल खासदार सुप्रिया सुळे यांचे विरोधकांवर टीकास्त्र
मुंबई : प्रतिनिधी कुठल्याही राजकीय विषयाबद्दल कुठलीही आता अस्थिरता आणणं हे अशा काळात योग्य नाही. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाई आपण कॉमन अजेंडा करुन लढली पाहिजे. दरम्यान आपला फोकस कामावर असला पाहिजे हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सांगतात त्याप्रमाणे आपला फोकस कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी असायला हवा. ज्यांना टिका करायची असेल त्यांना करु द्या …
Read More »
Marathi e-Batmya