Editor

सोने जमा करणे ही जुनीच योजना – भाजपाच्या दोन पंतप्रधानांनी राबविली काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती

कराड : प्रतिनिधी कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने सर्व धार्मिक संस्थांकडून सोने परतीच्या बोलीवर कर्जरूपाने घ्यावे आणि त्या बदल्यात १ ते २% व्याज देखील द्यावे अशी सूचना मी काल केली होती. काही समाज विघातक व्यक्तींनी माझ्या सूचनेचा विपर्यास करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मी केलेली सूचना …

Read More »

१५ दिवसात दुसऱ्यांदा विक्रमी रूग्ण : मुंबई महानगर पोहोचले २० हजारावर १८२२ रूग्णांचे निदान तर ४४ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून जंगजंग पछाडायला सुरुवात केलेली आहे. तरीही करोनाचा विषाणू काही आटोक्यात यायला तयार नसून मागील १५ दिवसात दुसऱ्यांदा १८२२ कोरोनाग्रस्तांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्याची संख्या २७ हजारावर तर मुंबई महानगराची संख्या २० हजारावर पोहोचली असून राज्यात ४४ जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य …

Read More »

खडसेंनी व्यक्त केली नाराजी फायदा झाला पंकजा मुंडे गटाला डमी उमेदवाराचे रमेश कराड झाले आमदार

मुंबई: विशेष प्रतिनिधी सत्तेत असताना खोट्या आरोपामुळे राजीनामा द्यावा लागला आणि विधानसभे पाठोपाठ परिषदेच्या निवडणूकीत उमेदवारी नाकारल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या नेत्यांविरोधात टिकेची तोफ डागली. मात्र त्यांच्या तोफ डागण्यामुळे पंकजा मुंडे यांच्या गटाचे रमेश कराड यांच्या गळ्यात अचानक अधिकृत उमेदवारीची माळ पडून ते बिनविरोध निवडूण आले. त्यामुळे …

Read More »

दोन पक्षाच्या त्या चौघांनी माघार घेतल्याने मुख्यमंत्र्यांसह ९ जण बिनविरोध शिवसेनेच्या शिष्टाईला यश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये या विषाणूची बाधा विधिमंडळ सदस्यांनाही होवू नये यासाठी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रयत्नाला यश आले. त्यांनी केलेल्या यशस्वी शिष्टाईमुळे भाजपाचे चार, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार विधान परिषदेतवर बिनविरोध …

Read More »

पॅकेज-२: राज्याच्या धर्तीवर स्थलांतरीत कामगार, शहरी गरीबांसाठी भाडेतत्वावरील घरे वन नेशन वन रेशन कार्ड योजना अंमलात आणणार असल्याची अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा

नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशातील कामगार, सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक अडचणींची संक्रात आली. त्यामुळे येथून पुढे स्थलांतरीत आणि शहरी भागातील नागरिकांनासाठी भाडेतत्वावरील घरे उभारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. त्याशिवाय सर्वांसाठी घरे या योजनेतून बँकाकडून मिळणाऱ्या व्याज सूट मोहीमेला एक …

Read More »

आठ दिवसात राज्यात १० हजाराने वाढ होत संख्या २५ हजारावर आज १४९५ नव्या रूग्णांचे निदान तर ५४ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत असून मागील १० दिवसात राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १० हजार ३९७ ने वाढली आहे. २४ तासात १४९५ नव्या रूग्णांचे निदान आज झाले असून ५४ जणांच्या मृत्यूची नोंदही आजच झाली आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत राज्यातील रूग्णांची संख्या २५ हजार ९२२ वर …

Read More »

राज्याच्या कौशल्य विकासचे विद्यार्थीही उतरले कोविडच्या युध्दात १५० उमेदवारांना हॉस्पीटलमध्ये मिळाली अप्रेंन्टीसशिप

मुंबई: प्रतिनिधी कोविड विरोधी लढ्यात नर्स, डॉक्टरांचा स्टाफ कमी पडत असल्याने कोरोना यौध्द्यांची भरती राज्य सरकारकडून करण्यात आली. मात्र तरीही संख्या कमी पडत असल्याने कौशल्य विकास विभागाच्या अंतर्गत असलेल्या प्रशिक्षण केंद्रातून नर्सिंग, लॅब टेक्निशियन, डायलेसिस टेक्निशिअन आणि पॅरा मेडिकल कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना आता मुंबई. ठाणे येथील रूग्णालयात अप्रेंटीशिप देण्यात येत …

Read More »

सोलापूरात रूग्णांचा आकडा ३०० पार २४ तासात ३१ रूग्णांचे निदान : २ जणांचा मृत्यू

सोलापूर: प्रतिनिधी काल सोलापूरात अवघे २ रूग्णांचे निदान झाल्याने जिल्ह्यात दिलासादायक वातावरण निर्माण झाले. मात्र आज २४ तासात नव्याने ३१ रूग्ण आढळून आले असून ,रूग्णांची संख्या ३०८ वर पोहोचल्याने पुन्हा जिल्ह्यातील वातावरण चिंताजनक बनले. तसेच आज दोन रूग्णांचा मृत्यू झाला. ३ हजार ५०२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३३६० जणांचे …

Read More »

कोरोना लढ्यासाठी देवस्थानातील १ ट्रिलियन किंमतीचे सोने ताब्यात घ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेले आहेत. त्याचा फटका अनेकत कष्टकरी, कामगार आणि उद्योजकांना बसत असून सरकारची तिजोरीही रिकामी होत चालली आहे. यापार्श्वभूमीवर निधीची आवश्यकता भासणार असल्याने देशातील सर्व देवस्थानात पडून असलेले १ ट्रिलियन अर्थात ७६ लाख कोटी रूपये किंमतीचे …

Read More »

सरपंच, उपसरपंचांची निवड होणार, पण ग्रामसभा नाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतींच्या या बैठका घेण्यास संमती देण्यात आली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करुन घेण्यात याव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला करत ग्रामसभा घेण्यास त्यांनी परवानगी नाकारत असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन …

Read More »