सोलापूर : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. काल ९० रूग्णांचे निदान झाल्यानंतर आज ६७ रूग्णांचे निदान ७ जणांचा मृत्युची नोंद होत एकूण १६१ मृतकांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील रूग्णांची संख्या १८९१ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील ११ जिल्ह्यात आज एका …
Read More »अबब…कल्याण-डोंबिवलीत २४ तासांत २४३ रुग्ण आतापर्यत ७१ जणांचा मृत्यू
मुंबई: प्रतिनिझी मुंबई महानगरपालिका हद्दीत ज्या पध्दतीने रूग्ण संख्या वाढत आहेत. त्याच पध्दतीने आज कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत २४३ रूग्णांचे आज निदान झाले आहे. विशेष म्हणजे मागील दिवसापासून महापालिकेकडून सातत्याने घरोघरी जावून नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम करत असताना २४ तासात इतक्या मोठ्या प्रमाणावर रूग्णांचे निदान झाले. आतापर्यंत १८४८ रुग्णांवर उपचार …
Read More »पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एसआरए प्रकल्पांसाठी समिती स्थापनार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती
पुणे :प्रतिनिधी पुणे तसेच पिंपरी चिंचवड क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासासाठी समितीची स्थापना केली जाणार असून समितीच्या अभ्यासानंतर या दोन्ही शहरात झोपडपट्टी पुनर्विकासाचे पथदर्शी काम उभे करणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला भेट देऊन विविध पुनर्वसन प्रकल्पांची तसेच प्राधिकरणाच्या कामाची माहिती …
Read More »zoom app वापरताय मग या गोष्टींची काळजी घ्या सायबर विभागाकडून सूचना जाहीर
मुंबई: प्रतिनिधी सध्याच्या काळात बरेच नागरिक Work From Home करत आहेत. ऑनलाईन मिटींग्ज करिता वापरायला सोपे असलेले zoom या सॉफ्टवेअरचा जास्त प्रमाणात उपयोग होत आहे. सायबर भामट्यांनी zoom app सदृश्य काही malware व फेक अँप्स बनवली आहेत. त्यामुळे हे ॲप वापरताना सावधानता बाळगणे आवश्यक असल्याचे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात …
Read More »कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जातेय, मृतकांच्या संख्येत पारदर्शकता नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विरोधी पक्षनेते फडणवीसांनी केली लक्ष देण्याची मागणी
मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेलीय. ऑक्सीजन न मिळाल्यामुळे कोरोनारूग्णांचा मृत्यू ही त्याचेच द्योतक असून आजही या विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत अजूनही पारदर्शकता नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत या गोष्टींकडे लक्ष देण्याची मागणी आज पत्र पाठवित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. १९ जून २०२० रोजी …
Read More »कोरोना: बरे होण्याचे प्रमाण वाढले तरी मृत आणि नव्या रूग्णांच्या संख्येत वाढच ३८२७ नवे रूग्ण तर १४२ जणांचा मृत्यू, अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५५ हजार वर
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या बरे होण्याच्या संख्येत चांगल्यापैकी वाढ होत असली तरी दैंनदिन मृतकांच्या आणि रूग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविणे अवघड बनत चालले आहे. मागील २४ तासात १४२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली तर नवे ३ हजार ८२७ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५५ हजार ६५१ वर …
Read More »कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर रोखण्यासाठी आता ‘टेलीआयसीयु’ तंत्रज्ञान मुंबईसह राज्यात सात जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर वापरणार असल्याची आरोग्यमंत्री टोपेंची माहिती
मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचे वाढत असलेल्या मृत्यूच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी अतिदक्षता विभागात (आयसीयु) उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ‘टेलीआयसीयु’ सुविधेचा वापर केला जणार असून मुंबई, ठाणे, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, अकोला आणि जालना या ७ जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर …
Read More »खुषखबर: अंतिम वर्षाच्या परिक्षा नाहीच मात्र ATKT चा निर्णय लवकरच उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आदेश जारी
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अव्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेणे अशक्य आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांना परिक्षा द्यायची असेल त्यांची परिक्षा घ्यावी असे स्पष्ट आदेश राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात नमूद केले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना परिक्षा न देता अभ्यासक्रमाचे पदवी (डिग्री) …
Read More »मुंबईच्या धर्तीवर डॉक्टर्सचा टास्क फोर्स नेमा पण मृत्यू दर रोखा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाशी आपण ३ महिन्यांपासून लढतो आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यू दर वाढणे बरोबर नाही. आपण लॉकडाऊन शिथिल केला आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे. रुग्ण सापडविणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरीत्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे , …
Read More »पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघातील गावाची बातमी केली म्हणून पत्रकारावर गुन्हा scroll.in च्या पत्रकारावर उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल
मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या गावातील लोकांना सरकारने कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे तेथील लोकांवर उपासमारीची वेळ आल्याची बातमी प्रसिध्द केली म्हणून scroll.in या संकेतस्थळाच्या पत्रकारावर उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी जिल्ह्यातील डोमरी या अनेत गावात …
Read More »
Marathi e-Batmya